उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज : ना. राधाकृष्ण विखे पाटील

October 09, 2022 0 Comments

https://ift.tt/Fitb4EN

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आता केंद्र सरकारवर आरोप करण्यापलीकडे काय शिल्लक आहे. त्यांनी जनाधार आणि,सरकार गमावले आहे. आता त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर खंदरमाळ येथील आभाळवाडीच्या चार निष्पाप लहान शाळकरी मुलांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. या मुलांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आले होते.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरते गोठवले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी-पूर्व निवडणुकीत हे चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी यात केंद्र सरकार हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आतापर्यंत दुर्दैवाने चुकीचे सल्लागार मिळाले.

त्यांचे प्रवक्ते बेताल विधाने करत होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा गोठवले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी जे काही शिल्लक राहिले आहे ते टिकवण्याची जबाबदारी पार पाडावी असा सल्लाही विखे यांनी दिला. सत्याचा नेहमीच विजय होतो. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दृष्टीने हा फार मोठा विजय आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मोठा नैतिक पराभव असल्याचे महसूलमंत्री विखे यांनी सांगितले

The post उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज : ना. राधाकृष्ण विखे पाटील appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/9KjkZ0C
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: