अहमदगर : चार मुलांच्या मृत्यू प्रकरणी वायरमनसह तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
https://ift.tt/ZjxdE7Aसंगमनेर; पुढारी वृत्तसेवा : चार मुलांचा बळी घेण्यात दोषी असणाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर घारगाव पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीचा वायरमन विजय सयाजी भालेराव (रा पोहेगाव ता. कोपरगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेशी संबंधित आणखी दोन आरोपी जालिंदर लेंडे व साहेबराव लेंडे (रा. नांदूर खंदरमाळ) हे दोघेजण फरार आहेत. या तीघाजणांविरूद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील नांदूरखंदर माळ परिसरातील बंधाऱ्याजवळ अनेक दिवसापासून विजेची तार तुटून पडलेली होती. याबाबत अरुण बर्डे यांनी महावितरणच्या घारगाव येथील उपकेंद्रात जाऊन याबाबतची माहिती दिली होती. तरीसुद्धा नांदूर खंदरमाळ भागाचे वायरमन विजय भालेराव याने याकडे दुर्लक्ष केले.
तुटलेल्या तारेपासून धोका होता. यामुळे एखाद्याचा मृत्यू होवू शकतो हे माहित असताना देखील जालिंदर लेंडे आणि साहेबराव लेंडे या दोघांनी विजेच्या रोहित्रावरील वीज पुरवठा चालु करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तुटलेल्या तारेमधुन विद्युतप्रवाह चालू झाला आणि त्या बंधार्यावर खेळण्यासाठी गेलेल्या अनिकेत अरुण बर्डे (वय 12) ओमकार अरुण बर्डे (वय 10), दर्शन अजित बर्डे (वय 8 ), विराज अजित बर्डे (वय 6, रा. खंदरमाळवाडी, जि. अहमदनगर) या चारही सख्ख्या चुलत भावंडांना विजेचा धक्का बसून चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात अरुण हौशीराम बर्डे आणि अजित बर्डे यांनी याबाबत फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी वायरमन विजय सयाजी भालेराव (रा. पोहेगाव, जि अहमदनगर) तसेच शेतकरी जालिंदर लेंडे आणि साहेबराव शिवाजी लेंडे या दोघांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी वायरमन भालेराव यास अटक केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली घारगावचे पो. नि सुनील पाटील हे करत आहेत.
हेही वाचा
- सध्याच्या राजकीय घडामोडींवर मनसैनिकांना व्यक्त न होण्याचे राज ठाकरेंचे आदेश
- परभणी : गंगाखेड येथे ईद-ए- मिलादुन्नबीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम
- PM Modi In Gujarat : गुजरात दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतले कूलदेवीचे दर्शन; ‘ही’ आहे मोदी यांची कूलदेवता
The post अहमदगर : चार मुलांच्या मृत्यू प्रकरणी वायरमनसह तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/ojW7ISw
via IFTTT
0 Comments: