हुश्श्..! करंजी घाटात ट्रकचा अपघात टळला
करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटातील माणिकशहा पीर बाबा दर्ग्याजवळील धोकादायक वळणाजवळ शनिवारी मध्यरात्री करंजी घाट उतरत असताना एका ट्रकला अपघात झाला. सुदैवाने या ट्रकचे पुढील दोन टायर संरक्षक काठड्याला अडकला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पुण्याकडून बीडकडे केमिकल वस्तू घेऊन जात असताना या ट्रकला करंजी येथील माणिकशाह बाबा दर्गाजवळील धोकादायक वळणावर एका कारने हुलकावणी दिली. त्यामुळे हा ट्रक धोकादायक वळणावरील संरक्षक कठड्यावर जाऊन आदळला.त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. सातत्याने या ठिकाणी जड वाहनांचे करंजी घाट उतरत असताना अपघात होत आहेत. या अपघातामुळे संबंधित वाहनाचे मोठे नुकसान होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या धोकादायक वळणाची दुरुस्ती करण्याची मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष नामदेव मुखेकर, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुभाष अकोलकर, युवक काँग्रेसचे युवा नेते प्रकाश शेलार, माजी चेअरमन उत्तमराव अकोलकर, डॉ. राजेंद्र अकोलकर, युवानेते विवेक मोरे यांनी केली.
हेही वाचा
* मुंबईत आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने इमारतीवरून उडी मारून जीवन संपविले
* पाथर्डी-मुंबई बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात; चालकासह 9 जखमी
* प्रभू श्री रामचंद्र उद्यानाला अवैध पार्किंगचा विळखा; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
http://dlvr.it/T7n8YY
0 Comments: