अनलॉकचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार; 'त्या' घोषणेवर वडेट्टीवार निरुत्तर

June 04, 2021 0 Comments

नागपूर: राज्यात सारखे निर्बंध उठवण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. बाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आल्याने याबाबतची घोषणा करणारे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची पंचाईत झाली आहे. वडेट्टीवार यांना काही तासांतच त्यावर परत एकदा स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. या सर्वात सरकारपातळीवर निर्णय प्रक्रियेत सुरू असलेल्या गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. ( ) वाचा: मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यात पाच टप्प्यांत उद्यापासून अनलॉक केले जाणार असल्याची घोषणा केली होती. कोविड पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेड्सची उपलब्धता या आधारावर जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली आहे व हे जिल्हे पाच टप्प्यांत लॉकडाऊनमुक्त होतील, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले होते. त्यांनी निर्बंध कसे शिथील होणार याचा संपूर्ण तपशीलही दिला होता. मात्र, या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण आलं आणि वडेट्टीवार यांची गोची झाली. 'राज्यात निर्बंध उठवण्यात आलेले नाहीत. टप्पेनिहाय निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे', असे सरकारने स्पष्ट केले. त्यामुळे एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. वाचा: मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विजय वडेट्टीवार हे नागपूरला रवाना झाले होते. दरम्यानच्या काळात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळाबाहेर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यमांची मोठी गर्दी झाली होती. राज्याचा अनलॉक प्लान जाहीर करणाऱ्या वडेट्टीवार यांनी यावेळी सारवासारव करत मोजकीच प्रतिक्रिया दिली. 'महाराष्ट्र अनलॉकचा येथे प्रश्नच उद्भवत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्हानिहाय पाच स्तरीय अनलॉक करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे आणि त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्वत: मान्यता दिलेली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत. येत्या एक-दोन दिवसांत हा आदेश जारी होईल', असे वडेट्टीवार म्हणाले. उद्यापासून १८ जिल्हे अनलॉक होणार का, असे विचारले असता त्यावर काहीच प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही. निर्बंधांबाबत सरकारचे स्पष्टीकरण करोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथील करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक द चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथील करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जाताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथील करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासननिर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील. अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथील करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: