उपमुख्यमंत्र्यांविरोधात होणाऱ्या आंदोलनात हिंसा, ८ जणांचा मृत्यु; रोहित पवार संतापले, कारवाईची केली मागणी

October 04, 2021 , 0 Comments

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या निदर्शनामध्ये हिंसा आणि जाळपोळ झाली आहे.

निदर्शनामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यात सहभागी असलेल्या वाहनाने शेतकऱ्यांना चिरडले, तसेच मंत्र्याचा मुलगा आणि नातेवाईक त्या वाहनात बसले होते.

या घटनेनंतर या भागात हिंसाचार सुरू झाला आणि वाहने जाळण्यात आली. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लखीमपूर खेरीचे अतिरिक्त एसपी अरुण कुमार यांनी सांगितले की, बनवारीपूर कोलाहलात ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाडीत असणाऱ्या चार लोकांचाही मृत्यु झाला आहे.

या घटनेत आठ शेतकरीही जखमी झाल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे. शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चाने ट्विट केले, ‘उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचा शेतकरी निषेध करत रस्त्याच्या कडेला मंत्र्यांच्या ताफ्याच्या वाहनांनी शेतकऱ्यांना चिरडले आहे, यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. आणि ८ शेतकरी गंभीर जखमी आहेत. .

लखीमपूर खेरी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ललित कुमार यांनी सांगितले की, दोन लोकांना मृत आणले गेले आणि एक गंभीर जखमी आहे. त्याचवेळी डॉ.कुमार म्हणाले, ‘शवविच्छेदन झालेले नाही.’

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी, जे याच भागातील आहेत, त्यांनी त्यांच्या गावात एक कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार होते.

शेतकरी संघटनेचे नेते डॉ दर्शन पाल म्हणाले, ‘यूपीच्या उपमुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरवर जाण्यापासून रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी हेलिपॅडचा घेराव केला होता. कार्यक्रम संपल्यानंतर बहुतेक लोक परत जात होते. तीन गाड्या आल्या आणि शेतकऱ्यांच्या अंगावरुन गेल्या. एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.

त्याचवेळी ते म्हणाले, संयुक्त किसान मोर्चाचे नेते तजिंदर सिंह विर्क हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांना लखीमपूर खेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेवर ट्विट केले आहे की, ‘जो हा अमानुष हत्याकांड पाहूनही गप्प आहे, तो आधीच मेला आहे. पण आम्ही हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही – किसान सत्याग्रह जिंदाबाद! ‘

तसेच या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहित पवार यांनीही संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कृषी कायद्यांविरोधात संविधानाने दिलेल्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या गाडीने चिरडल्याची बातमी अत्यंत संतापजनक आहे.

यामुळं काल गांधी जयंतीला गोडसेचा ट्रेंड चालवून हिंसेचं उदात्तीकरण करणाऱ्या अहंकारी लोकांचा खरा चेहरा पुढं आला. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. उत्तर प्रदेश सरकारने या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, असे रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

शाहरूखचा मुलगा आर्यन आता पुरता अडकला! त्याच्याविरोधात मजबूत पुरावे असल्याची NCB ची माहिती
गुढ वाढले! आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा तो व्यक्ती कोण?; एनसीबी म्हणते, आमचा संबंध नाही
ड्रग्स प्रकरणात मुलाला पकडल्यानंतर शाहरुख खानची धावपळ सुरु, घेतली ‘या’ वकिलांची भेट


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: