म. फुले विद्यापीठप्रकरणी आ. तनपुरेंची धाव !

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  म. फुले कृषी विद्यापीठातील गैरकारभाराविरोधात अखेर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पुढाकार घेत ठेकेदार, कंत्राटी कर्मचार्‍यांसह विद्यापीठातील वरिष्ठ अधिकार्‍यांची आज संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, ठेकेदारांची अडवणूक करीत थकीत बिलांसह कंत्राटी कर्मचार्‍यांवर झालेला अन्याय पाहता आ. तनपुरे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. दै. पुढारीने विद्यापीठामधील गलथान कारभार चव्हाट्यावर आणल्याने अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यांनी कारभार हाती घेतल्यापासून कोणत्या न कोणत्या वादामुळे राज्यभर चर्चा होत आहे. विद्यापीठातील नियंत्रक, कुलसचिवसारख्या पदांवरील क्लास वन अधिकार्‍यांवर कारवाई झाल्यानंतर कंत्राटी कर्मचार्‍यांना थेट ‘चले जाव’, चा आदेश देण्यात आला. यानंतर विद्यापीठातील बांधकाम विभागातील अनेक कामांमध्ये शासकीय नियम धाब्यावर बसवत कोट्यवधी रूपयांची झालेली उधळपट्टीची चर्चा झाली.


दरम्यान, विद्यापीठातील बांधकाम विभागाने नुकतेच काही कोट्यवधी रूपयांची कामे करताना केलेला गलथान कारभार एका सामाजिक कार्यकर्त्याने घेतलेल्या माहिती अधिकारात उघड झाला आहे. ‘एमडी’ नावाच्या सिव्हील इंजिनिअर्स फर्मच्या नावे चक्क इलेक्ट्रीकल कामाचा ठेका देत बिल अदा करण्यात आले आहे. राहुरी हद्दीत फरशी बसविण्याचे काम करणार्‍या एका कामगाराच्या नावे 15 हजार रूपये किंमतीच्या गाद्या खरेदी, उशी, बेडशीट असे एकूण 2 लक्ष 55 हजाराचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. त्याच कामगाराकडून स्क्रू, वॉटर प्रूफ, कलर, खडी, वारनेस, पीव्हीसी दरवाजे, सनमाईक, लॅमिनेट आदी साहित्य लाखो रूपयांच्या किमतीत खरेदी करण्यात आले आहे. तसेच त्याच कामगाराकडून तिसर्‍या निविदेमध्ये वाळू, खडी, सिमेंट खरेदी करीत 2 लक्ष 57 हजाराचे बिल अदा केल्याचे दिसत आहे. शहरातील एक प्लंबींग मटेरीयल विकणार्‍याच्या नावेही वाळू, वीट, सिमेंटचे बिल अदा करण्यात आले आहे. शहरात रंग विकणार्‍या एका ट्रेडर्स दुकानदाराकडूनही विटा, वाळू सिमेंट खरेदी केल्याचे दाखवित बिल अदा केलेले आहे. राहुरी फॅक्टरी येथील एका पुंड नामक महिलेकडून सुमारे 15 हजार रूपये किमतीच्या 4 खुर्च्या, 40 हजाराचा सोफा, तसेच टी टेबल, बेड साईज टेबल खरेदी दाखवित 2 लक्ष 89 हजारांचे बील अदा केल्याचे दर्शविले आहे. दुसर्‍या एका कामात त्याच पुंड महिलेकडून ब्लीचींग पावडर, पेंट, सिमेंट, व्हाईट सिमेंट, खिळे असे 2 लक्ष 39 हजार रूपये बिल संबंधित महिलेला अदा केले आहे. त्यानंतर विशेष म्हणजे त्याच महिलेच्या नावे गवत खुरपणे, काट्या काढणे या याकामासाठी तब्बल 2 लक्ष 65 हजाराचे बिल काढण्यात आले आहे. अशाच पद्धतीने कोणताही ताळमेळ न ठेवता बांधकाम विभागामध्ये शासकीय ठेकेदाराची परवाना, जीसएसटी किंवा शासनाची रॉयल्टीबाबत कोणतेही कागदपत्रांची पाहणी न करता अनेक कोट्यवधी रूपयांची बिले बिनधास्तपणे वाटप केले जात असल्याचे आता उघड बोलले जात आहे.

हासर्व प्रकार करीत असताना बोटावर मोजण्या इतक्याच ठेकेदारांवर मेहेरबानी करीत अनेक ठेकेदारांना बील मंजूर करण्यासाठी खेट्या मारण्यास सांगितले जात आहे. तसेच विद्यापीठामध्ये प्रवेशालाही बंधन असल्याने संबंधित ठेकेदारांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.


दुसरीकडे कंत्राटी कर्मचारी गलथान कारभाराची माहिती बाहेर देतात या शंकेवरून अनेकांना नोकरीवरून काढून टाकले जात आहे. हासर्व प्रकार पाहता अखेर ठेकेदारांनी एकत्र येत विद्यापीठ प्रशासनाविरोधात लढा घेतला. विद्यापीठात सुरू असलेला गैरकारभार दै. पुढारीने चव्हाट्यावर आणताच आ. प्राजक्त तनपुरे यांनी न्याय देण्याची भूमिका घेतली. म. फुले कृषी विद्यापीठ येथे कुलसचिव, नियंत्रक,विद्यापीठ अभियंत्यांसह अधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत. यावेळी ठेकेदार, कंत्राटी कर्मचारी व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचे आ. तनपुरे प्रयत्न करणार असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.


बैठक होऊ नये म्हणून मर्जीतच्या ठेकेदारांचा प्रयत्न

विद्यापीठात काही ठेकेदारांना अभय मिळते तर अनेकांवर अन्याय होतो. ही बाब आमदार तनपुरेंपुढे उघड होऊ नये म्हणून काही मर्जीतल्या ठेकेदारांनी बैठक होऊ नये म्हणून प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील सर्वसामान्यांवर अन्याय होत असल्याबाबत कुलगुरू, विद्यापीठ अभियंता यांबाबत आमदार तनपुरे हे आज काय भूमिका घेणार? ठेकेदारांचे थकीत बिले मिळणार का? काढून टाकलेल्या कंत्राटी कामगारांना न्याय मिळणार का?याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


The post म. फुले विद्यापीठप्रकरणी आ. तनपुरेंची धाव ! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzVk0m

Nagar : ‘थर्ड पार्टी रिपोर्ट’अभावी अडला पथदिव्यांचा उजेड

नगर : पुढारी वृत्तसेवा : पथदिव्यांचे बिल मोठ्या प्रमाणात येत असल्याने स्मार्ट एलईडी योजना राबविण्यात आली. परंतु, या योजनेचा थर्ड पार्टी रिपोर्ट गेल्या अनेक दिवसांपासून रखडल्याने ठेकेदाराने पथदिव्यांचे मेंटेनन्स व नवीन पथदिवे बसविणे थांबविले आहे. परिणामी अनेक ठिकाणी दिवे बंद असून, काही ठिकाणी दिव्यांचा पुरेसा प्रकाश पडत नाही, अशी चर्चा सुरू आहे. महापालिकेला केवळ पथदिव्यांसाठी महिन्याकाठी 40 लाख रुपयांचे बिल भरावे लागत होते. त्यासाठी महापालिकेने स्मार्ट एलईडी योजना राबवून त्याला पर्याय शोधला. स्मार्ट एलईडी बसविल्यानंतर महापालिकेच्या वीजबिलात कपात होईल, असा दावा संबंधित ठेकेदाराकडून करण्यात आला होता. महापालिका ठेकेदाराला पैसे देणार आणि ठेकेदार वीजबिल भरणार आहे.


त्यात मेंटेनन्स व बंद दिव्यांच्या जागी नवीन दिवे लावणे याची जबाबदारी ठेकेदारांची आहे. स्मार्ट एलईडी दिवे बसवून आता दोन वर्षे होत आली, त्यात सुरुवातीला करारामध्ये 25 हजार दिवे बसविण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर विविध भागांतील नगरसेवकांकडून मागणी वाढल्याने पुन्हा सहा हजार दिवे बसविण्यात आले. त्यामुळे शहरात आतापर्यंत 32 हजार स्मार्ट एलईडी बसविण्यात आले आहेत. मनपाला महिन्याला 40 लाख रुपये वीजबिल येत होते. ते आता 36 ते 35 लाखांवर आले आहे. त्यामुळे स्मार्ट एलईडीमुळे वीजबिलांमध्ये बचत होताना दिसत आहे. दुसरीकडे स्मार्ट एलईडीचा प्रकाश मात्र फारसा पडत नाही, अशी नगरसेवकांची ओरड आहेच. त्यात उर्वरित आणखी पाच ते सहा हजार दिवे बसविण्याची मागणी नगरसेवकांची आहे.


दरम्यान, स्मार्ट एलईडी पथदिव्यांची योजना सुरू झाल्यापासून अद्याप थर्ड पार्टी रिपोर्ट न झाल्याने संबंधित ठेकेदाराला महापालिकेकडून एकही रुपया मिळालेला नाही. त्यामुळे ठेकेदाराने आता स्मार्ट एलईडी दिव्यांचे मेंटेनन्स थांबविले आहे. तसेच, नवीन दिवे बसविण्यासही त्याचा नकार आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात अंधार असून, नवीन पथदिवे बसविण्याची मागणी होत आहे. परंतु, बिलाअभावी स्मार्ट एलईडी दिव्यांचे मेंटेनन्स रखडले आहे. त्यात विद्युत विभागाकडून थर्ड पार्टी रिपोर्ट मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप थर्ड पार्टी रिपोर्ट मिळालेला नाही, असे सूत्रांकडून समजले.


The post Nagar : ‘थर्ड पार्टी रिपोर्ट’अभावी अडला पथदिव्यांचा उजेड appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzS9jd

ऊस, मजूर टंचाईचे कारखान्यांपुढे संकट ; नगर जिल्ह्यातील चित्र

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन महिना लोटला तरी कारखान्यांना दैनंदिन पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करणे ऊसतोडणी मजुरांअभावी अडचणींचे ठरत आहे. जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांना दैनंदिन उसाचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने पूर्ण क्षमतेने गाळप होत नसल्याचे दिसत आहे. मजुरांअभावी अशी परिस्थिती ओढवल्याचे कारखाना व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. यंदा ऊसटंचाईची झळ साखर कारखान्यांना बसली असताना आता दुष्काळात तेरावा या म्हणीप्रमाणे ऊस तोडणी मजूर उपलब्ध होत नसल्याने कारखान्यांच्या अडचनीत वाढ होताना दिसत आहे.राज्यात बहुतेक सर्वच साखर कारखान्यांत विस्तारीकरण झाल्याने दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ झाली आहे. हीच वाढ आता साखर कारखान्यांना यंदा संकटात टाकत आहे.


एकीकडे मजुरांची संख्या घटली तर दुसरीकडे ऊसउत्पादनही घटले. त्यामुळे हंगामाची उद्दिष्टपूर्ती तर बाजूलाच, पण दैंनदिन गाळप क्षमता साध्य करणेही जिकिरीचे ठरत आहे. संपूर्ण राज्यातच साखर उद्योगासमोर मजूर टंचाईचे संकट उभे ठाकले आहे.

तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उदाहरण घेतल्यास गेल्या हंगामात या कारखान्याकडे 887 बैल टायर व 450 ट्रॅक्टर होते. यंदा ही संख्या 370 बैल टायर,215 ट्रॅक्टर अशी आहे. अशीच परिस्थिती बहुतेक साखर कारखाना शेतकी व्यवस्थापनाची झालेली दिसत आहे. तोडणी मजूर घटल्याने ऊसउत्पादक व साखर कारखाने अशी दोन्हींची अडचण होत आहे. हंगाम सुरू होऊन महिना झाला, तरी कारखान्यांचे शेतकी विभाग तोडणी मजुरांसाठी दाहीदिशांना फिरताना दिसत आहेत.


पाथर्डी, बीडमध्ये मजूर संख्या घटली

पाथर्डी, बीड येथील ऊसतोडणी मजुरांची संख्या कमालीची घटली आहे. नवी पिढी नोकरी, व्यवसायाकडे झुकली आहे. सध्या जळगाव, धुळे, हिंगोली, यवतमाळ जिल्हा, तसेच साखर कारखाना परिसरातून ऊसतोडणी मजूर टोळ्या कार्यरत आहेत. परंतु त्यांची संख्याही कमी आहे.


The post ऊस, मजूर टंचाईचे कारखान्यांपुढे संकट ; नगर जिल्ह्यातील चित्र appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzPbqR

Nagar Crime News : अखेर कापूस चोरणारी टोळी केली गजाआड

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : सध्या कापसाचे सीजन चालू आहे. राहुरी तालुक्यात कापूस चोरीच्या घटनेत वाढ झाली. राहुरी पोलिस पथकाने तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात कापूस खरेदी केंद्रातील कापूस चोरी करणारी 6 जणांची टोळी अवघ्या 24 तासाच्या आत गजाआड केली, मात्र चार चोर पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून जाण्यात यशस्वी झाले. देवळाली प्रवरा येथे अतुल नानासाहेब कदम यांच्या शिवतेज कापूस खरेदी केंद्र तर तेजस कदम यांच्या साईतेज कापूस खरेदी केंद्रातून 80 हजार 500 रुपये किंमतीचा साडे अकरा क्विंटल कापूस चोरी गेला होता.


22 नोव्हेंबर 2023 रोजी रात्रीच्या दरम्यान चोरी झाली होती. याप्रकरणी अतुल कदम यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तपासाची चक्रे फिरवली. गुप्त खबर्‍याच्या माहितीनुसार जाधव, पो. ह. सूरज गायकवाड, पो. ना. राहुल यादव, नदीम शेख, सम्राट गायकवाड यांच्या पोलिस पथकाने आरोपींची धरपकड सुरु केली. अवघ्या 24 तासांच्याआत 6 चोरट्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून मुस्क्या आवळून गजाआड केले. गुन्ह्यात वापरलेली टाटा एस. गाडी (क्र. एम एच 44- 8382) व ईनोव्हा गाडी (क्र. एम एच 01- ए सी- 4271) या दोन वाहने जप्त केली.


सराईत गुन्हेगार करण माळी याने कापूस चोरी करण्यास टोळी बनवली होती. त्यामध्ये पप्पू गुलाब बर्डे, ऋषिकेश मधुकर लोखंडे (वय 21), प्रज्वल सूर्यभान झावरे (वय 20), प्रज्वल अशोक भांड (वय 19), विनीत संजय कोकाटे (वय 18), अक्षय नारद, बन्नी बर्डे, प्रतीक बाळासाहेब बर्डे, सचिन रमेश बर्डे ऊर्फ सचिन टिचकुले अशा 10 जणांची टोळी बनवली होती.

पोलिस पथकाने प्रज्वल झावरे, ऋषिकेश लोखंडे, प्रज्वल भांड, विनीत कोकाटे, प्रतीक बर्डे, सचिन बर्डे उर्फ सचिन टीचकुले या 6 जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, मुख्य आरोपी करण माळी, पप्पु बर्डे, बन्नी बर्डे, अक्षय नारद हे चौघे पळून गेले. पुढील तपास पो. नि. धनंजय जाधव व पो. ह. राहुल यादव करीत आहेत.


हेही वाचा


Nagar News : मुक्त विद्यापीठात 70 कोटींचा गैरव्यवहार


धार्मिक पर्यटनामध्ये कोपरगावला प्राधान्य द्यावे : आ. आशुतोष काळे


जळगाव : ईएसआयसी रूग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा; एमआयडीसीकडून भूखंड उपलब्ध


The post Nagar Crime News : अखेर कापूस चोरणारी टोळी केली गजाआड appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzM6Xg

राहुरी : मुळा धरणातून आज पाणी सोडणार!

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडण्याच्या हालचाली अंतिम टप्यात आल्या आहेत. मांजरी, मानोरी व वांजूळपोई या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याच्या फळ्या काढून घेण्यात आल्या आहेत. डिग्रस बंधार्‍याच्या फळ्या काढण्यात आल्या असून आज रविवारी(दि.२६) रोजी दुपारी १२ वाजता जायकवाडीतून पाणी झेपावरणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाने दिली आहे.


मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखाभियंता यांसह जायकवाडी धरणाचे उपअभियंता यांसह दोन शाखाभियंता अधिकारी मुळा धरण स्थळी ठाण मांडून आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून नदी पात्रालगत संवेदनशिल परिसर म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे धरण स्थळी व नदी पात्रालगत जमावबंदीचे आदेश आहेत. नगर व नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी सोडण्याबाबत होणारा राजकीय विरोध पाहता मुळा धरणातून पाणी सोडताना संघर्ष पेटण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभुमीवर प्रशासनाने चोख बंदोबस्त नेमला असल्याची माहिती मिळाली आहे.


मुळा धरणामध्ये २२ हजार ८०० दलघफू इतका पाणी साठा आहे. त्यापैकी २ हजार १०० दलघफू पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुळा धरणाचे सर्व ११ दरवाज्यातून पाणी जायकवाडी धरणाकडे वाहणार आहे. मुळा पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याबाबत सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. पोलिस, महसूल प्रशासनासह लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना जमावबंदी आदेशाचे अवलोकन करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासह महावितरण विभागाकडून नदी पात्रालगतचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. मुळा धरणातून पाणी सोडण्यापूर्वी सायरन देत नदी पात्रालगतच्या ग्रामस्थ व शेतकर्‍यांना ईशारा दिला जाणार आहे.


हेही वाचा


कामोठेसह पनवेल तालुक्याला भूकंपाचे सौम्य धक्‍के


सावधान! धूूम्रपान, चूल, डासांची कॉईलमुळे सीओपीडीचा धोका


कोल्हापूर : ऊस आंदोलकांवर 42 गुन्हे; 450 जणांची नावे निष्पन्न


The post राहुरी : मुळा धरणातून आज पाणी सोडणार! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzKMRz

इंदुरीकर महाराज यांना अखेर जामीन मंजूर

संगमनेरः पुढारी वृत्तसेवा :  आपल्या कीर्तनामधून आपत्यप्राप्ती बाबतचे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी विवादात सापडलेले महाराष्ट्रातील थोर समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांना संगमनेर येथील प्रथम वर्ग न्यायालयाने आज गुरुवारी 20हजार रुपयांच्या जात मचुल्यावर जामीन अर्ज मंजूर करत दिलासा दिला आहे. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी अपत्य प्राप्तीबाबत केलेल्या विधानाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा न्यायालय इंदुरीकर महाराजांना जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयानेही जिल्हा न्यायालयाचा निकाल अंतिम ठेवला.


यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अ‍ॅड. गवांदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानेहाखटला पुन्हा प्रथम वर्ग न्यायालयात चालू करावा, असे आदेश दिले. त्यानंतर पुन्हा नव्याने संगमनेरच्या प्रथम वर्गात न्यायालयात हा खटला सुरू झाला.

या प्रकरणी दोनवेळा त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. मात्र दोन्हीवेळा ते न्यायलयात हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे वकील अ‍ॅड. के. डी. धुमाळ यांनी इंदुरीकर महाराज यांना जामीन मिळण्यासाठी 11 नोव्हेंबरला जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र त्या दिवशी इंदुरीकर महाराज उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने त्या जामीन अर्जावर शुक्रवारी (ता. 24) रोजी सुनावणी ठेवली होती. या सुनावणीवेळी ते गैरहजर राहीले तर इंदुरीकर महाराजांच्या नावाने अटक वॉरंट निघण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे या तारखेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते.


प्रसारमाध्यमांना कुठल्याही प्रकारची माहिती न मिळता इंदुरीकर महाराज सुना वणीच्या आदल्या दिवशी गुरुवारी सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर झाले आणि इंदुरीकर महाराजांचे वकील धुमाळ यांनी प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. वाघमारे यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला. न्यायाधीश वाघमारे यांनी इंदुरीकर महाराज यांचा जामीन मंजूर केलेला आहे.


हेही वाचा :



* BMC : मुंबई महापालिकेतर्फे कोविडच्या काळात ४१५० कोटींचा खर्च: माहिती अधिकारात आकडेवारी जाहीर

* Crime news : मित्राच्या बायकोला फोन करतो म्हणून तरूणावर गोळीबार






The post इंदुरीकर महाराज यांना अखेर जामीन मंजूर appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzGrF0

Nagar : प्रशासकीय मान्यता कासवगतीने !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषदेत पदाधिकारी नसल्याने विकासकामांच्या बाबतीत काहीशी मरगळ आल्याचे चित्र आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 270 कोटींचे नियतव्यय मंजूर असताना आतापर्यंत सात महिन्यांत साधारणतः केवळ 40 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता झाल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, पुढील वर्ष लोकसभा, विधानसभा, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकांचे असणार आहे. त्यामुळे याच गतीने प्रशासकीय मान्यता झाल्यास अनेक विकासकामे आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे. सुमारे 20 महिन्यांपासून प्रशासक आशिष येरेकर हे जिल्हा परिषदेचा कारभार हाकत आहेत.


संबंधित बातम्या :



* Nagar : अंगणवाडी सेविका, मदतनीस 4 डिसेंबरपासून संपावर

* धक्कादायक ! तहसीलदारांच्या अंगावर घातला डंपर

* दिल्ली प्रदूषण नियंत्रणातील तिसऱ्या टप्प्यातील नियम कायम, BS-3 डिझेलसह BS-4 पेट्रोल वाहनांवरही बंदी






नवीन पदाधिकारी येईपर्यंत तेच सर्वेसर्वा असणार आहेत. त्यातच या वर्षअखेरीस जलजीवन योजना पूर्ण करण्याची भीष्मप्रतीज्ञाही त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे या योजनेवरच त्यांचा फोकस असल्याचे लपून राहिलेले नाही. याचा कुठेतरी इतर कामांवरही परिणाम होताना दिसत आहे. याही परिस्थितीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी सर्व विभागप्रमुख, कार्यकारी अभियंता यांचे कान टोचल्यानंतर कुठे प्रशासन गतिमान होताना दिसत आहे. अर्थात प्रशासकीय मंजुरीसाठीच्या शिफारशींची प्रक्रिया ही तितकीच ‘अडचणीची आणि अडथळ्याची’ असल्याचे वास्तव आहे.


2023-24 मध्ये जिल्हा नियोजनमधून 270 कोटींचे नियतव्यय मंजूर आहे. या निधीतून विविध कामांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहेत. आजअखेर 40 कोटींच्याच प्रशासकीय मान्यता झाल्याचे सांगितले जाते. यात दक्षिण आणि उत्तर विभागासाठी इतर जिल्हा रस्तेविकास व मजबुतीकरणाच्या लेखाशीर्ष 5054 अंतर्गतच्या 19 कामांसाठी 5 कोटी 50 लाखांची मंजुरी आहे. शाळा खोल्या 143 मंजूर करण्यात आल्या आहेत. अंगणवाडी 36 बांधल्या जाणार आहेत, तीर्थक्षेत्र 53 कामे होणार आहेत. तसेच 3054 अंतर्गत रस्त्यांची 11 कामांची प्रशासकीय मान्यता झालेली आहे. प्रशासकीय मान्यतांचा हा आकडा दिवसेंदिवस वाढता असणार आहे. मात्र त्याची ही गती निश्चितच चिंताजनक असल्याचे चित्र आहे.


प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरूच आहे. आतापर्यंत उत्तर विभागात शाळा खोल्या, अंगणवाडी, तीर्थक्षेत्र, रस्त्यांची दोन्ही लेखाशीर्षाखालील कामांना प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. ही आकडेवारी वाढती असणार आहे.

                                 -संजय शेवाळे, कार्यकारी अभियंता, उत्तर विभाग


जिल्हा नियोजनमधून 2023-24 मध्ये दक्षिणेत बांधकाम विभागालाही 9 कोटींचे नियतव्यय मंजूर आहे. त्यातून विविध कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या जात आहेत. टप्पाटप्याने प्रशासकीय मान्यतांच्या संख्येत वाढ होईल.

                                       – वंदेश उराडे, कार्यकारी अभियंता, दक्षिण विभाग


The post Nagar : प्रशासकीय मान्यता कासवगतीने ! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzDXrm

Homemade Cheese Spread | RecipeOnPlate

Homemade Cheese Spread | RecipeOnPlate

Homemade Cheese Spread Recipe Ingredients for 60g of cheese spread: For making the cheese: - 500ml full-fat milk - Juice of ½ a medium-sized lemon For the cheese spread: - Chhena (prepared cheese) - Pinch of salt - 3-4 tbsp fresh cream Instructions: 1. Begin by making the chhena. In a saucepan, pour 500ml of full-fat milk and bring it to a boil. Once it reaches boiling point, turn off the heat and add the fresh lemon juice. Stir for about a minute until the milk curdles and separates into cheese (chhena) and whey. 2. Place a muslin cloth over a strainer and strain the chhena to separate it from the whey. Rinse the chhena under cold water to remove any lemony flavor. 3. Transfer the chhena to a blender or mixer jar. Add a pinch of salt and 3-4 tablespoons of fresh cream to the chhena. Blend them together until you achieve a smooth and creamy consistency. 4. Congratulations! You have successfully made your homemade cheese spread. It is rich, creamy, and can be stored for a long time. Enjoy it as a spread on bread, crackers, or in your favorite recipes. Note: Feel free to adjust the quantity of fresh cream according to your desired consistency and taste. #recipeonplate #easyrecipe #foodblogger #healthyfood #homemadefood #cheesespread #yummy #tasty #cookingvideos #creamcheese #vlogs #viral #reels #shorts
via YouTube https://www.youtube.com/watch?v=peaHFJiTOZ8

गळा आवळला अन् गुजरातला पळाला

नगर : पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंधाचा संशय घेऊन जाब विचारल्याने पत्नीचा खून करून, मृतदेह पुुरून विल्हेवाट लावल्याच्या गुन्ह्यातील पसार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने अहमदाबाद येथून जेरबंद केले. पत्नी वाद घालून नेहमी संशय घेत असल्याने गळा आवळून खून केल्याची कबुली त्याने दिली. ज्ञानदेव ऊर्फ माऊली पोपट आमटे (वय 33, रा. पारगाव सुद्रीक, ता. श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे. रूपाली ज्ञानदेव आमटे (वय 24) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत रूपालीचा भाऊ रोहित संतोष मडके(रा. फक्राबाद, जामखेड) याने श्रीगोंदे पोलिसांत फिर्याद दिली होती. तीत म्हटले, बहीण मयत रूपाली ज्ञानदेव आमटे हिने पती ज्ञानदेव आमटे याला अनैतिक प्रेम संबंधाबाबत जाब विचारल्याचा राग आला. त्याने बहिणीला कशाने तरी मारहाण करून, जिवे ठार मारले. पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मयताचे प्रेत कापडात बांधून घराचे डाव्या बाजूस खड्डा करून पुरले आणि पत्नी रूपाली हरवल्याची खोटी तक्रार पोलिस ठाण्यात दिली.


संबंधित बातम्या :



* त्या कैदयाला आई- वडिलांनीच परत कारागृहात केले हजर

* प्रस्तावित कृषी कायद्याविरोधात विक्रेत्यांचा बंद

* श्री शिव महा पुराण कथा उत्सवाच्या गर्दीत चोरट्यांनी मारला हात, 21 तोळे सोने लंपास






त्यानंतर बहिणींचा मृतदेह घराजवळच खड्ड्यात सापडला. त्यानंतर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून आरोपी ज्ञानदेव आमटे पसार होता. दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी आरोपीच्या शोधासाठी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके आरोपीचा शोध घेत होते.


आरोपी गुजरातला पळाला

आरोपी ज्ञानदेव आमटे गुजरातला पळून गेल्याची माहिती तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने गुजरातच्या दिशेने रवाना झाले. शनिवारी पोलिस पथक गुजरातमध्ये पोचले. आरोपी अमदाबाद येथून असून वेळोवेळी वास्तव्य बदलत असल्याचे समोर आले. अमदाबादमधील हॉटेल, लॉजेस व टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने वरीलप्रमाणे नाव सांगितले आणि गुन्ह्याची कबुली दिली.


या पथकाने केली कामगिरी

ही कारवाई एलसीबीचे उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस कर्मचारी बबन मखरे, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली.


The post गळा आवळला अन् गुजरातला पळाला appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzBCDl

Amchya Pappani Ganpati Anala ❣️| Music Credit @Mauli_Production  @msmaur  #bappa

Amchya Pappani Ganpati Anala ❣️| Music Credit @Mauli_Production  @msmaur  #bappa

• Keep supporting me so I can continue to provide you with Free content each week • ° Thank For Watching , Stay safe ° #mayurshinde #msmaur #MH39 #cinematic 👉@ instagram https://instagram.com/ms_maur_?igshid=YmMyMTA2M2Y= 👉@telegram https://t.me/+kJVqvirzgyVmMDE9 __________________________________________ (⛔Note📝:-Dear Copyright Owner If U Any Problem Please Contect Me:-shindemayur567@gmail.com Don't Give Copyright Strike.. ____________________________________________ DISCLAIMER ✓ Video Is For Educational Purposes Only. Copyright Disclaimer Under 107 Of The Copyright Act 1976, Allowance Is Made For "Fair Use" For Purposes Such As Criticism, Comment, News Reporting, Teaching Scholarship And Research. Fair Use AS A Use Permitted By Copyright. The Following Audio/Video Is Not Meant For Any Commercial Purpose It Is Just For Showing The Creativity Of An Artist. I respect the Original Music Creator and All Copyright This Person and Company. All Music& Song Are Credited To Respective Owners & Artists. ____________________________________________ Credit by - music link - https://youtu.be/fCeqlE0IdqA?si=HS1osIBS10yOMhpo Mauli Production House Present Producer - Mangesh Ghorpade, Manoj Ghorpade Direction - Mangesh Ghorpade(9527265141) Lyrics - Manoj Ghorpade Singer - Mauli Ghorpade,Shaurya Ghorpade Music - Gaurav Recording Studio(8421120287), Dj Akshay Pro.
via YouTube https://www.youtube.com/watch?v=xdgKluEhkkM

Nagar : तीन महिन्यांत शहरातील 514 श्वानांचे निर्बिजीकरण

नगर : पुढारी वृत्त्तसेवा :  शहरात मोकाट कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढल्याने नगरसेवकांनी मनपात आंदोलन केले. त्यानंतर मनपाने तात्पुरत्या स्वरूपात जुन्याच संस्थेला कुत्रे पकडणे व त्याचे निर्बिजीकरणाचा ठेका दिला. तीन महिन्यात अवघ्या 714 श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले. मग कुत्र्यांची संख्या कशी कमी होणार असा सवाल नगरकरांमधून उपस्थित होत आहे. महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कुत्रे लहान मुलांवर हल्ला करीत असून, मुलांचे खेळणे आता जीवावर बेतू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


त्यामुळे महापालिकेने तत्काळ मोकाट कुत्रे पकडावे आणि त्यांचे निर्बिजीकरण करावे, अशी मागणी नगरसेवक रुपाली वारे, सुनील त्र्यंबके, विनीत पाऊबुद्धे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी केली होती. मनपा अधिकार्‍यांना कुत्र्याची प्रतिकृती भेट दिली होती. स्थायी समिती व सर्व साधारण सभेमध्ये त्यावरून घमासान झाले होते. त्यावेळी कुत्रे पकडण्यासाठी नेमलेल्या संस्थेचा करार संपला असून, नवीन करार झालेला नाही. त्यामुळे महापालिकेने तत्काळ हालचाली करीत जुन्याच संस्थेला तीन महिन्यांसाठी कुत्रे पकडणे व निर्बिजीकरण करण्याचा ठेका दिला. त्याने संस्थेने 15 सप्टेंबर 2023 ते 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत अवघे 514 कुत्रे पकडून त्याचे निर्बिजीकरण केले आहे. दरारोज दहा ते बारा श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात येत असल्याचा दावा महापालिका करीत आहे.


मात्र, दुसरीकडे कुत्र्याची शहरातील दशहत कमी झालेली नाही. बोल्हेगाव, तपोवन रोड, सर्जेपुरा, सारसनगर, केडगाव या भागात कुत्र्यांची प्रचंड संख्या आहे. एक श्वान निर्बिजीकरणासाठी 950 रुपये दिले जात आहेत. शहरात मोकाट श्वानांची 10 हजार 500 इतकी संख्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.


The post Nagar : तीन महिन्यांत शहरातील 514 श्वानांचे निर्बिजीकरण appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sz7fkx

हार के बाद प्रधानमंत्री मोदी ने बढ़ाया भारतीय खिलाड़ियों का हौसला | PM MODI | WOLDCOUP 2023




http://dlvr.it/Sz6CcQ

हार के बाद प्रधानमंत्री मोदी ने बढ़ाया भारतीय खिलाड़ियों का हौसला | PM MODI | WOLDCOUP 2023

व्हिडीओ

      प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ने अहमदाबाद में भारत बनाम ऑस्ट्रेलिया विश्व कप फाइनल मैच के बाद टीम इंडिया के ड्रेसिंग रूम का दौरा किया और खेल में हार के बाद टीम को सांत्वना दी।  पीएम रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जड़ेजा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा के साथ-साथ अन्य खिलाड़ियों का हौसला बढ़ाते नजर आए.  उन्होंने कोच राहुल द्रविड़ की सराहना की और प्रयासों के लिए पूरी टीम की सराहना की।  पीएम ने पूरी टीम को दिल्ली में मिलने का न्योता भी दिया.

Nagar : लंकेंमध्ये ‘राम’, कोल्हेंची संजीवनी

संदीप रोडे







राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके यांच्यात ‘राम’ नाही, या अर्थाने विरोधक आजपर्यंत त्यांच्याकडे पाहत आले. मात्र गेल्या वर्षात लोकसभेच्या दृष्टीने केलेली मोर्चेबांधणी, सोबतच भाजप आमदार राम शिंदे यांच्याशी वाढलेली जवळीक आणि भाजपचे युवा नेते संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या पाठबळामुळे आमदार लंके यांच्यात आता खर्‍या अर्थाने राजकीय ‘राम’ आल्याचे दिसते आहे. नगर जिल्हा भाजपमध्ये गटबाजी नसल्याचा दावा केला जात असला, तरी आमदार राम शिंदे आणि विवेक कोल्हे यांच्याशी लंके यांचे असलेले सख्य पाहता खासदार डॉ. सुजय विखे यांची वाट बिकट होत गेल्यास नवल वाटू नये !


राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) तिघांची सत्ता आहे. याच सत्ता समीकरणाचा लाभ घेत आमदार लंके यांनी भाजपच्या दोन बलाढ्य नेत्यांना आपलेसे करण्यात यश मिळविले. ज्या कोल्हे आणि शिंदे यांना लंकेंनी आपलेसे केले, तेच दोघे नेते खासदार विखे यांना वारंवार राजकीय आव्हान देत आलेले आहेत. गणेश सहकारी साखर कारखान्यातील विखेंची सत्ता उलथवून टाकण्यासाठी विवेक कोल्हे यांनी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी हातमिळवणी केली. राम शिंदे हे विखे यांच्यावर शरसंधान साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. कोल्हे, शिंदे व विखे एकाच पक्षाचे असले तरी कोल्हे, शिंदेंची भूमिका विखेविरोधी असल्याचा प्रत्यय वारंवार येतो. आमदार नीलेश लंके लोकसभेसाठी विखेंचे प्रतिस्पर्धी उमेदवार असू शकतात, असे आडाखे बांधले जातात. त्याच लंकेंना कोल्हे आणि शिंदे पाठबळ देत असल्याने आ. नीलेश लंके यांच्या मतपेरणीला खतपाणी मिळते आहे.


दिवाळी फराळाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात लंके यांनी मतांचे पीक तजेलदार होण्याच्या दृष्टीनेच भाजपचे आ. शिंदे आणि कोल्हे यांना खास निमंत्रित केले. कोल्हे, शिंदे यांना व्यासपीठावर बोलावून द्यायचा तो संदेश दिला. त्याहीपुढे भाजपच्या या दोघा नेत्यांनी राजकीय टोलेबाजी करत सूचक इशारेही दिले. ‘अहंकारी विचारांचे लोकांना खाली बसविण्यासाठी आ. लंके यांना ‘देव’ करत त्यांच्यासोबत सक्षमपणे उभे राहिले पाहिजे’ अशी विवेकी साद कोल्हेंनी घातली. आमदार लंके यांचा दक्षिण लोकसभा मतदारसंघातील वाढता वावर आणि केली जाणारी पायाभरणी ही विखे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे.


विखे यावर जाहीरपणे बोलत नसले, तरी त्यांनीही आपली राजकीय पटबांधणी सुरू केली आहे. आमदार लंके यांची साथसंगत सोडलेले माजी नगराध्यक्ष विजय औटी यांना बळ देत आ. लंकेंच्या राजकीय वाटेत ‘स्पीडब्रेकर’ उभारण्याचा प्रयत्न विखेंकडून चालविला जात आहे. त्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही विजय औटींच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत त्यात हवा भरली. विखे-रोहित पवार यांच्या मैत्रीची चर्चा नेहमीच होते. त्याच दोघांकडून लंके यांच्या कोंडीचा प्रयत्न हादेखील आगामी राजकीय ‘अटी-शर्तीं’चा भाग असू शकतो, असे आडाखे आतापासूनच बांधले जात आहेत.


पेल्यातील वादळानंतरही खदखद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासम्खास म्हणून आमदार राम शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. विखे-शिंदे यांच्यातील वाद म्हणजे ‘पेल्यातील वादळ’ असा उल्लेख करत फडणवीस यांनी त्यावर पडदा टाकला, मात्र त्यानंतरही शिंदे वारंवार ‘काय अर्थ काढायचा, ज्याने त्याने समजून घ्यावे’ असे सूचक वक्तव्य करतच आहेत. विवेक कोल्हे यांनी आ. लंकेंच्या व्यासपीठावर ज्या पद्धतीने भाषण ठोकले, ते पाहता त्यांचाही बोलविता धनी वेगळाच असल्याची चर्चा आहे. गणेश साखर कारखान्याची सत्ता हस्तगत करताच विवेक कोल्हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहचले होते. तेच कोल्हे भाजपचे ज्येष्ठ नेते विखेंच्या विरोधात आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. एकूणच भाजप अंतर्गत आलबेल नसल्याचीच ही लक्षणे दिसतात.


सोशल व्हायरलचे परफेक्ट टायमिंग

आ. नीलेश लंके समर्थकांकडून एक सर्व्हे मतदारसंघांमध्ये फिरवला जात आहे. मतदारांची असलेली बदलाची भूमिका आणि विखे-शिंदे वाद भाजपला परवडणारा नाही, असे सांगणारा हा सर्व्हे लंके यांच्याकडून ‘परफेक्ट टायमिंग’ साधत सोशल व्हायरल केला जात आहे. त्यात लोकसभेला भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून राम शिंदे, सुवेंद्र दिलीप गांधी यांच्यासोबतच माजी मंत्री आ. शंकरराव गडाख यांची नावे या सर्व्हेत चर्चेत आणली आहेत. आमदार लंके यांची ही खेळी खा. विखे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. राष्ट्रवादी फुटीनंतर आ. लंके यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, तरी त्यांच्या होर्डिंग्जवरून अजूनही शरद पवार, सुप्रिया सुळे यांचे फोटो हटलेले नाहीत. आजही दोन्ही पवार सोबत असल्याचे दाखवून देण्याचा लंके यांचा प्रयत्न, हा ठरवून केलेला ‘डाव’ की मुत्सद्दीपणा, हे येणारा काळच सांगेल!


The post Nagar : लंकेंमध्ये ‘राम’, कोल्हेंची संजीवनी appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sz57QC

नगर : मनपात आढळल्या 1175 कुणबी नोंदी

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या जन्म व मृत्यू नोंदणी विभागात कुणबीच्या 768, तर शिक्षण विभागात 407, अशा 1175 नोंदी आतापर्यंत आढळल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात सर्वत्र कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यात अहमदनगर महापालिकेत कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम सुरू असून, आतापर्यंत पावणे बाराशे कुणबी नोंदी सापडल्या आहेत.


राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेत कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी मोडी लिपी वाचकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. महापालिकेच्या दप्तरातील कुणबी नोंदी शोध मोहिमेची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्यावर सोपविण्यात आली होती. पठारे यांच्या आदेशानुसार जन्म-मृत्यू नोंद विभागातील दप्तर मनपाच्या मुख्य कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर 1903 ते 1923 पर्यंतच्या मोडी लिपीतील दप्तराची तपासणी करण्यात आली.


मोडी वाचक भोर यांनी वाचन करून नोंदी शोधल्या. त्यांना भिंगारदिवे यांनी सहकार्य केले. जन्म व मृत्यू नोंदणी विभागात आतापर्यंत 768 नोंदी आढळून आल्या आहेत. त्यात नगर शहरासह परिसरातील गावातील नोंदीचा समावेश आहे. सावेडी, भिंगार, बोल्हेगाव, बुरूडगाव या गावातील नोंदी आहेत. दरम्यान, जन्म व मृत्यू नोंदणी विभागाबरोबर शिक्षण विभागातही कुणबीच्या नोंदी शोधण्यात आल्या. त्यात आतापर्यंत 407 कुणबीच्या नोंदी आढळल्या आहेत. शिक्षण विभागाात आणखी नोंदी शोधण्याची मोहीम सुरू आहे. कुणबीच्या नोंदी आढळल्यानंतर त्याचे संकलन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचे स्कॅनिंग करून ऑनलाईन अपलोड करण्यात येणार आहेत.


हेही वाचा


Nagar News : पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिसाचा धिंगाणा


Crime News : एमआयडीसी परिसरात 30 हजारांची लुट


Pune News : पालिकेचा पर्यावरण अहवाल म्हणजे ’कट पेस्ट’?


The post नगर : मनपात आढळल्या 1175 कुणबी नोंदी appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sz2p5q

सुरुवात मी केली, लंके शेवट करणार ! : आमदार प्रा. राम शिंदे

पारनेर/टाकळी ढोकेश्वर : पुढारी वृत्तसेवा :  आमदार नीलेश लंके यांच्या आगमनाने आमच्या दिवाळी फराळाची सुरुवात झाली. आमदार लंके यांच्या फराळाचा शेवट करायला मी आलोय. सुरुवात आपणच करू व शेवटही आपणच करू, असे सांगत आमदार प्रा. राम शिंदे यांनी भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी असलेल्या नीलेश लंके यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहून राजकीय फटाके फोडल्याने जिल्ह्यातील राजकीय जाणकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार लंके यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमास आमदार शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, नगरचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी या भाजपाच्या नेत्यांनी हजेरी लावत जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. शिंदे, कोल्हे, गांधी व विखे यांच्यातील वितुष्टामुळे त्यांची आमदार लंके यांच्या कार्यक्रमास असलेली हजेरी लक्षवेधी ठरली.


आमदार शिंदे म्हणाले, सकाळी मी आयोजित केलेल्या फराळाला लंके उपस्थित होते. संध्याकाळी मी, सुवेंद्र गांधी, विवेक कोल्हे तयांच्या फराळाला उपस्थित आहोत. आमदार लंके यांचे आखीव-रेखीव व नेटके नियोजन आहे. कोणत्याही कामाचे नेटके नियोजन करू शकतो, याचे महाराष्ट्रात एकमेव उदाहरण म्हणजे आमदार नीलेश लंके हे आहे. कोविड काळात प्रत्येक जण आपला जीव वाचविण्यासाठी धडपड करीत असताना, आमदार लंके यांनी हजारो लोकांची जीव वाचविले. भाविकांना मोहटादेवी दर्शनाचे नियोजन पाहून मी चकीत झालो. आम्हीही निवडणुकीत यात्रेचे नियोजन केले होते. पण, आमच्या गाडीतून प्रचार मात्र दुसर्‍याचा झाला. तिथे रिक्षा आणि पुजारी यांना विरोधकांनी फोडले. लंके यांच्या नियोजनात मात्र कोणासही शिरकाव करण्याची स्थिती नव्हती. लोकप्रतिनिधीकडून जनतेच्या खूप अपेक्षा असतात. त्या पूर्ण करण्याचे काम आमदार लंके करत असल्याचे शिंदे म्हणाले.


यावेळी दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र गुंड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक विक्रम राठोड, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, बाळासाहेब नाहाटा, प्रदीप परदेशी, विठ्ठल काळे, अरूण लांडगे, मजूर फेडरेशनचे चेअरमन अर्जुन बोरूडे, सदस्य गहिनीनाथ शिरसाठ, बाळासाहेब निंबाळकर, बापू तांबे, बबन गाडेकर, रामदास झेेंडे, दिनकार पंदरकर, मोहनराव आढाव, बाळासाहेब उगले, विठ्ठलराव जंगले यांच्यासह जिल्ह्यातील हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


मी बारीक नाही, माजी पालकमंत्री आहे !

आम्ही एकत्र आलो तर, बर्‍याच लोकांना वाटते हे कसे एकत्र आले? जसे दुसरे एकत्र आले, तसेच आम्हीही एकत्र आलोय. मी देखील बारीक नाही, माजी पालकमंत्री आहे. कोणी कोणाशी बोलू नये, अशी आपल्या राज्याची, जिल्ह्याची संस्कृती नाही. एकमेकांच्या दिवाळी फराळाला गेले पाहिजे. काय अर्थ काढायचा, ते ज्याने त्याने समजायचे आहे, असे आमदार शिंदे म्हणाले.


सगळं गोड होऊ दे ना एकदा !

फराळात कडू थोडं काय आहे? आमचा फराळ गोड, तुमचा फराळ गोड! सगळं गोड होऊ दे ना एकदा! काय अडचण आहे? साखर चांगली वापरलेली आहे. कारण आम्हा दोघांकडे साखर कारखाने नाहीत. आम्ही विकत घेऊन साखर वाटू! लोक लोकांना मोठे करतात आणि छोटे करायलाही मागे पुढे पाहत नाहीत, असा आरोपही आमदार शिंदे यांनी केला.


अहंकार्‍यांना बसविण्यासाठी लंकेंना साथ द्या

दिवसभर भेटी देत येथे आल्यावर आमचा सगळा थकवा निघून गेला. कोविड काळात मी आमदार लंके यांचे काम पाहिले. राक्षसरूपी रावणाचा वध करून प्रभू श्रीराम आले होते. त्यामुळेच दीपोत्सव साजरा केला जातो. अहंकारी विचाराचे समाजातील लोक खाली बसविण्यासाठी आमदार लंके यांच्यासारख्या देव माणसासोबत सक्षमपणे उभे राहिले पाहिजे. त्यांच्यावर 2024 चा गुलाल उधळला जावा, असे विवेक कोल्हे म्हणाले.


राजकीय फटाके फुटले !

दिवाळीची सुरुवात गोड झालीय. राजकीय फटाके तर फुटलेच आहेत. टीका टीपण्णी करण्यापेक्षा नीलेश लंके यांनी कमी कालावधीमध्ये समाजासाठी मोठे काम केले आहे. त्यांना आपल्या सर्वांचा पाठिंबा आहे. भविष्यकाळात त्यांनी अधिक चांगले काम करावे, असे सुवेंद्र गांधी म्हणाले.


The post सुरुवात मी केली, लंके शेवट करणार ! : आमदार प्रा. राम शिंदे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sz16W6

अहमदनगर : कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी एकास अटक

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेरमधील उपकरागृहातून पलायन करणाऱ्या कैद्यांना मदत करणाऱ्या मालेगावातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. मोहंमदरिजवान मोहंमद अकबर उर्फ रिजवान बॅटरीवाला (वय ५०) याला मालेगावातील एका परिसरातून आज (दि.१७) पोलिसांनी ताब्यात घेतले.


संगमनेर येथील उपकारागृहाचे तीन गज कापून राहुल देवीदास काळे, रोशन रमेश दधेल उर्फ थापा मच्छिंद्र, मनाजी जाधव व अनिल छबु ढोले हे चार कैदी पळून गेले होते. या कैद्यांना मदत करणाऱ्या सातजणांची नावे समोर आली आहेत. प्रथमेश उर्फ भैय्या पोपट राऊत (वय २४, रा. घुलेवाडी), कलिम अकबर पठाण (वय २०, रा. कोल्हेवाडी रोड) व हलिम अकबर पठाण (वय २२, रा. जमजम कॉलनी) या तिघांना पोलिसांनी या अगोदरच अटक केली आहे. त्यानंतर यातील मुख्य कैदी राहुल काळे याचा साथीदार मित्र असलेला रिजवान बॅटरीवाला यानेही मालेगावात कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानुसार पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. अखेर मालेगावातील एका परिसरातून ताब्यात घेत पोलिसांनी त्याला आज (दि.१७) संगमनेरात आणले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता २० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.


हेही वाचा : 



* जळगावमध्ये पोलीस भरती परिक्षेत ब्लूटूथचा वापर, दोघांना अटक; एरंडोल पोलिसांची कारवाई

* खुनाच्या गुन्ह्यातील तिघे जेरबंद ; कापसाच्या चोरीच्या उद्देशाने शेतकर्‍याची हत्या

* नाशिक : पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची मागणी












The post अहमदनगर : कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी एकास अटक appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SyzC2P

चालक व वाहकाला उघड्यावर काढावी लागली दिवाळीची रात्र!

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महामंडळाची पुणे – धुळे बस दुपारी तीन वाजताच कोल्हार बसस्थानकावर बंद पडली. रात्री उशीरापर्यंत बस सुरु झाली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत बस चालक आणि वाहकांना कोल्हार बसस्थानकावरच उघड्यावर शनिवारची दिवाळी रात्र काढावी लागली. एसटी महामंडळाच्या बस केव्हा बंद पडतील याचा आता भरोसा राहिला नाही. बस बंद पडली तर ती दुरुस्त करण्यासाठी महामंडळाकडूत तत्पर सेवा उपलब्ध होत नाही. त्यामुळे कर्मचारी आणि प्रवाशांचे बेहाल होत आहेत. पुणे – धुळे बस (एमएच 14, बीटी 1788) शनिवारी दुपारी 3 वाजता कोल्हार बसस्थानकावर ब्रेक लायनर खराब झाल्यामुळे बंद पडली.


त्यामुळे बसमधील प्रवाशांना दुसर्‍या बसमध्ये बसविण्यात आले. दुसर्‍या बसमध्ये जागा नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. चालक आणि वाहकांनी एसटी आगाराकडे मदतीची मागणी केली. परंतु रात्री उशीरापर्यंत बस सुरु झाली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत बस चालक आणि वाहकांना कोल्हार बसस्थानकावरच उघड्यावर शनिवारची दिवाळी रात्र काढावी लागली. दोनशे रुपयांपेक्षा अधिक पैसे जवळ ठेवता येत नाहीत. त्यामुळे ऐन दिवाळीत खाण्या पिण्याचे हाल झाले. या कर्मचार्‍यांना बसचे राखण करीतच बसस्थानकावर रात्र काढावी लागली. रविवारी दुपारपर्यंत बस जागेवरच उभी होती. त्यामुळे महामंडळाच्या कर्मचार्‍यांना सणासुदीच्या दिवशी देखील बाहेरच राहाण्याची वेळ येत आहे.


The post चालक व वाहकाला उघड्यावर काढावी लागली दिवाळीची रात्र! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sywjkt

दिवाळीच्या फराळालाही महागाईची झळ

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत्या महागाईची चर्चा सुरू आहे. त्याचीच झळ यंदाच्या दिवाळीला आणि दिवाळीच्या फराळालाही बसल्याचे दिसत आहे. किराणा महागल्याने मिठाई दुकानात चकली, बेसन लाडू, रवा लाडू, शंकरपाळे, शेव इत्यादीचे भाव वाढलेले दिसले. दिवाळीच्या तोंडावरच खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत. साखरही 40 रुपयांना शिवल्याने तीही सर्वसामान्यांना ‘कडू’ वाटू लागली आहे. त्याचा थेट परिणाम फराळावर झाला असून, या वर्षी प्रत्येक पदार्थामागे 10 ते 70 रुपयांपर्यंत्त वाढ झाल्याचे नागरिक सांगत आहेत.


वास्तविकतः दिवाळीत नातेवाइकांना, मित्रमंडळींना फराळाला बोलावण्याची आपली संस्कृती आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी घरोघरी फराळाचा खमंग सुगंध दरवळताना दिसतो. यात नोकरदार, व्यावसायिक महिला कामामुळे दिवाळीचा फराळ घरी न बनविता विकत आणतात किंवा आचार्‍याकडून बनवून घेतात. परिसरातील बचत गट, घरगुती उद्योग आणि व्यावसायिक हे फराळाचे पदार्थ बनवून देतात. त्यांची स्टॉल, दुकानात विक्रीही करतात. काल रविवारी दिवाळीच्या दिवशी यात मिठाई दुकानात फराळ खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची विशेषतः महिला वर्गाची मोठी लगबग पाहायला मिळाली.


घरगुती फराळाला वाढती मागणी

नगरसह अन्य काही ठिकाणी महिला बचत गट तसेच केटरर्सकडे दिवाळीचे फराळ बनविण्याकडे नागरिकांचा कल दिसला. आपली ऑर्डर दिल्यानंतर ते पदार्थ त्या ठिकाणी बनवून दिले जातात. मिठाई दुकानापेक्षा हे दर 10 ते 20 रुपयांनी अधिक दिसत असले, तरी या पदार्थांची चव आणि दर्जा पाहताना या पदार्थाची नगरकरांना ‘गोडी’ लागल्याचे दिसते.


किराणा महागल्याचे चित्र

हरभरा डाळ, मूगडाळ, तूप, साखर, बेसन, पोहे, शेंगदाणे, खाद्यतेल यांच्या किमती वाढल्या आहेत. काही दुकानांतील प्रतिकिलो भाव ः चकली ः 250, शंकरपाळी ः 300, शेव ः 240, चिवडा 250, बेसन लाडू 350, रवा लाडू 380.


झेंडूचे भाव पडलेलेच; अगदी शेवटी वाढले भाव

दसर्‍याला झेंडू फुलांचे भाव पडल्याने अक्षरशः शेतकरी हवालदिल झाला होता. आता दिवाळीला तरी किमान 100 रुपयांचा भाव मिळेल, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती. मात्र कालही बाजारात 40 ते 50 रुपये किलो भाव मिळाल्याचे दिसले. यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झाला असला तरी सर्वसामान्य नागरिकांना फुले खरेदीतून कोणतीही वाढीव झळ बसलेली दिसली नाही. अर्थात, दुपारी चारनंतर मात्र सावेडी उपनगरांत प्रोफेकर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक अशा ठिकाणी फुले कमी दिसू लागल्यानंतर भाव वाढल्याचे जाणवले. काही विक्रेत्यांनी शेवती 200 रुपये, तर झेंडू 150 रुपये किलो दराने विकले. मात्र अगदी शेवटी शेवटी थोड्याच फुलांची या वाढीव दराने विक्री झाल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.


The post दिवाळीच्या फराळालाही महागाईची झळ appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SytGXg

कर्जत-जामखेडसाठी 5 कोटींचा निधी : आमदार प्रा. राम शिंदे

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लागण्याासाठी ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेतून सुमारे पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून कर्जत-जामखेडकरांना ऐन दिवाळीत सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. सरकारने आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत मतदारसंघातील 51 कामांना मंजुरी देत, 5 कोटींचा निधी मंजूर केला आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार आहेत. कर्जत व जामखेड तालुक्यांसाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल आमदार शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले आहेत.


जामखेड तालुक्यातील मंजूर कामे व निधी – घोडेगाव येथे सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. हळगाव येथील तुकाईवस्ती येथे बाळू मामा मंदिर सभामंडप बांधणे 7 लाख रूपये. मतेवाडी येथे मतेगल्ली ते कल्याण रांगडे घरे सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करणे 8 लाख रूपये. कवडगाव येथे स्मशानभूमी बांधणे 10 लाख रूपये. महारूळी येथे सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. बाळगव्हाण येथील तुळजाभवानी मंदिर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. दिघोळ येथे संत नरहरी सोनार महाराज मंदिर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. पाडळी येथील जिल्हा परिषद शाळा संरक्षक भिंत उभारणे 10 लाख रूपये. फक्राबाद येथे कब्रस्थान वॉल कंपाऊड बांधणे व सुशोभीकरण करणे 10 लाख रूपये. पाटोदा बसस्थानक परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये.


बुर्‍हाणपूर येथील मारूती मंदिर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. मुंगेवाडी येथे जिल्हा परिषद शाळा इमारत बांधणे 10 लाख रूपये.

कर्जत तालुक्यातील मंजूर कामे व निधी – कोपर्डी येथे हरणवाडी मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. तिखी येथे मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. चलाखेवाडी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.

खुरंगेवाडी येथे हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. राक्षसवाडी खुर्द येथे अहिल्यादेवी यांच्या स्मारकास सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.


पिंपळवाडी येथील माळवदे वस्ती जिल्हा परिषद शाळेत पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये. देऊळवाडी येथे शिवाई मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये. दिघी येथे महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. लोणी मसदपूर येथे फिरंगाईदेवी मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये.


मानेवाडी येथे ज्योतिबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. शिंतोडा येथे भैरवनाथ मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. हंडाळवाडी येथे गावठाण रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख रूपये.


अंबी जळगाव येथे बिरोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. डोंबाळवाडी येथे तुळजाभवानी मंदिर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये. औटेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेजवळील रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख रूपये. नागापूर येथे बुवासाहेब महाराज मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये.


बाभुळगाव खालसा येथे मारूती मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये. नेटकेवाडी येथे तुळजाभवानी मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये. बाभुळगाव दुमाला येथे मरिमाता मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. कोळवडी येथे नवीन अंगणवाडी बांधकाम करणे 10 लाख रूपये.


थेरवडी येथे मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. वालवड येथे महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. गोयकरवाडी येथे ज्योतिर्लिंग मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये.


गुरवपिंप्री येथे महादेव मंदिर आवारात भजनी साहित्य ठेवण्यासाठी खोली बांधणे 10 लाख रूपये.


कोरेगाव येथे सटवाई मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये. बहिरोबावाडी येथे यल्लमादेवी मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे 5 लाख रूपये.


थेटेवाडी येथे मारूती मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये.


खांडवी येथे तुकाई मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.


नागलवाडी येथे नागेश्वर मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.


सितपूर स्मशानभूमी परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये.


घुमरी येथे काळूबाई मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.


कोळवडी येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.


मिरजगाव येथे भारत विद्यालय परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये.


नवसरवाडी येथे यल्लामादेवी मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.


बारडगाव दगडी येथे सांस्कृतिक सभागृह बांधणे 10 लाख रूपये.


पाटेवाडी येथे मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.


रवळगाव येथे खंडोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.


सुपे येथे मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.


आनंदवाडी येथे गावठाणमध्ये रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख रूपये.


The post कर्जत-जामखेडसाठी 5 कोटींचा निधी : आमदार प्रा. राम शिंदे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SyqpvQ

करंजी : चोरट्यांच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील कडगाव शिवारातील वस्तीवर कापसाची चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्यांनी तेथील शेतकर्‍यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

कारभारी रामदास शिरसाट (वय 55) असे मृत्यू झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. कडगाव शिवारातील मोहजबुद्रुक-मिरी रस्त्यावर त्यांची वस्ती आहे. तेथे त्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला कापूस चोरून नेण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री चोरटे आले होते.


शेडमधील दहा-बारा कापसाच्या गोण्या या चोरट्यांनी उचलून नेऊन जवळच्या उसात ठेवल्या. यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले कारभारी शिरसाट यांना जाग आली. त्यानंतर चोरट्यानी त्यांच्यावर हल्ला केल्याने या घटनेमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना दुसर्‍या दिवशी शनिवारी शिरसाट यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यानंतर काही वेळातच पाथर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील, उपअधीक्षक प्रशांत खैरे यांनी देखील तात्काळ घटनास्थळी भेट देत, आरोपींचा कसून शोध घेण्याच्या दृष्टीने तपास यंत्रणा गतिमान केली.


श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनीही घटनास्थळी पाहणी करून तपास यंत्रणेला मदत केली.

कारभारी शिरसाट अतिशय कष्टाळू आणि गरीब शेतकरी होते. त्यांचा एक मुलगा सैन्य दलात आहे, तर दुसरा इंजिनियर आहे. वडिलांच्या मृत्यूची माहिती समजताच इंजिनियर मुलगा नगरहून कडगाव येथे आल्यानंतर कारभारी शिरसाट यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. ऐन दिवाळीच्या तोंडावर शिरसाठ यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कडगावसह परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.


कापसासाठी घेतला शेतकर्‍याचा जीव




सध्या कापसाला सात हजार रुपयांहून अधिक भाव असून, ग्रामीण भागात कापूस वेचणी जोरात सुरू आहे. अनेक शेतकरी कापूस वेचून, तो घरामध्ये अथवा पत्र्याचे शेडमध्ये साठवून ठेवतात. चांगला भाव मिळाल्यानंतर तो विक्रीसाठी व्यापार्‍याकडे नेतात. याचाच फायदा उचलत शेतकरी शिरसाट यांनी शेडमध्ये साठवून ठेवलेला कापूस चोरून नेण्यासाठी या कष्टकरी शेतकर्‍याचा जीव घेतला आहे.


हेही वाचा



* Pune News : बारामती, शिरूरमध्ये 4 कोटींची नुकसानभरपाई

* Pune News : शरद पवार गटाचा उद्या ओतूरला मेळावा

* Pune News : कुरकुंभ परिसर कायम प्रदूषणात!






The post करंजी : चोरट्यांच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Syltcq

खा स्व. विखे यांच्याबद्दल बोलून अकार्यक्षमता लपविण्याचा काहींचा प्रयत्न : ना विखे

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर साखर कारखान्याचे संस्थापक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील होते. मात्र, यांनी आता दुसरेच संस्थापक तयार करून कारखान्याचे संस्थापकच बदलले आहे असा गंभीर आरोप करीत खासदारांचे नाव घेऊन आपली अकार्यक्षमता लपविण्याचा ते प्रयत्न करत असल्याची जळजळीत टीका राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली.


लोणीहून नाशिकच्या दिशेने जात असताना संगमनेर येथील शासकीय विश्राम गृहावर काही काळ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील थांबले होते. त्यावेळी माजी खा स्व बाळासाहेब विखे पा यांनी संगमनेर तालुक्यासाठी 35 वर्षात काय केले असा सवाल माजी महसूलमंत्री आ बाळासाहेब थोरात यांनी केला. या वक्तव्यावर पत्रकारांनी मंत्री विखे पाटील यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की आपण पक्ष संघटनेला धरुन किती काम केले? तुमचे मेव्हणे लोकसभेला उमेदवारी करीत असताना तुम्ही कोणाला मते दिली हे सर्व जनतेला माहीत आहे. आज तुम्ही माजी खासदार विखे पाटील हयात नसताना तुम्ही त्यांच्या विषयी बोलतात हे निषेधार्य आहे. आपण सुसंस्कृत संस्कृतीमध्ये वाढलो आहोत, संघर्ष आपला आहे. जुन्या नेत्यांना यात ओढून आपण काय साध्य करणारआहात यावरून तुम्ही तुमचे पाप झाकण्याचा प्रयत्न करत आहात. याचाच अर्थ ‘ नाचता येईना म्हणे अंगण वाकडे’ अशी आपली अवस्था झाली असल्याची टीका मंत्री विखे यांनी माजी मंत्री आ थोरात यांचे नाव न घेता केली.


मनोज जरांगे यांच्या उपोषणावरुन सुरू झालेल्या आरक्षणाबाबत मंत्री विखे पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले की जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या निस्वार्थ आंदोलनाला महायुती सरकारने यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीही मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, माजी मंत्री अशोक चव्हाण ज्या काँग्रेस पक्षात आहे त्या पक्षाची भूमिका नेमकी काय आहे हे अगोदर ठरवावे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते वेगळे बोलतात त्यामुळे त्यांच्यातच एकमत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या पक्षाचा अजेंडा ठरवावा असा टोला मंत्री विखे पाटील यांनी माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना लगावला.


माजी मुख्यमंत्री शरद पवार हे तर मराठा आरक्षणाच्या बाबतीत काहीच बोलत नाही ओबीसींमधून आरक्षण द्यावे की स्वतंत्रपणे याविषयी त्यांनी भूमिका जाहीर करण्याची गरज आहे. तर शिवसे नेचे उद्धव ठाकरे देखील अद्यापपर्यंत गप्पच बसून आहेत.काँग्रेसची तीन तोंड तीन ठिकाणी आहे या सर्वांची मराठा आरक्षणाबाबत असलेली भूमिका नेमकी काय आहे हे जाहीर करत नाही असाही सवाल त्यांनी उपस्थित करत मंत्री विखे म्हणाले की राज्यातील महायुतीच्या सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याची बांधिलकी घेतली आहे आणि लवकरात लवकर मराठा समाजाला टिकणारे आर क्षण देण्याचे धोरण यापूर्वीच राज्य सरका रने जाहीर केले आहे आणि ते आरक्षण मराठा समाजाला दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे मंत्री विखे यांनी यावेळी ठणकावून सांगितले


राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याभेटीला राजकीय संदर्भात देणे हे चुकीचे आहे राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्षम उपक्रम मंत्री म्हणून काम करत आहे आणि त्यांच्यामुळे महायुती सरका रला चांगले बळ मिळाले आहे ते वेगळे होण्याच्या बाबत जे कोणी काही बोलत असेल ते चुकीचे आहे त्यामुळे आता राज्यात कुठल्याही प्रकारचा भूकंप होणार नाही असाही विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीउपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे नेते शरदपवार यांच्या भेटीबाबत व्यक्त केला


The post खा स्व. विखे यांच्याबद्दल बोलून अकार्यक्षमता लपविण्याचा काहींचा प्रयत्न : ना विखे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Syk7HH

Nagar Crime news : ‘त्या’ कैद्यांना 4 दिवसांची कोठडी

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर शहर पोलिस ठाण्यात असणार्‍या उपकरगृहाचे गज कापून पळालेले चारही कैदी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यात पाठलाग करून पकडले त्या कायद्यांना रात्री उशिराने संगमनेरला आणले. त्यांना काल न्यायालया मध्ये उभे केले असता न्यायालयाने त्यांना चार  दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संगमनेर उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले राहुल देवीदास काळे, रोशन रमेश ददेल उर्फ थापा, आनंद छबू ढोले व मच्छिंद्र मनाजी जाधव हे चौघे कैदी बॅरेक क्रमांक 3 मध्ये न्यायालयीन कोठडीत होते.  त्या चौघांनी कारागृहाचे दक्षिण बाजूचे गज कापून कारागृहाच्या बाहेर आले आणि कारागृहाच्या देखरेखीवर असणार्‍या गार्डलाच जीवे मारण्याची धमकी दिली आणि बाहेर उभे असलेल्या एका कारमधून पळून गेले.


संबंधित बातम्या :



* Israel-Hamas war: हमास नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे : नेतान्याहू

* नगर जिल्ह्यात पाच दिवसांत आढळल्या 85 हजारांवर कुणबी नोंदी

* अहमदनगर : २५ वर्षे खासदारकी असताना काय केले?; बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांना सवाल






कैदी पळून गेल्याची वार्ता सर्वत्र  पसरली. त्यानंतर  पोलिस प्रशासनाची झोपच उडाली. त्यानंतर संगमनेर उपविभागाचे पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी 3 पथके तयार केली तसेच अ. नगर जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक  पळून गेलेल्या कैद्यांच्या तपासासाठी रवाना केले गेले. जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने त्या चार कैद्यासह दोन साथीदार अशा सहा जणांना जळगाव जिल्ह्यातील जामनेेर भागातून राज्यात पळून जात असताना वाहनासह सिनेस्टाईल पकडले आणि नगर येथे आणण्यात आले.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडलेल्या चारही कैद्यांना रात्री संगमनेरला आणण्यात आले. त्यां च्यावर खुनाचा प्रयत्न अत्याचार पोस्को यासारखे गंभीरपणे अगोदरच आरोप दाखल होते.


पळून गेल्यानंतर पोहे कॉ. अनिल धनवट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात कायदेशीर रखवालीतून पलायन करणे या कलमानुसार गुन्हा दाखल कर ण्यात आला होता. मात्र त्यांना पकडल्यानंतर त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच कट रचने हे दोन वाढीव कलम लावण्यात आले. तसेच त्यांना मदत करणारे दोन साथीदार आशा सहा जणांना वरील गुन्ह्यात अटक केली आहे. या सहाही जणांना  संगमनेर येथील प्रथम वर्ग न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना 14 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


The post Nagar Crime news : ‘त्या’ कैद्यांना 4 दिवसांची कोठडी appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SyhQT0

महिला फसवणूक प्रकरण : गुन्हा दाखल करण्याच्या हालचालींना वेग

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  जेऊर पंचक्रोशीतील हजारो महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणाचा भांडाफोड दैनिक पुढारीने केल्यानंतर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महिलांच्या फसवणूक प्रकरणात सहभागी असणार्‍या सर्वांचे धाबे दणाणले आहेत. सदर प्रकरण उघड केल्याबद्दल पंचक्रोशीतून ‘पुढारी’वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जेऊर, ससेवाडी, वाघवाडी, चापेवाडी, म्हस्के वस्ती, मेहत्रे वस्ती, नाईक मळा, शेटे वस्ती, फुलारे मळा तसेच पंचक्रोशीतील हजारो महिलांना मसाला कंपनीत नोकरी तसेच लॅपटॉप, स्कुटी मोपेड, घरकुल, सुकन्या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. गोरगरीब महिलांनी उसनवारी करत पैसे भरले. परंतु हा सर्व प्रकार बोगस असल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.


संबंधित बातम्या  :



* वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : इंदुरीकर खटल्याची सुनावणी 21 रोजी

* Nagar : नेवाशात आरोग्य वार्‍यावर ; बीडीओ, तालुका आरोग्य अधिकारी प्रभारी






सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी फसवणूक झालेल्या महिला एकत्र येणार आहेत. त्यानंतर चर्चा करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. या प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक नेत्यांनी हॉटेलवर पार्ट्या तसेच पैशाच्या आमिषापोटी गोरगरीब महिलांच्या घरावर सणासुदीत दरोडा टाकण्याचे काम केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महिलांच्या मजुरीमागे कमिशन, टॉवरसाठी जागा घेण्याच्या आमिषाने नेते भाळले अन् महिलांची मोठी फसवणूक झाली. मुख्य सूत्रधाराला मदत करण्यास जेऊर येथील चार, तर ससेवाडी येथील राजकीय व्यक्तीचे नाव समोर येत आहे.


मुख्य सूत्रधाराच्या कॉल डिटेल्सची तसेच तोतयासोबत फिरणार्‍या नेत्यांच्या बँक अकाउंटची तपासणी केल्यास यातील बरेच सत्य समोर येईल, अशी मागणी देखील महिलांकडून करण्यात येत आहे. अनेक महिलांनी संबंधित गाव नेत्यांकडे ऑनलाइन पैसे जमा केल्याची चर्चा आहे. दरम्यान, मसाला कंपनी टाकण्यासाठी ग्रामपंचायतीकडे परवानगीसाठी कोणताही अर्ज आलेला नाही, तसेच कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. असा खुलासा सरपंच ज्योती तोडमल, उपसरपंच श्रीतेश पवार व काही ग्रामपंचायत सदस्यांकडून करण्यात आला आहे. सदर प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर जेऊर पंचक्रोशीसह संपूर्ण नगर तालुक्यातून सोशल मीडिया, मोबाईलद्वारे दैनिक पुढारीचे अभिनंदन करण्यात येत होते. फसवणूक झालेल्या महिला संपर्क साधून आमची कशाप्रकारे फसवणूक झाली त्याची माहिती प्रस्तुत वार्ताहराला देत होत्या.


स्थानिक मदतीशिवाय ‘गंडा’ अशक्य

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या तोतया अधिकार्‍याला पूर्ण कल्पना होती की पैसे गोळा करण्यासाठी स्थानिक नेत्यांना हाताशी धरावे लागेल. त्यासाठी त्याने पार्टी, आर्थिक आमिष, कमिशन, जागा भाडेतत्त्वावर घेण्याचे, टॉवरचे आदी प्रलोभने दाखवली आणि त्यालाच भाळून नेत्यांनी गल्लोगल्ली मिटिंगा घेत पैसे गोळा करून दिल्याचे समजते.

दैनिक पुढारी वृत्तपत्रामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या होणार्‍या फसवणुकीच्या प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे. त्यामुळे यापुढे असे प्रकार होणार नाहीत. जेऊर परिसरातील प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. दैनिक पुढारीचे अभिनंदन.

-बाळासाहेब पवार, अध्यक्ष, एकलव्य संस्था, जेऊर


ग्रामपंचायतीतर्फे सदर प्रकरणी पोलिसांना निवेदन देण्यात येणार आहे. गोरगरीब, मजुरी करणार्‍या महिलांच्या पैशावर डल्ला मारणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे. सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे.

-ज्योती तोडमल, सरपंच, जेऊर


The post महिला फसवणूक प्रकरण : गुन्हा दाखल करण्याच्या हालचालींना वेग appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Syf5Bv

21 गावांच्या पाणीप्रश्नी मंत्री विखेंना साकडे !

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  तळेगावसह परिसरातील 21 गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी योजनेला निळवंडे धरणातून थेट पाणी पुरवठा करण्यास शासनाने मंजुरी द्यावी, या मागणीचे 17 ग्रामपंचायतींनी ठराव करुन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांना साकडे घातले. या संदर्भात मंत्री विखे यांची 17 गावांचे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी भेट घेत या मागणीचे निवेदन सादर केले. या गावांना भेडसावणारी पाणी टंचाई, पाणी पुरवठा योजनेकडे थकीत वीज बिल व ग्रामपंचायतींनी केलेल्या पाठपुराव्याचे कागदपत्र, पालकमंत्र्यांना पुन्हा नव्याने ठरावासह सुपूर्त केले. वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांना कायमस्वरुपी पाणी मिळावे, या उद्देशाने सर्व गावांनी एकत्र येवून केलेल्या मागणीला पुन्हा एकदा महत्व प्राप्त झाले आहे.


तळेगावसह पंचक्रोशित 21 गावे गेली अनेक वर्षे पाण्यापासून वंचित होती. या गावांना प्रवरा नदी हा पाण्याचा उद्भव मानून तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. यामुळे गावांना दिलासा मिळाला तरी, योजनेपुढे थकित विजबिलामुळे निर्माण होणार्‍या समस्यांमुळे योजना यशस्वी चालू शकत नसल्याची बाब शिष्टमंडळाने मंत्री विखे यांच्या निदर्शनास आणून दिली. सद्य परिस्थितीत या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेपुढे वीज बिल थकबाकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 9 कोटी 72 लाख रुपयांचे वीज बील सध्या योजनेकडे थकीत असल्याने वीजप्रवाह खंडीत करण्याच्या नोटीसा सतत देण्यात येतात. त्यातच योजनेकरीता पाण्याचा उद्भव प्रवरा नदी पात्रातून असला तरी, निंबाळे व वडगावपान या दोन ठिकाणांहून पाणी पंपिंग करुन उचलून न्यावे लागत असल्याने यासाठी लागणारा वीज खर्च योजनेवर पडत आहे. पाण्याचा उद्भव ते प्रत्यक्ष तलाव यातील अंतर मोठे असल्याने बहुतेकवेळा पाईपलाईनमध्ये होणार्‍या बिघाड दुरुस्तीचा खर्च योजनेवर पडत आहे.


या पार्श्वभूमीवर सर्व गावांनी निळवंडे धरणातून संगमनेर शहरापर्यंत आलेल्या पाईपलाईनचा संदर्भ देवून हिच पाईपलाईन पुढे तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या वडगावपान येथील तलावास जोडल्यास नैसर्गिक प्रवाहाने योजनेत पाणी उपलब्ध होवू शकते. शहरापासून पाईपलाईन टाकण्याचा खर्च कमी येईल. निळवंडे धरणातील पाण्यावर तळेगावसह पंचक्रोशितील गावांचा हक्क व अधिकार असल्याने अनेक वर्षांची मागणी शासनाने पुर्ण करावी. पाईप लाईन टाकण्यास होणार्‍या खर्चास निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे गावकर्‍यांकडून यावेळी करण्यात आली. यावर मंत्री विखे यांनी सकारात्मक बोल ऐकविले.


हेही वाचा :



* Pandharpur Kartik Wari: उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्तिक एकादशीच्या पूजेला मराठा समाजाचा विरोध

* Hindi tv stars Diwali Celebration : हिंदी कलाकारांनी जागवल्या दिवाळीच्या आठवणी






The post 21 गावांच्या पाणीप्रश्नी मंत्री विखेंना साकडे ! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SybTsN

धक्कादायक बातमी : संगमनेरच्या कारागृहातून चार कायद्यांचे पलायन

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : येथील संगमनेर कारागृहाचे गज कापून संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील अत्याचार प्रकरणातील रोशन थापा ददेल अनिल ढोले, तालुका पोलीस ठाण्यातील खुन प्रकरणातील राहुल देविदास काळे आणि घारगाव पोलीस ठाण्यातील आत्महत्या करण्यास प्रवृत्त प्रकरणातील मच्छिंद्र जाधव असे चार कैदी पळाले असल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.  त्यामुळे पोलीस प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणले आहे.


संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या लगत कैद्यांना ठेवण्यासाठी कारागृह बनविण्यात आले आहे. या कारागृहात सध्या संगमनेर शहर तालुका घारगाव या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कैदी ठेवले जात आहे.  सध्या मात्र कोपरगाव कारागृहाचे काम सुरू असल्यामुळे कोपरगाव व शिर्डीमधील अनेक कैदी संगमनेरच्या कारागृहात ठेवण्यात आलेले आहे.  मध्यंतरी दोन ते तीन वेळा शिर्डीच्या कैद्यांनी कारागृहाच्या बंदोबस्तावरती असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ तसेच धमक्या देण्याचे प्रकारही घडलेले आहे.


याबाबत कारागृह बंदोबस्तावरील पोलीस  कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना या गोष्टींची कल्पना दिली होती परंतू वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत दखल न घेतल्यामुळे आरोपींचे चांगलेच फावले आणि त्यातूनच हा प्रकार घडला असावा अशी चर्चा आता सर्वत्र होत असल्याचे दिसून येत आहे.

संगमनेर कारागृहाच्या बंदोबस्तासाठी बुधवारी पहाटेपर्यंत जेल गार्ड म्हणून संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे राजू गोडे, घारगाव पोलीस कर्मचारी राजेंद्र मेंगाळ आणि महिला पोलीस कर्मचारी भांगरे यांची कारागृह रक्षक म्हणून नेमणूक करण्यातआली होती.


पोलीस कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रात्री कैंद्यांची मोजदाद केली असता संख्या बरोबर होती. त्यानंतर पोलीस कर्मचारी निवांत राहीले. या दरम्यान पलायन करणाऱ्या कैद्यांनी कारागृहातील इतर कैदी झोपेत असताना कारागृहाचे गज कापून बुधवारी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पलायन केले. त्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार तथा कारागृह निरीक्षक पोलीस उपधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी तात्काळ कारागृहाला भेट देत पाहणी केली.


पळून गेलेल्या कैद्यांच्या शोधासाठी चार ते पाच पथके रवाना केले असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. हे मोठ्या गुन्ह्यातील आरोपी असून कोणाला आढळल्यास संगमनेर शहर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन मथुरे यांनी केले आहे.


हेही वाचा



* समुद्रतळाशी सापडली हजारो प्राचीन नाणी!

* ‘हबल’ने टिपली गुरू ग्रहाची निळसर प्रतिमा

* तेलंगणा निवडणुकीसाठी भाजपची चौथी यादी जाहीर






The post धक्कादायक बातमी : संगमनेरच्या कारागृहातून चार कायद्यांचे पलायन appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SyXsH7

नगर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी शाळेत सापडल्या 14 कुणबी नोंदी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शासनाच्या सूचनांनुसार नगर जिल्ह्यात कुणबी दस्तावेज तपासणी कक्ष तसेच जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. काल रविवारी सुटी असतानादेखील समितीचे सदस्य तथा ‘प्राथमिक’चे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व ‘माध्यमिक’चे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सारोळा-कासार येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन 1967 पूर्वीच्या कुणबी उल्लेख असल्याच्या नोंदी शोधण्याचे काम केले. या वेळी 1910 मधील 14 कुणबी नोंदी आढळल्या आहेत. राज्यातील मराठा समाजाला कुणबीचे सरसकट दाखले मिळावेत, या मागणीसाठी मोठे जनआंदोलन पुकारले गेले.


संबंधित बातम्या :



* कराड : १२ पैकी ८ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा विजय; काँग्रेसकडे तीन तर भाजपाकडे एक ग्रामपंचायत

* Maratha Reservation : जरांगे पाटील पुन्हा राज्यभर करणार दौरा






शासनाने या मागणीची दखल घेताना ‘कुणबी’ दस्तावेज शोधण्यावर भर दिला आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र कक्षाची निर्मिती करणे व जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. यातील शालेय दस्तावेज तपासणीसाठी शिक्षणाधिकारी अशोक कडूस व शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात चार दिवसांचा मायक्रो प्लॅन तयार केला आहे.


रविवारी सारोळा कासार येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय दप्तरात जुन्या नोंदींची तपासणी केली. यावेळी गट शिक्षणाधिकारी बाबूराव जाधव, सरपंच आरती कडूस, रवींद्र कडूस, केंद्रप्रमुख सुभाष काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ऐश्वर्य मैड, मुख्याध्यापक वैजनाथ धामणे, बाबासाहेब धामणे आदी उपस्थित होते. या ठिकाणी 1910 मधील 14 कुणबीच्या नोंदी आढळल्या आहेत.



सीईओंच्या मार्गदर्शनात 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सारोळे कासार शाळेत आम्ही गेलो होतो. त्या ठिकाणी 1910 च्या दरम्यानच्या तत्कालीन 14 विद्यार्थ्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. आपल्या सर्व शाळांकडे जुने रेकॉर्ड आहे. येत्या तीन-चार दिवसांत शाळानिहाय अशी पडताळणी केली जाईल. केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापकांना त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे.

                                                – अशोक कडूस, शिक्षणाधिकारी माध्यमिक


सारोळा कासारचा ब्रिटिशकालीन सर्व्हे काय सांगतो

अहमदनगर शहरापासून दक्षिणेला 20 कि.मी. अंतरावर सारोळा कासार हे गाव आहे. या गावाचा एक सर्व्हे ब्रिटिश सरकारच्या काळात 1928-29 मध्ये झाला होता. त्या सर्व्हेवर आधारित ‘सारोळा कासार स्टडी ऑफ अ डेक्कन व्हिलेज इन द फेमिन झोन’ हे 500 पानी इंग्रजी पुस्तक 1938मध्ये तत्कालीन कलेक्टर ए. एम. मॅकमिलन यांनी प्रकाशित केले होते. तत्कालीन बॉम्बे गव्हर्नरच्या आदेशाने तत्कालीन मामलेदार एल. बी. जगलपुरे व सारोळा कासारचे भूमिपुत्र असलेले सब रजिस्ट्रार के. डी. काळे यांनी हा सर्व्हे केला होता. त्या पुस्तकात पान नंबर 379 वर मराठ्यांचा उल्लेख कुणबी असा केलेला आहे. कुणबी हा शब्द या प्रदेशात इतर जाती किंवा वर्गाच्या शेती करणार्‍यांना लागू होत नाही. असाही स्पष्ट उल्लेख या पुस्तकात आहे. सदर पुस्तक भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचे सांगितले जाते.


शालेय सर्वसाधारण नोंदवहीची पडताळणी सुरू

1967 पूर्वीच्या कुणबीच्या नोंदी तपासणीसाठी शिक्षण विभाग तत्परतेने काम करत आहेत. शिक्षणाधिकारी कडूस, पाटील यांच्या सूचनांनुसार प्रत्येक केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि त्या-त्या शाळांचे मुख्याध्यापक यांनी त्यांच्या शाळांचे जुने रेकॉर्ड पाहून तशा कुणबी नोंदी शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना आवश्यक ते मार्गदर्शनही करण्यात आले आहे. मोडी लिपीने नोंद असेल तर जाणकार टीम पडताळणी करणार आहे. प्रत्येक शाळेकडे रेकॉर्ड असल्याने तीन-चार दिवसांत शोधमोहीम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.


The post नगर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी शाळेत सापडल्या 14 कुणबी नोंदी appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SyVDZh

Grampanchayat Result : गुंजाळवाडी आश्वी बुद्रुक व पिंपळगाव कोंझिरा आ थोरात गटाकडे

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गुंजाळ वाडी अश्वी बुद्रुक व पिंपळगाव कोंझिरा या तीन ग्रामपंचायती माजी महसूल मंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आबाळासाहेब थोरात यांच्या गटाकडे आल्या तर शिर्डी मतदारसंघातील आश्वी खुर्द आणि पठार भागातील घारगाव ग्रामपंचायत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटा कडे आले आहेत तर बिनविरोध झालेल्या दोन ग्रामपंचायती थोरात गटाकडे आल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गुंजाळ वाडी ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने खाते उघडले आणि जनतेतून निवडून येणाऱ्या सरपंच पदाचे उमेदवार नरेंद्र उर्फ अमोल संभाजी गुंजाळ हे विजयी झाले आहे तर त्यांच्या शेतकरी विकास मंडळाचे सदस्य पदाचे सर्व उमेदवार विजयी झाले आहे.


संबंधित बातम्या :



* St Bus Strike : सदावर्तेच्या संपाच्या हाकेला अन्य एस. टी. संघटनांचा विरोध

* महत्त्वाची बातमी ! जेईई मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल

* Gram Panchayat Election 2023 : खानापूर तालुका निकाल : साळशिंगे सरपंचपदी छाया पवार तर भेंडवडे गावठाणच्या सरपंचपदी वैभव जानकर विजयी






मात्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व प्रथमच गुंजाळवाडी ग्रामपंचायती मध्ये जनसेवा मंडळाचे रोहिदास रेवजी गुंजाळ यांना सरपंच पदाची उमेदवारी दिली होती तसेच सदस्य पदाचे काही उमेदवार उभे केले होते मात्र मतदारांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना नाकारत पुन्हा एकदा काँग्रेसच्या हाती एक हाती सत्ता दिली आहे आणि भाजपच्या सर्व उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले


शिर्डी मतदार संघातील आश्वी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाच्या सरपंच पदाच्या उमेदवार अलका बापूसाहेब गायकवाड यांच्यासह १० सदस्य निवडून आले आहे तर काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना अवघ्या एका जागेवर समा धान मानावे लागले आहे.


तर आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाचे रवींद्र सुभाष बर्डे यांचा पराभव करत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आबाळा साहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाचे सरपंच पदाचे उमेदवार नामदेव किसन शिंदे हे अवघ्या १२ मताने विजयी झाले आहे तर सदस्य पदाच्या निवडणु कीत १५ जागांपैकी १० जागा आमदार थोरात गटाला मिळाल्या तर अवघ्या ५ जागांवर ना विखे गटाला समाधान मानावे लागले.


संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असणाऱ्या घारगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाज पचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य जना र्दन आहेर यांचे बंधू आणि माजी सरपंच अर्चना आहेर यांचे पती नितीन म्हातारबा आहेर हे विजयी झाले आहे तर त्यांच्याच गटाच्या सदस्य पदाच्या सर्व जागाविजयी झाल्या आहेत तर विरोधी असलेलेकाँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाचे सरपंचपदाचे सर्वच उमेदवारांना पराभ वाचा सामना करावा लागला. संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार सह सर्व सदस्य पदाचे उमेदवार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ बाळासाहेब थोरात यांच्याच गटाचे आले आहेत तर विरोधी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जन सेवा मंडळाचे गटाला सरपंचपदासह सदस्य पदांची एकही जागा मिळवता आली नाही सर्व उमेदवारांचा पराभव करण्यात झाला आहे


The post Grampanchayat Result : गुंजाळवाडी आश्वी बुद्रुक व पिंपळगाव कोंझिरा आ थोरात गटाकडे appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SyRb3k

कोपरगाव : शेती पाण्यासाठी एकजूट दाखवावी

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : लाखांचा पोशिंदा हा शेतकरी आहे. त्याच्या शेतीच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि तुटीच्या गोदावरी खोर्‍यात पाण्यांची उपलब्धता निर्माण होण्यासाठी पंथ, झेंडे, आपसातील मतभेद बाजुला ठेवून सर्वपक्षीयांनी नगर- नाशिकची एकजूट दाखवावी, असे प्रतिपादन भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी केले. गोदावरी खोर्‍यासाठी अन्यायकारी असणारा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा रद्द करावा. मेंढेगिरी समितीने बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले.


तेव्हा या समितीच्या शिफारशीनुसार चालु वर्षी पर्जन्यमान अत्यल्प झाल्याने जायकवाडीला उर्ध्व गोदावरी खोर्‍यातून पाणी सोडू नये, असेही त्या म्हणाल्या. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसिल कार्यालयासमोर शुक्रवारी गोदावरी खोरे पाणी कृती समितीच्यावतीने एकदिवसीय लाक्षणीक उपोषण करण्यात आले. त्याचे निवेदन नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे व तहसिलदार संदिप भोसले यांना देण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. गोदावरी खोरे पाणी कृती समितीच्या झेंड्याचे यावेळी अनावरण करण्यात आले.


प्रारंभी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी उपस्थितांना लाक्षणिक उपोषणाची भूमिका समजावली. संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदिप नवले यांनी प्रास्तविकात कोल्हे कुटुबियांनी पाणी संघर्ष व जलसमृध्दीसाठी काय कामे केली याची माहिती दिली. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करून लाक्षणिक उपोषणास सुरुवात करण्यात आली. कोपरगाव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोस, माजी सभापती सुनिल देवकर, उत्तमराव चरमळ यांनी ‘गोदावरी कालव्यांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे’ आदी घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.


सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी तुटीच्या गोदावरी खोर्‍यात पाण्याची समृध्दी निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे वाढत्या शहरीकरण, औद्योगिकीकरणामुळे दारणा गंगापूर धरणांवर वाढणारे बिगर सिंचन आरक्षणामुळे हक्काच्या गोदावरी कालव्यांच्या 11 टीएमसी पाण्यात घट झाली. त्याची तुट भरून काढीत 9 टीएमसी पाणी उपलब्ध केले. त्यामुळे 35 वर्षे गोदावरी कालवे लाभधारक शेतकर्‍यासह पिण्यासाठी व औद्योगिकीकरणासाठी कमतरता कधीच जानवू दिली नाही. यावेळी शेतकरी उपस्थित होते.


पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवा : विवेक कोल्हे




गोदावरी खोर्‍यावर सातत्याने बिगर सिंचन पाण्याचे आरक्षण टाकून

मायबाप सरकारने शेतकर्‍यांना हक्काच्या शेती पाण्यापासून वंचित ठेवू नये, आमच्या व्यथा समजुन घ्या. जायकवाडीला पाणी सोडू नका, ज्याप्रमाणे नागपूर- मुंबई समृध्दी महामार्ग बनविला. त्याच धर्तीवर पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळवून शेतकर्‍यांच्या जीवनांत आनंद निर्माण करून नगर- नाशिक विरुद्ध मराठवाडा प्रादेशिक पाणी वाद कमी करावा, असे विवेक कोल्हे म्हणताच लाक्षणिक उपोषणकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याला प्रतिसाद दिला.


आमदार जागे व्हा, झोपेचे सोंग घेऊ नका




जायकवाडीच्या पाण्यासाठी तेथील लोकप्रतिनिधींची एकजूट आहे, मग

आम्ही सातत्याने आवाहन करून येथील आमदार झोपेचे सोंग घेत आहेत काय? सर्वांनी एक व्हा, बळीराजाचा टाहो त्यांनी ऐकावा. आम्हाला पाऊस नाही, पाणी नाही, हक्काचे ब्लॉक नाही, शेती सिंचन व्यवस्थेसाठी अधिकारी नाही, तेव्हा चालू हंगामात जेमतेम पाणी आहे ते तरी सोडू नका, कालवे सल्लागार बैठक तात्काळ घेवून रब्बीचे तीन आणि उन्हाळ दोन असे पाच आर्वतने तात्काळ द्या, असे स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.


हेही वाचा 


छत्रपती संभाजीनगर: पैठणमध्ये कृषी सेवा केंद्रे बंद, रब्बी हंगामाची कामे ठप्प


Nagar News : जिल्हा दुष्काळी उपायोजनांपासून वंचित; आमदार नीलेश लंके यांचा आरोप


Nagar News : खंडपीठाची जिल्हाधिकार्‍यांना नोटीस


The post कोपरगाव : शेती पाण्यासाठी एकजूट दाखवावी appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SyNzHl

महत्वाची बातमी ! खासगी ट्रॅवल्सनी दिवाळीत जादा भाडे घेतल्यास इथे करा तक्रार

नगर : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीत हंगामात जादा भाडे आकारणी करु नका असा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिला आहे. प्रवाशांनी तक्रार केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. जादा भाडे आकारणी झाल्यास तत्काळ तक्रार दाखल करा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.


महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गाचे टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणार्‍या प्रतिकिलोमीटर भाडे दराच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाने सन 2018 रोजी शासननिर्णय निर्गमित करुन निश्चित केले आहेत. दिवाळीत गर्दीच्या हंगामाच्या काळात खासगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केली जात असल्यास संबंधित प्रवाशांनी dycommr.enf2gmail.com या इमेल वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी प्रवाशांना केले. खासगी बस मालकांनी शासन निर्णयानुसार पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भाड्याबाबतचा विहित नमुन्यात तक्ता तयार करावा. प्रतीआसन दर दर्शवून खासगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात, त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात यावा. तसेच प्रवाशांच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांकही प्रदर्शित करावा, असेही त्यांनी निर्देश दिले.


हे ही वाचा :



* Nagar : ग्रामपंचायतींचा प्रचार थंडावला ; रविवारी मतदान

* Pimpri News : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो; केंद्राकडून 410 कोटी






The post महत्वाची बातमी ! खासगी ट्रॅवल्सनी दिवाळीत जादा भाडे घेतल्यास इथे करा तक्रार appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SyM3MP

Nagar News : शेतकर्‍यांची मका काढणीची लगबग

रूईछत्तीशी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील रूईछत्तीशी, वाटेफळ, मठपिंप्री, हातवळण, वडगाव, गुणवडी परिसरात सध्या मका काढणीला वेग आला आहे. उशिरा झालेल्या पावसाने खरीप हंगामातील मका पीक बहरले होते. मृग व रोहिणी नक्षत्रात पाऊस न पडल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. मात्र, नंतर पाऊस झाल्याने खरीप हंगामाने जोर धरला होता. आता सध्या सर्वत्र मका कढणीची लगबग सुरू असून, रब्बी हंगामातील हरभरा पिकावर शेतकर्‍यांची मदार असणार आहे.


जास्त पाऊस नसल्याने पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे गहू, कांदा ही पाण्यावर आधारित पिके जास्त घेतली जाणार नाहीत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पन्न साधणार नाही. अजून एक महिन्यात पाण्याचा उपसा होणार असल्याने शेतकर्‍यांना मोठा दुष्काळ जाणवणार आहे. हरभरा पिकाला एक किंवा दोन पाणी दिले तरी पीक जोमाने येते. यंदा हरभरा पिकाचा पेरा वाढणार आहे. मक्याचे उत्पन्न चांगले होणार असल्याने रब्बीपेक्षा खरीप हंगाम शेतकर्‍यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणार आहे. उन्हाळ्यात जनावरांच्या चार्‍याची अडचण येणार असल्याने मक्याची भुकटी करून साठवून ठेवली जाते. उन्हाळ्यात जनावरांना हेच खाद्य वापरले जाते. सध्या थंडीचा जोर वाढल्याने हरभरा पिकाची पेरणी झाल्यानंतर पीक बहरणार आहे. अजून आठ ते दहा दिवसांत शेताची पूर्णपणे मशागत झाल्यानंतर हरभर्‍याची पेरणी सुरु होणार आहे.


जानेवारीत येणार पाण्याची अडचण

जानेवारी महिन्यात पाण्याची अडचण येणार असल्याने यंदाचा उन्हाळा भीषण जाणार आहे. जनावरांच्या चार्‍याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. दूध व्यवसाय धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. रब्बी पेरणीसाठी शेतातील मक्याचे पीक काढून शेत मोकळे केले जात आहे.


The post Nagar News : शेतकर्‍यांची मका काढणीची लगबग appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SyJfV9

संगमनेर येथील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : फटाक्याचा स्टॉल लावण्यासाठी परवाना देताना ८०० रुपयांची लाच मागणाऱ्या संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यास नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ अटक केली.


दिवाळी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे फटाक्याचा स्टॉल लावण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग सुरू आहे. स्टॉल लावण्यासाठी पोलीसांची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर तहसिलदार कार्यालय आणि कलेक्टर ऑफिसमधून परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे स्टॉल लावण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी तक्रारदार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गेला होता. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव याने त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने अहमदनगर येथील लातूर प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला व याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार अहमदनगर येथील लाचलुच प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रवीणकुमार लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सुरू होते.


हेही वाचा : 



* नागपूर : अनैतिक संबंधातून पत्नीचा खून

* छत्रपती संभाजीनगर : परिचारिकेने बॅन्डेज कापताना चक्क बाळाची कापली करंगळी

* रायगड : खोटी कागदपत्रे बनवून भारतात राहणाऱ्या युगांडातील महिलेला ६ महिन्याचा कारावास






The post संगमनेर येथील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना 'लाचलुचपत'च्या जाळ्यात appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SyDf6s