Crime news : जुन्या वादाचा राग अन् मित्रानेच मित्राला संपविले !
नगर : पुढारी वृत्तसेवा : मित्र आपल्या जिवलग मित्रासाठी जीव देण्याच्याही आणाभाका घेतात. परंतु, मित्रानेच जुन्या वादाचा राग मनात धरून मित्राचा खून केल्याची घटना श्रीरामपूर शहरातील संगमनेर रस्त्यावर बुधवारी (दि.4) सायंकाळी घडली. स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांच्या आत दोन संशयितांना ताब्यात घेऊन गुन्ह्याची उकल केली. डोक्यात फरशीचे घाव घालून खून करणार्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अशोक ऊर्फ बाबूरामा साळवे (रा. नॉर्दन ब्रँच, श्रीरामपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला पिंपरी चिंचवड (पुणे) येथून अटक केली. शाहरुख ऊर्फ गाठण उस्मान शाह (रा.सुभेदारवस्ती, श्रीरामपूर) हा बुधवारी सायंकाळी संगमनेर रस्त्यावर ओळखीच्या तीन ते चार लोकांसोबत बसलेला होता. त्या ठिकाणी शाहरुख व अशोक या दोघांमध्ये किरकोळ वाद झाले.त्यानंतर अशोक याने बाजूला पडलेल्या फरशीने शाहरुखच्या डोक्यात घाव घालून खून केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपास हाती घेताच काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या सूचना पथकाला दिल्या. त्यानंतर मयत शाहरुखच्या कुटुंबीयांकडून पोलिसांना माहिती मिळाली की, काही दिवसांपूर्वी शाहरुख याचे अशोक साळवेबरोबर वाद झाले होते. त्यामुळे अशोक साळवेवर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अशोकचे लोकेशन ट्रेस केले व त्याला पिंपरी चिंचवडमधून चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देत पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
हेही वाचा :
* मराठा-धनगर समाज समदुःखी : मनोज जरांगे
* Nagar : Good News ! प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन 10 ‘हिरकणी’
The post Crime news : जुन्या वादाचा राग अन् मित्रानेच मित्राला संपविले ! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sx8D7J
0 Comments: