नगर: 20 लाख 61 हजार मे. टन ऊस गाळप, अंबालिका गाळपात अव्वल; 17 लाख साखर पोत्यांची झाली निर्मिती

https://ift.tt/vKztLVj
Ambalika sugar factory first sugarcane crushing in Ahmednagar district

कोपरगाव, पुढारी वृत्तसेवा: अहमदनगर जिल्हयातील 13 साखर कारखान्यांनी 28 नोव्हेंबर पर्यंत 20 लाख 61 हजार 135 मे टन उसाचे गाळप करून त्यापासून 17 लाख 24 हजार 200 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. तर दैनंदिन साखर उतारा 8.66 असा आहे.

जिल्हयातील साखर कारखान्यांचे गाळप मे टनात, साखर पोते व दैनंदिन साखर उतारा पुढीलप्रमाणे – अंबालिका (3 लाख 95 हजार 220 मे.टन) (3 लाख 64 हजार 600 साखर पोते). (10.60 साखर उतारा), मुळा (226910) (145350), (9.88), थोरात (225780) (145350), (11.70), ज्ञानेश्वर (222560) (188800) (10.70), सहकारमहर्षि नागवडे श्रीगोंदा (165730) (135150), (9.02), पदमश्री विखे पाटील (165200) (116150), (9.65), कुकडी (123500) (103650), (9.50), अशोक (118340) (106200) (11.52), सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (109091) (97400) (9.75), वृध्देश्वर (97105) (83300), अगस्ती (86662) (78790), (10.32), केदारेश्वर (76450) (56750). (9.41), कर्मवीर शंकरराव काळे (48597) (41400), (9.31). याप्रमाणे गळीत झाले आहे.

साखरेच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला असून मागील गाळप हंगामात राज्यात तब्बल 137 लाख मे.टन साखरेचे उत्पादन झाले. क्षेत्र वाढल्याने एप्रिलअखेर हंगाम सुरुच होता. यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम 1 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे नियोजन साखर आयुक्तालयाने केले होते. त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी ऊस गाळपास सुरूवात केलेली आहे.

नगर जिल्ह्यात 13 साखर कारखाने असून त्यातील 12 कारखान्यांनी मागच्या वर्षी उसाचे गाळप केले होते. ज्या कारखान्यांनी मागील गाळप हंगामातील शेतकर्‍यांची एफआरपी 100 टक्के दिली आहे, त्यांनाच गाळपाची परवानगी यंदा देण्यात आलेली आहे. त्यामुळे कारखाने जोमाने सुरू आहेत.

इथेनॉलच्या 18 प्रकल्पांची भर

राज्यात इथेनॉल निर्मीती देखील मोठया प्रमाणांत सुरू असुन चालू वर्षी 18 नवीन प्रकल्पांची भर पडली आहे.त्यामुळे इथेनॉल निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. याचा फायदा शेतकर्‍यांनाही होणार आहे. केंद्र सरकारने इंधनामध्ये इथेनॉल मिश्रीत करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे इंधन स्वस्त होण्यास मदत मिळणार आहे.

The post नगर: 20 लाख 61 हजार मे. टन ऊस गाळप, अंबालिका गाळपात अव्वल; 17 लाख साखर पोत्यांची झाली निर्मिती appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/gDPkO8H
via IFTTT

सीमा विवाद पर बनी समिति का प्रमुख सांसद माने को बनाया,शिंदे ने दी बधाई

सांसद धैर्यशील माने को महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद पर सुप्रीम कोर्ट में दायर रिट याचिका के संबंध में महाराष्ट्र सरकार द्वारा गठित विशेषज्ञ समिति का प्रमुख नियुक्त किया गया है। https://ift.tt/BieXQYk

शेवगाव : बारा ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 8 अर्ज

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मंगळवारी (दि.29) सरपंच पदासाठी 8, तर सदस्यांसाठी 29 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्यात सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या 12 ग्रामपंचायतीसाठी मंगळवार एकूण 37 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात सरपंच पदासाठी 8 तर, सदस्य पदासाठी 29 अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल … The post शेवगाव : बारा ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 8 अर्ज appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SdbXsS

श्रीरामपुरात गतिरोधक आरोग्यास बाधक !

https://ift.tt/z0fTmxp

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरांतील रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेले गतिरोधक (स्पीड ब्रेकर) सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास त्रासदायक ठरले आहेत. प्रत्येक रस्त्यावर भरमसाठ गतिरोधक निर्माण केल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. यातून शहरात तब्बल 70 टक्के वाहन चालकांना पाठिचे आजार जडले आहेत. दरम्यान, याप्रश्नी शहरातील काही डॉक्टरांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी शहरात काही रस्त्यांचे डांबरीकरण झाले. ते कशा गुणवत्तेचे झाले, हासुद्धा संशोधनाचा विषय आहे. संगमनेर- नेवासा रस्ता वर्षांपूर्वी झाला. अडीच कोटी रुपये खर्चून डांबरीकरण केलेल्या या रस्त्याची अवघ्या वर्षात चाळण झाली. आतीा या रस्त्यावरून गाड्या चालविणे मोठे दिव्य ठरत आहे.

रस्ते डांबरीकरण झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला. तो रोखण्यास गतिरोधक बनविले. त्यास कोणाचा विरोध नाही, मात्र गतिरोधक अशास्त्रीय पद्धतीने बनविल्याने त्याचा मोठा त्रास दुचाकी व चार चाकी वाहन धारकांना होत आहे. गतिरोधकांना नको तेवढी उंची दिल्याने वाहन स्लो केले तरी ते आदळते. यातून पाठिच्या मणक्यांचा त्रास वाढला आहे. मणक्याच्या त्रासाने आजारी पडणारांची संख्या वाढत आहे. यामुळे काही डॉक्टरांचं मात्र भलं झालं. शहरातील काही अस्थिरोग तज्ज्ञांना याबाबत विचारले असता गतिरोधकांमुळे मणक्यांमध्ये गॅप पडणे, मनके सरकणे, पाठित चमक भरणे असे आजार वाढले आहेत. गेल्या वर्षभरामध्ये अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे, असे काही डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, बेलापूर रोड, कॅनॉल रोड, गोंदवणी रोड या भागात मुख्य रस्त्यांसह उपनगरात रस्त्यांवर भरमसाठ गतिरोधक आहेत. 1 किलो मीटरच्या रस्त्यावर तब्बल 20 गतिरोधक बांधण्याचा विक्रम पालिकेच्या बांधकाम विभागाने केला. यामुळे वाहनांची गती रोखण्यास चुकीच्या पद्धतीने बांधलेले काही गतिरोधक काढून शास्त्रीय पद्धतीचे कमीत- कमी गतिरोधक असावेत, अशी मागणी शहरातील जागरुा नागरिकांनी केली आहे. पालिका यप्रश्नी लक्ष घालणार का, असा सवाल आहे.

खड्डे अद्यापि जैसे थे !

नगरपालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकारी शहरात कुठेही फिरताना दिसत नाही. मुख्य अभियंता कार्यालयात सतत काही ठेकेदारांच्या घोळक्यात दिसतात. रोजंदारीवरील काही अभियंता कार्यालयात सकाळी आले की, दिवसभर गायब होतात. शहरामध्ये अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. एका संघटनेच्या इशार्‍यानंतर मुख्य रस्त्यांवरचे खड्डे बुजविले, मात्र गल्ली-बोळातील रस्त्यांवर पडलेले खड्डे अद्याप जैसे-थेच आहेत.

The post श्रीरामपुरात गतिरोधक आरोग्यास बाधक ! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/cgfyphn
via IFTTT

नगर; कामरगाव घाटात भीषण अपघात, कंटेनर रस्त्यावरच उलटला; एसटी दरीत कोसळताना सुवै

https://ift.tt/sGxj8Ea
Bus and container accident near kamargaon ahmednagar

वाळकी, पुढारी वृत्तसेवा: नगर-पुणे महामार्गावर कामरगाव येथील घाटात नगरहून पुण्याकडे चाललेल्या एसटी बस व कंटेनरचा सोमवारी (दि.२८) दुपारी १.१० च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनर रस्त्यावर उलटला, तर एसटी बस सुदैवाने दरीत कोसळण्यापासून वाचली. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून, बसमधील १४ ते १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी (दि. २८) दुपारी नगरहून पुण्याकडे चाललेल्या कंटेनर चालकाचा कामरगाव घाटात उतारावर वाहनावरील ताबा सुटल्याने तो रस्त्यावरच उलटला. त्याच्या पाठीमागून रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड आगाराची एसटी बस (क्र.एम.एच.२०, बी.एल. २००९) जात होती. कंटेनर रस्त्यावर उलटल्याने बस चालकही गडबडून गेला व त्याने बसचा वेग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उतारावर वेग नियंत्रणात आणण्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे बसची कंटेनरला धडक बसली व बस रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्याकडे गेली. मात्र, देव बलवत्तर म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाला ती बस अडकल्याने ती खोल खड्ड्यात पडण्यापासून बचावली. या बसमध्ये ५ ते ६ महिला, लहान मुले व १० ते १२ पुरुष असे प्रवास करत होते. बस खड्ड्यात कोसळण्यापासून वाचल्याने सर्वांचे प्राण बचावले. या अपघातात कंटेनरचालक अशोक ढगे (वय ३६, रा. सोलापूर) गंभीररित्या जखमी झाला आहे.

मृत्युंजयदूत धावला मदतीला

या अपघाताची माहिती मिळताच कामरगाव परिसरात मृत्युंजय दूत पुरुष असे म्हणून काम करणाऱ्या सिद्धांत आंधळे या युवकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, अपघातग्रस्त वाहनातील जखमींना बाहेर काढले. रुग्णवाहिका बोलावून गंभीर जखमी असलेल्या कंटेनर चालकाला नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. बसमधील भयभीत झालेल्या प्रवाशांनाही धीर देत त्यांनाही दुसऱ्या वाहनातून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. त्याला रमजान शेख जय आंधळे यांनीही मदत केली. त्याच वेळी महामार्गा पोलिसांशी संपर्क साधून त्यांना अपघात माहिती

थोडयाच वेळात महामार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गिरी यांनी घटनास्थळी पथक पाठविले. मृत्युंजयदूत सिद्धांत आंधळे व या पथकाने अपघातग्रस्त वाहने बाजूला करत महामार्गावरील वाहतूक अवघ्या अर्ध्या तासातच सुरळीत केली.

The post नगर; कामरगाव घाटात भीषण अपघात, कंटेनर रस्त्यावरच उलटला; एसटी दरीत कोसळताना सुवै appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/RhbrMz5
via IFTTT

कोश्यारी के बयान को लेकर संजय राउत ने बीजेपी पर एक बार फिर बोला हमला

महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी द्वारा मराठा योद्धा छत्रपति शिवाजी महाराज पर की गई टिप्पणी का मामला तूल पकड़ता जा रहा है, उनके बयान के बाद से राज्य में एक बार फिर से सियासी माहौल गरमा गया है। https://ift.tt/RwB3Pbi

नगर: महापालिकेत सत्ताधाऱ्यांना घराचा आहेर, सावेडी स्मशानभूमी भूसंपादनाला राष्ट्रवादीसह अन्य नगरसेवकांचा विरोध

https://ift.tt/gtPuvbU
NCP and other parties opposed land acquisition for savedi cremation center ahmednagar

नगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सावेडी गावासाठी ३२ कोटी रुपये खर्च दोन हेक्टर जागा भूसंपादित करण्याचा ठराव झाला. विषय चार होता, स्थान आता सत्ताधारी राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नगरसेवकांनी विरोधी दर्शविला असून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

महापालिकेची सर्वसाधारण सभा नुकतीच घेण्यात

आलीसाठी भूमी असारी याबाबत नगरसेवकांसह सामाजिक कार्यकत्यांनी पाठपुरावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर एका पदाधिकाने स्वतःची दोन हेक्टर जागा स्मशानभूमीसाठी देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार हेक्टर जागा घेण्याचा सर्वसाधारण सभेत झाला.

त्यावेळी नगरसेवक अनिल शिंदे, मदन आढाव यांनी त्यास तीव्र विरोध केला. तर, सभागृहात नगरसेवकांची संख्या कमीच होत्या. त्यात भूर्मपादनाच्या मंजुरी देण्यात आली. महापालिकेत शिवसेना राष्ट्रवादीची एकत्रित सत्ता असतानाही आज नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेच्या केला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका परवीन कुरेशी यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले भागात स्मशानभूमी उपसा महासभेत संपादनाचा विषय मंजूर करण्यात आला. त्याला माझा लेखी विरोध आहे. कारण त्या ठिकाणी क्र. ५८.५९ क्रमांकाचे आरक्षणानभूमीसाठी गेल्या अनेक वर्षापासून आरक्षित करण्यात आलेले आहे. ती जागा ताब्यात घेऊन स्मशानभूमी करण्यात यावी.

नगररचना विभागाकडून चुकीची व महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होईल अशी कार्यपद्धती सुरू आहे. त्यांच्याकडून प्रशासन व नगरसेवकांची दिशाभूल केली जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नगरसेवक समद खान यांनीही त्या ठरावाला विरोध दर्शविला आहे. स्मशानभूमीसाठी आरक्षित जागा असूनही नवीन जागा खरेदी करण्यासाठी नगररचना विभाग व पदाधिकाऱ्यांचा हालचाली आहेत. निवेदनात म्हटले आहे. त्यास आमचा लेखी विरोध आहे. दरम्यान, बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक अक्षय उनवणे यांनीही त्या ठरावास लेखी विरोध दर्शविला

मुख्यमंत्र्यांना निवेदन

सावेडी स्मशानभूमीसाठी घेण्यात आलेल्या ठरावाच्या विरोधात महापालिकेतील शिंदे गटाचे नगर- सेवक संग्राम शेळके व बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाध्यक्ष बाबूशेट टायरवाले यांनीही विरोध दर्शविला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस महार यांना निवेदन दिले आहे.

५० लाखाची जागा ३२ कोटीला दाखविली

नगररचना विभागाने आरक्षित जागा ताब्यात न घेता नवीन जागेचे भूसंपादन करण्याचे ठरविले. ती जागा नदीच्या कडेला असून, त्याची आजरोजीची किमत ४०-५० लाख रुपये आहे. नगररचना विभागाने जागेची किंमत ३२ कोटी रुपये दाखविली आहे. ती जागा ३२ कोटी रुपयास मनपाने विकत घ्यावी, असा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये नगररचनाकार व काही पदाधिकारी महापालिकेचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याच्या तयारीत आहेत, असे कुरेशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

The post नगर: महापालिकेत सत्ताधाऱ्यांना घराचा आहेर, सावेडी स्मशानभूमी भूसंपादनाला राष्ट्रवादीसह अन्य नगरसेवकांचा विरोध appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/0Bkp3S2
via IFTTT

मोठी बातमी: राज्यातील वाळू लिलाव बंद होणार, पंधरा दिवसांमध्ये नवीन वाळू धोरण

https://ift.tt/lzE7yrw
Sand auction will shut down new policy in fifteen days in maharashtra ahmednagar say vikhe patil

नगर, पुढारी वृत्तसेवा: राज्यात वाळूबाबत येत्या पंधरा दिवसांत नवीन धोरण जाहीर होणार आहे. या धोरणामध्ये वाळू लिलाव प्रक्रिया पूर्णपणे बंद असणार असल्याचे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आगामी दोन महिन्यांत जिल्ह्यातील नियोजित लिलावांना स्थगिती देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

महसूलमंत्री विखे यांनी सोमवारी (दि. २८) जिल्हाधिकारी कार्यालयात निळवंडे प्रकल्प कामकाज व गौणखनिज या विषयांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा षदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी वसीम सय्यद व सुवेंद्र गांधी उपस्थित होते.

महसूलमंत्री विखे पुढे म्हणाले की, राज्यातील विविध प्रकल्प गौण खनिजामुळे रखडू नयेत, यासाठी या प्रकल्पांसाठी गौण खनिज उपलब्ध केले जाणार आहे. यासाठी ठेकेदारांना पुरेशा प्रमाणात गौणखनिज उपलब्ध केले जाणार आहे. त्यासाठी त्यांना प्रशासनाकडून खाणपट्ट्यांची परवानगी दिली जाणार आहे. मात्र, वाहतूक व साठवणूक त्या त्या कंत्राटदारांनीच करावयाची असून, यासाठी तहसील कार्यालय स्तरावरून या वाहतूक व साठवणुकीसाठी विशेष परवानगी दिली जाणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

वाळूउपसा आणि उत्खनन सर्रासपणे सुरू आहे. या वाढत्या प्रकाराला आळा घालण्यासाठी येत्या १५ दिवसांत नवीन वाळूधोरण जाहीर होणार आहे. सध्या शासनाच्या वतीने वाळू लिलाव करून वाळू उपलब्ध केली जात आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने लिलाव आयोजित केले जात आहेत. या लिलावाला म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. अवैध उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी वाळूधोरणात बदल करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत नवीन वाळूधोरण जाहीर होणार आहे. त्यामुळे येत्या काळातील होणारे वाळू लिलाव आता स्थगित केले जाणार असल्याचे महसूलमंत्री विखे यांनी सांगितले.

The post मोठी बातमी: राज्यातील वाळू लिलाव बंद होणार, पंधरा दिवसांमध्ये नवीन वाळू धोरण appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/OQcIzkF
via IFTTT

कुरकुंभ येथे अवैध प्रवासी वाहतूक जोमात

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा :  कुरकुंभ परिसरात वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून अवैध व बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. माल वाहतुकीच्या वाहनांमधून नागरिकांची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. या गंभीर प्रकाराबाबत पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता कारवाई करण्याची गरज आहे.  अवैध व बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. सुसाट … The post कुरकुंभ येथे अवैध प्रवासी वाहतूक जोमात appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SdXQ6y

सोनई: प्रेमीयुगुलांसाठीचे आडोसे हटविले

https://ift.tt/wkOIK9P
Sonai sarpanch removes cafes shed mad for couples ahmednagar

सोनई, पुढारी वृत्तसेवा: सोनई- राहुरी रस्त्यावरील कॅफेमध्ये नव्याने तयार झालेल्या प्रेमीयुगुलांसाठी बसण्यासाठी तयार झालेले आडोसे सरपंच धनंजय वाघ व ग्रामपंचायत यंत्रणेने कारवाई करीत काढले.

सोनई-राहुरी रस्त्यावर प्रेमीयुगुलांसाठी एकांतात बसण्यासाठी कॅफे चालकांनी लाकडाचे कंपार्टमेंट व कापडी पडदे लावून आडोसे तयार केले असल्याची माहिती सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाल्याने त्यांनी कॅफेवर अचानक भेट दिली असता, तेथे प्रेमीयुगुलांना बसण्यासाठी कंपार्टमेंट तयार करून पडदे लावलेले दिसून आले. हे पडदे तत्काळ काढून ग्राहकांना बैठक व्यवस्था दिसेल अशी करण्याची सूचना करीत कारवाई केली होती.

दोन दिवसानंतर सरपंच धनंजय वाघ यांनी या कॅफेला भेट दिली असता, तेथील परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे पाहून ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी या आडोशांचे पडदे व काही लाकडी फळ्या काढून कंपार्टमेंट पारदर्शी करून कॅफेधारकाला सक्त ताकीद दिली.

The post सोनई: प्रेमीयुगुलांसाठीचे आडोसे हटविले appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/LX4gRSB
via IFTTT

कुरकुंभ येथे अवैध प्रवासी वाहतूक जोमात

https://ift.tt/I159SjC

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा :  कुरकुंभ परिसरात वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून अवैध व बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. माल वाहतुकीच्या वाहनांमधून नागरिकांची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. या गंभीर प्रकाराबाबत पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता कारवाई करण्याची गरज आहे.  अवैध व बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. सुसाट वेग, बेशिस्तपणा, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे भीषण अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. तरीही बेशिस्त वाहनचालकांना समज येत नाही. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत आहे.

प्रवाशांच्या वाहतुकीसाठी टप्पा वाहतूक, परवानाधारक विविध वाहने व एसटी बसचा उपयोग होतो. मात्र, या नियमांचे वाहनचालकांना काही घेणे देणे राहिले नाही.  लग्नाचे वर्‍हाड, मजूर कामगार, कंत्राटी कामगार, ऊस तोडणी कामगार यांच्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी सर्रास माल वाहतूक वाहनांचा वापर होत आहे. वाहनांच्या मागील बाजूस त्यांना अक्षरश कोंबून बसविले जाते. ड्रायव्हर सीटच्या वरील टपावर, मागील बाजूस फाळक्यावर बसलेले किंवा उभे असतात, हे धोकादायक आहे. कुठल्याही कारवाईला न जुमानत अशी वाहतूक केली जाते. याबाबत संबंधित प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन विभाग, स्थानिक पोलिस, वाहतूक पोलीसांनी कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

The post कुरकुंभ येथे अवैध प्रवासी वाहतूक जोमात appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/ZrBQ2Uz
via IFTTT

जवळ्यात 35 एकर उसाला आग ; शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान

जवळा : पुढारी वृत्तसेवा :  पारेनर तालुक्यातील जवळा येथे रविवारी (दि.27) गव्हाळी शिवारात जवळा-शिरूर महामार्गालगत असलेल्या शेतातील उभ्या उसाला दुपारी अचानक आग लागली. यामध्ये सुमारे 35 एकर ऊस जळून बेचिराख झाल्याची घटना घडल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जवळा येथील शेतकरी दादाभाऊ बाबाजी सालके, गव्हाळी शिवारातील गट नं 911 व परिसरातील बाळू सालके, संभाजी … The post जवळ्यात 35 एकर उसाला आग ; शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SdTMHm

कर्जत : देशमुखवाडीला 5 कोटी रुपये मंजूर ; कुकडी भूसंपादनाचा मोबदला

https://ift.tt/FBeSRD0

कर्जत : पुढारी वृत्तसेवा  :  कर्जत तालुक्यातील देशमुखवाडीतील 20.30 हेक्टर जमिनीसाठी 5 कोटी 19 लाख 77 हजार 828 रुपये एवढी भूसंपादनाची रक्कम मंजूर झाली आहे.न जमीन संपादित झालेल्या शेतकर्‍यांना येत्या काही दिवसातच या रकमेचेे वाटप केले जाणार आहे.  कुकडीच्या भूसंपादनाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कुकडी कालव्यासाठी शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या जमिनींचे भूसंपादन केले. परंतु, अनेक वर्षे या भूसंपादनाचा मोबदला शेतकर्‍यांना मिळालेला नाही आणि आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनीही याबाबत पाठपुरावा केल्याचे दिसले नाही. मात्र, रोहित पवार यांनी आमदार झाल्यानंतर याबाबत सातत्याने जलसंपदामंत्री आणि अधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला.

जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, वेगवेगळ्या भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी यांच्यासोबत सातत्याने बैठका घेऊन भूसंपादनातील अडचणी सोडवून शेतकर्‍यांना मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याचे फलित म्हणून गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा करून कोरोनाकाळात राज्याचे महसूली उत्पन्न घटले असतानाही, त्यांनी तब्बल 100 कोटींहून अधिक मोबदला शेतकर्‍यांना मिळवून दिला. याशिवाय रोहित पवार हे आमदार होण्यापूर्वी भूसंपादनाचे केवळ 2 कोटी 90 लाख रुपयेच शेतकर्‍यांना मिळाले होते.

आता कर्जत तालुक्यातील देशमुखवाडी परिसरातील जमीन संपादित झालेल्या शेतकर्‍यांसाठी 5.19 कोटी रुपये मंजूर झाले असून, आवश्यक कागदपत्रे शेतकर्‍यांकडून मागविण्यात आली आहेत. येत्या आठवड्यापासून त्याच्या वाटपाला देखील सुरुवात होणार आहे. दरम्यान, कुकडी कालव्यासाठी केलेल्या भूसंपादनाचा मोबदला अद्यापि अनेक शेतकर्‍यांना मिळालेला नाही. तोही मिळवून देण्यासाठी आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न सुरूच आहेत.

भूसंपादनाचा मोबदला देताना वेगवेगळ्या कार्यालयात असलेले प्रस्ताव एकत्रित करणे, शेतकर्‍यांची संमती मिळवणे, शोध अहवाल घेणे, जिल्हा मूल्यांकन समितीकडे दर निश्चितीसाठी प्रस्ताव सादर करणे, पंचनामा, खरेदीखत अशी अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया पार पाडावी लागते. ही प्रक्रिया सुलभ करून शेतकर्‍यांना तातडीने भूसंपादनाचा मोबदला मिळावा, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री यांची रोहित पवार यांनी भेट घेतली होती.  त्यानुसार काही दिवसांपूर्वीच महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन भूसंपादनाचा मोबदला देताना येणार्‍या अडचणी सोडवण्याबाबत चर्चा देखील झाली होती.

350 किलोमीटर चार्‍यांची स्वच्छता

कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी कुकडी कालवा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु, कालवा झाल्यापासून याची दुरुस्ती किंवा गेटची दुरुस्तीही करण्यात आली नव्हती. आमदार रोहित पवार यांनी सुमारे 350 किलोमीटर चार्‍यांची स्वच्छता करून 220 नवीन गेट बसविले. तसेच, येडगावपासून कर्जतपर्यंत कालव्यातील दगड काढून खोलीकरणाचे काम देखील पूर्ण केले.

अनेक वर्षांपासून कुकडी कालव्यात जमीन संपादित झालेल्या शेतकर्‍यांना हक्काचा मोबदला मिळत नव्हता. परंतु, महाआघाडी सरकारच्या सहकार्याने 100 कोटींहून अधिक रक्कम त्यांना मिळाली. उर्वरित शेतकर्‍यांनाही मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
                                                                           – आमदार रोहित पवार

The post कर्जत : देशमुखवाडीला 5 कोटी रुपये मंजूर ; कुकडी भूसंपादनाचा मोबदला appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/1MXEqUD
via IFTTT

पारनेर : चिकूच्या बागेत मटणाला ‘बहर’..!

https://ift.tt/9DeWLya

शशिकांत भालेकर : 

पारनेर : नगर-पुणे महामार्गावर चास-कामरगाव येथील शेतकर्‍यांनी आपल्या चिकूच्या बागेत चिकूचे उत्पन्न न घेता, थेट हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. चक्क चिकूच्या झाडाखाली खवय्यांची गर्दी होत असून, बागेत चिकूऐवजी मटणाला ‘बहर’ आल्याचे दिसून येत आहे. सर्व नियमांची पायमल्ली करत हा व्यवसाय महामार्गाच्या लगत राजरोसपणे सुरू असून, याकडे जिल्हा पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
खवय्ये आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत. चास-कामरगाव घाटात चक्क चिकूच्या बागेत परिसरातील शेतकर्‍यांनी आपापल्या शेतात चुलीवरचे मटण, जत्रा रस्सा या नावाने जोरात व्यवसाय सुरू केलेला आहे.

येथे खवय्यांची मोठी तुडुंब गर्दी होत आहे. हे व्यावसायिक चुलीवरच्या मटणासोबत आपापल्या परीने मद्यपानाचीही व्यवस्था करतात. अनेक हौशी खवय्ये मद्य सोबत घेऊन येतात. तर, जे आणत नाहीत, त्यांची येथे व्यवस्था केली जाते. चिकूच्या झाडाखाली टेबल लावून मध्यप्रेमी राजरोसपणे या ठिकाणी मद्यप्राशन करतात. हॉटेल व्यवसायिक त्यांना पाणी, ग्लास अन् सोबत लागणारा चकणा पुरविण्याचे काम करतात. मात्र, अशा प्रकारे राजरोस बेकायदेशीरपणे या ठिकाणी दारू पिण्यास परवानगी कोणी दिली? बागेत असा व्यवसाय करण्यास परवाना आहे का? संबंधितांना प्रशासन पोलिस प्रशासनाचा अर्थपूर्ण पाठिंबा आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

या परिसरात चार ते पाच ठिकाणी बागेतच व्यवसाय थाटले असून, तेथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत आहे. महामार्गाच्या कडेलाच मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने लागलेली असतात. या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नाही. तसेच, रस्ता ओलांडून येथे अपघात होण्याची देखील मोठी शक्यता आहे. मात्र, याकडेही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अल्पावधीतच नॉनव्हेज जेवणासाठी या परिसराला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. साध्या पद्धतीने निसर्गाच्या सानिध्यात येथे जेवणाची व्यवस्था होते. मात्र, जेवणासोबतच दारूची व्यवस्था मद्यप्रेमींसाठी होत असून, याला कोणाचेही बंधन नाही हे विशेष! अनेक ठिकाणी महामार्ग ओलांडण्यासाठी दोन-दोन किलोमीटर दुभाजक नाही.
महामार्ग तोडून हॉटेलकडे येण्यासाठी रस्ता करण्यात आलेला असला तरी संबंधित विभागानेही याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.

मद्यप्रेमींमध्ये होतायेत वाद

परिसरातील बागांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. त्याचबरोबर हजारो वाहनांची वर्दळ येथे होत असते. त्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता आहे. अनेक वेळा मद्यप्रेमी वाद घालतात व त्याचे रूपांतर भांडणात होते. एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? तसेच या परिसरात अनेक ठिकाणी बालकामगारही मोठ्या प्रमाणात आहेत.

चिकूच्या आडोशाला मद्यावर डल्ला !

येथील शेतकरी आता ना चिकूचे उत्पन्न घेतात ना चिकूची विक्री करतात. बागेत हॉटेलच्या बेकायदेशीर व्यवसायाच्या माध्यमातून लाखो रुपये मिळत असल्याने, चिकूऐवजी मटण अन् दारूलाच बहर आलेला आहे. येथे राजरोसपणे उघड्यावर मद्यप्रेमी आनंद घेताना दिसतात. दुसरीकडे हॉटेल व्यवसायिकही त्यांची सेवा करण्यात मग्न आहेत.

The post पारनेर : चिकूच्या बागेत मटणाला ‘बहर’..! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/XvV7G0q
via IFTTT

Maharashtra: किसानों को नहीं मिल रही उचित बीमा राशि, मूसलाधार बारिश के चलते हुआ था नुकसान

Maharashtra: महाराष्ट्र में अत्यधिक बारिश के कारण कई किसानों की फसल खराब हो गई थी। किसानों ने दावा किया कि उन्हें बहुत कम मुआवजा राशि मिली है। एक किसान ने दावा किया है कि नुकसान के लिए उसे केवल 90 रुपये मिले हैं। https://ift.tt/KbBM8Jp

अनिल परब पर ईडी ने कसा शिकंजा, करीबी सदानंद को किया तलब

महाराष्ट्र में मनी लॉन्ड्रिंग के एक मामले में प्रवर्तन निदेशालय का शिकंजा कसता ही जा रहा है। खबर है कि ईडी ने पूर्व मंत्री अनिल परब के करीबी सदानंद कदम को समन भेजा है। सदानंद को अगले सप्ताह पूछताछ के लिए तलब किया गया है। https://ift.tt/KbBM8Jp

काष्टी : आमदार पाचपुतेंच्या मुलास विरोध ; इच्छुकांच्या मेळाव्यात सूर

https://ift.tt/Dq2yOgk

काष्टी : पुढारी वृत्तसेवा :  गत 60 वर्षांत ‘ओबीसी’ सामाजाला काष्टीचे सरपंचपद मिळालेले नाही. यंदा मात्र ‘ओबीसी’चेच आरक्षण पडले असून, एकाच घरात आमदार, जिल्हा परिषदेचे सदस्य, सोवा सोसायटी, तसेच सरपंचपद दिले तर कार्यकर्त्यांना संधी कोठं?, असा सवाल उपस्थित करत इच्छुकांच्या मेळाव्यात आमदार बबनराव पाचपुते यांचा मुलगा प्रतापसिंह यांच्या ‘भावी’ला विरोध दर्शविण्यात आला. याच मेळाव्यात आमदार पाचपुते यांचे पुतणे साजन यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे.

तालुक्यात सर्वात मोठी बाजारापेठ काष्टीची असून, तालुक्याची राजधानी आहे. माझ्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत बाहेरील व्यक्तींनी जास्त लक्ष देऊ नये, ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढवणार असल्याचे सांगत आमदार पाचपुते यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला.  श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात शुक्रवारी (दि.26) आमदार बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.

त्यात वार्ड एक ते सहामधील इच्छूक उमेदवारांचे म्हणणे नेत्यांनी जाणून घेतले. जुन्या सदस्या उमेदवारी देऊ नये, ग्रामपंचायतमध्ये अनेक महिला सदस्यांना काही पुरुष सदस्यांनी काम करू दिले नाही, म्हणून गावच्या विकासासाठी सुशिक्षित र्निव्यसनी व होतकरू तरुणांना संधी द्यावी,असा मेळाव्यातील सुर होता. म्हणून नेतेमंडळींनी जनमताचा कौल पाहून उमेदवारी द्यावी, असे विचार अनेकांनी मांडले.
पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या विरोधात असलेले ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते व माजी सभापती अरुणराव पाचपुते यांनी आमदार पाचपुते यांच्या बरोबर येत चांगले काम करण्याचा निर्णय घेतला.

आमदार पाचपुते म्हणाले, काष्टीचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे. गावाला दिशा देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करून कोट्यावधींचा निधी देवून गावाचा विकास साध्य केला. त्याच मुद्यावर आपण निवडणूक लढवून लढविणार आहे. विरोधकांनी बिनविरोधचाही प्रस्ताव दिला असून, तो मान्य करून सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जाईल. तसेच, चांगले काम करणार्‍या व्यक्तींना ग्रामपंचायातमध्ये संधी देवू, असे पाचपुते म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते, माजी सभापती अरूणराव पाचपुते, निवडणूक निरिक्षक बाळासाहेब महाडिक, सुवर्णा पाचपुते, माजी उपसभापती वैभव पाचपुते, ज्ञानदेव पाचपुते, दादासाहेब कोकाटे, डॉ. पांडुरंग दातीर, रफिक इनामदार, राजेंद्र पाचपुते, सुनील पाचपुते यांच्यासह इच्छूक उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले.
साईसेवा उपाध्यक्ष उत्तम मोरे यांनी प्रास्तविक केले. विक्रमसिंह पाचपुते यांनी आभार मानले.

1927 मध्ये ग्रामपंचायतची स्थापना झाली असून, चार वर्षांनी ग्रामपंचायतीला शंभर वर्षे पूर्ण होतील. 1962 नंतर 60 वर्षांत ‘ओबीसी’ (माळी) समाजाचा सरपंच, उपसरपंच झाला नाही. आता, जनमतातून प्रथमच सरपंचपदासाठी ‘ओबीसी’चे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे नेत्यांनी अधिकृत ‘ओबीसी’ समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी अपेक्षा आहे.
                  -दादासाहेब कोकाटे, संचालक, भैरवनाथ सेवा सोसायटी, काष्टी

साजन यांच्या भूमिकेकडे लक्ष
जिल्हा परिषद सदस्य स्व. सदाशिव पाचपुते (अण्णा) यांचा धाकटा मुलगा आमदार पाचपुते यांचा पुतण्या साईकृपा कारखान्याचे अध्यक्ष साजन पाचपुते हे बैठकीला गैरहजर होते. गावात स्व. अण्णांची मुले सुदर्शन व साजन आमदार पाचपुतेच्या मुलापेक्षा जास्त जनमतात असतात. त्यामध्ये साजन हे तरुणांच्या गळ्यातील ताईत असून, त्यांची भूमिका काय? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

The post काष्टी : आमदार पाचपुतेंच्या मुलास विरोध ; इच्छुकांच्या मेळाव्यात सूर appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/LPKC26O
via IFTTT

नगर :  मर्चंट बँक संचालकांना नोटीस ; 13 कोटींच्या फसवणूक प्रकरणी चौकशी

नगर :  पुढारी वृत्तसेवा : नगरमधील व्यावसायिकाने मर्चंट बँकेतून घेतलेले 13 कोटींचे कर्ज बुडविल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात संबंधित व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी बँकेचे तत्कालीन अधिकारी व कर्मचारी अशा 17 जणांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. शहरातील व्यापार्‍यांची बँक म्हणून ओळखल्या जाणार्‍या अहमदनगर मर्चंन्ट को-ऑपरेटिव्ह बँकेचे 13 कोटींचे कर्ज बुडविल्याप्रकरणी … The post नगर :  मर्चंट बँक संचालकांना नोटीस ; 13 कोटींच्या फसवणूक प्रकरणी चौकशी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SdR6LV

नगर :  मर्चंट बँक संचालकांना नोटीस ; 13 कोटींच्या फसवणूक प्रकरणी चौकशी

https://ift.tt/DtcwQLh

नगर :  पुढारी वृत्तसेवा : नगरमधील व्यावसायिकाने मर्चंट बँकेतून घेतलेले 13 कोटींचे कर्ज बुडविल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात संबंधित व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी बँकेचे तत्कालीन अधिकारी व कर्मचारी अशा 17 जणांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. शहरातील व्यापार्‍यांची बँक म्हणून ओळखल्या जाणार्‍या अहमदनगर मर्चंन्ट को-ऑपरेटिव्ह बँकेचे 13 कोटींचे कर्ज बुडविल्याप्रकरणी अनिल साळी (रा.अहमदनगर) या व्यावसायिकाविरोधात बँकेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात होता.

त्यानंतर आता गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी बँकेचे तत्कालीन अधिकारी व काही विद्यमान कर्मचार्‍यांना नोटीस बजावली असून, 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. बँकेचे मदन पनालाल मुनोत (तत्कालीन अधिकारी), अनुलिंग जगन्नाथ वसेकर (तत्कालीन जॉईट सीईओ), सुरेश हिरालाल कटारिया (तत्कालीन सीईओ), हस्तीमल चांदमल मुनोत (तत्कालीन चेअरमन), आनंदराम चंदनमल मुनोत, सुरेश हिरालाल कटारिया (तत्कालीन सीईओ), अजय अमृतलाल मुथा (सीए), मोहनलाल संपतलाल बरमेचा, कमलेश पोपटलाल भंडारी, संजयकुमार फुलचंद चोपडा, अमित विजय मुथा, संजीव झुंबरलाल गांधी, मीना वसंतलाल मुनोत, प्रमिला हेमराज बोरा, विजय भागवतराव कोथिंबीरे, सुभाषराव मारूती भांड, संदीप नारायणदास लोढा या पदाधिकारी, संचालक,अधिकारी व कर्मचार्‍यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावली आहे.

नोटाबंदीत बँकेत गैरव्यवहार?

मर्चंट बँकेत नोटाबंदीच्या काळात खोटी खाती उघडून, त्यामध्ये मोठी रक्कम गैरप्रकारे डिपॉझिट करण्यात आल्याची तक्रार गिरीश जाधव (रा.अहमदनगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात केलेली आहे. त्यामुळे नोटाबंदीच्या काळात बँकेत गैरव्यवहार झाला की नाही, याचीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मर्चंट बँकेकडून घेतलेले 13 कोटींचे कर्ज परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी 2020 मध्ये गुन्हा दाखल आहे. तसेच नोटबंदीत बँकेत खोटी खाती उघडण्यात आल्याची तक्रार आहे, या दोन्ही प्रकरणाच्या चौकशीसाठी समजपत्र देण्यात आले आहे.
                  – युवराज आठरे,  सहायक पोलिस निरीक्षक, एमआयडीसी

The post नगर :  मर्चंट बँक संचालकांना नोटीस ; 13 कोटींच्या फसवणूक प्रकरणी चौकशी appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/QM8ufzp
via IFTTT

देवेंद्र फडणवीस की पत्नी अमृता ने कोश्यारी के छत्रपति शिवाजी महाराज पर दिए बयान का किया समर्थन

महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी द्वारा मराठा योद्धा छत्रपति शिवाजी महाराज पर की गई टिप्पणी का मामला तूल पकड़ता जा रहा है, उनके बयान के बाद से राज्य में एक बार फिर से सियासी माहौल गरमा गया है। https://ift.tt/iQfU13a

नगर : शहर बँक बिनविरोधसाठी अपयश ; सर्वसाधारणसाठी 12 उमेदवार

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहर सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 13 जागांसाठी 15 उमेदवार निवडणुकीत रिंगणात राहिले. तर, दोन जागा बिनविरोध झाल्या. अखेर शहर बँक बिनविरोध करण्यात सत्ताधार्‍यांना अपयशी ठरले. शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची 2020 मध्ये मुदत संपली होती. कोरोना काळामुळे निवडणुका लांबल्या होत्या. उपनिबंधक गणेश पुरी यांनी या बँकेच्या संचालक … The post नगर : शहर बँक बिनविरोधसाठी अपयश ; सर्वसाधारणसाठी 12 उमेदवार appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SdP1LW

श्रीगोंदा तालुक्यात रस्त्यांची दुरुस्ती सुरु

https://ift.tt/PbOFqkL

कोळगाव : पुढारी वृत्तसेवा :  श्रीगोंदा तालुक्यामध्ये पावसामुळे, अतिवृष्टीमुळे रस्ते जागोजागी उखडले असून, मोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच खड्डे दुरुस्तीचे टेंडर मंजूर केले असून, त्या अंतर्गत तालुक्यातील खड्डे दुरुस्तीसाठी आठ पथके तयार केले असून, त्यांच्यामार्फत एकाच वेळी दुरुस्ती मोहीम राबविण्यात येत आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत दै.पुढारीने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत कामास सुरुवात झाली आहे.

अतिवृष्टीने राज्यात सर्वत्र रस्त्यांची वाट लागली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले होते. अनेक अपघात होत होते. वाहन चालकांना आपली वाहने सुरक्षितरित्या या खड्ड्यातून बाहेर काढणे अवघड झाले होते. त्यामुळे तातडीने रस्ते दुरुस्ती आवश्यक होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने श्रीगोंदा तालुक्यामध्ये खड्डे दुरुस्ती करण्यासाठी नुकतेच निविदा काढली होती. त्यानंतर खड्डे दुरुस्तीची मोहीम सध्या तालुक्यात राबविण्यात येत असून त्यामध्ये सात ते आठ रस्ते दुरुस्ती पथके तयार करण्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व रस्ते एकाच वेळी दुरुस्तीसाठी घेण्यात आले आहेत.

यामध्ये खड्डे खडीने भरून डांबराचा वापर करून दुरुस्त करण्यात येत आहेत. एका पथकामध्ये साधारणपणे 15 ते 20 कर्मचारी असून खडी, डांबर व रोलरच्या साह्याने दुरुस्ती करण्यात येत आहे. सदरील खड्डे दुरुस्ती मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता बावस्कर, अभियंता पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असल्याची माहिती सुपरवायझर राजू मेहेत्रे यांनी दिली. सध्या एका दुरुस्ती पथकाचे कर्मचारी कोळगाव फाटा ते श्रीगोंदा या अंतर्गत येणार्‍या रस्त्याची दुरुस्ती करत आहेत. कोळगाव फाटा ते कोळगाव रस्त्याची दुरुस्ती अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आली असून, नियमानुसार खड्डे भरून खडी व डांबर यांचा योग्य वापर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोळगाव, सुरोडी, वडाळी या रस्त्याची दुरुस्ती चालू आहे.

तसेच, बेलवंडी फाटा ते बेलवंडी गाव, उक्कडगाव, देवदैठण याशिवाय विसापूर, पिंपळगाव, एरंडोली उक्कडगावपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती चालू आहे. त्याचबरोबर कोळगाव, कोथुळ, भानगाव, देऊळगाव या रस्त्याची दुरुस्ती सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय राजापूर माठ, मेंगलवाडी, ढवळगाव कोंडेगव्हाण, निंबवी, पिंपळगाव पिसा, घारगावपर्यंत रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

The post श्रीगोंदा तालुक्यात रस्त्यांची दुरुस्ती सुरु appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/Pi6ZfNe
via IFTTT

नगर : लहान मुलांना ‘गोवर’चा धोका !

https://ift.tt/smjkBzE

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या महिनाभरापासून राज्यातील काही भागांत लहान मुलांवर गोवरचे संकट कोसळले आहे. गोवर संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालात जगातील 4 कोटी बालकांना गोवरचा हा धोका असल्याची भिती व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातूनही बालकांचे लसीकरण, पालकांमध्ये जनजागृती आणि शाळानिहाय सर्वेक्षण, अशी मोहिम हाती घेण्यात आली आहे. कोरोनानंतर आणखी एका महासाथीच्या रोगाचे संकट जिल्ह्यावर घोंगावत असताना बालकांच्या लसीकरणाला आणखी वेग द्यावा लागणार आहे.

सन 2021 मध्ये कोरोनाने थैमान घातले असताना आरोग्य यंत्रणा या विषाणूविरोधात लढताना दिसली. मात्र, याच कालावधीत गोवरसह अन्य लसीकरणाची गती प्रचंड मंदावल्याचेही दिसले. याचा परिणाम म्हणून आता गोवर पुन्हा डोके वर काढत आहे. एक किंवा दोन डोस चुकलेल्या मुलांना गोवरचा धोका संभावतो, असे आरोग्य विभागाचे मत आहे. सध्या मुंबईसह काही जिल्ह्यांमध्ये गोवरचे रुग्ण आढळत आहे. नगर जिल्हा मात्र तूर्ततरी सुरक्षित असल्याचे दिसते. असे असले तरी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात डॉ. संदीप सांगळे यांनी जिल्हा आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्‍यांना लसीकरण, औषधोपचार इत्यादी महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत.

डोस कधी घ्यायला हवे !

जन्मानंतर नऊ महिन्यांनी पहिला डोस
जन्मानंतर 19 महिन्यानंतर दुसरा डोस

ग्रामीण लसीकरणाची स्थिती !

उद्दिष्ट्ये ः 68 हजार 322
पहिला डोसः 41 हजार 417

उद्दिष्ट्ये ः 66 हजार 755
दुसरा डोस ः 40 हजार 363
गोवरची ही आहेत लक्षणे ?
ताप, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे, अशक्तपणा, घशात खवखव करणे, अंग दुखणे, तोंडाच्या आतील बाजूस पांढर्‍या रंगाचे चट्टे दिसणे इत्यादी.

वैद्यकीय अधिकार्‍यांना बैठकीत सूचना !

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी काल शुक्रवारी 14 तालुका आरोग्य अधिकारी, 96 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांसमवेत ऑनलाईन बैठक घेतल्याचे समजले. यामध्ये गोवरचे लसीकरण ज्या बालकांचे राहिले आहेत, त्यांचा शोध घ्या, त्यांचे लसीकरण पूर्ण करून अहवाल सादर करा. तसेच संशयित रुग्ण आढळल्यास त्यांची तत्काळ माहिती कळवा, संबंधितांचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्याचे आवाहन डॉ. सांगळे यांनी केले आहे.

खासगी डॉक्टरांची कार्यशाळा घेणार !

जिल्ह्यात साधरणतः एक हजारांच्या पुढे डॉक्टर आहेत. सध्याच्या गोवर संकटात या बालरोग्य तज्ज्ञांच्या मदतीने तसेच गावातील डॉक्टरांच्या सहकार्यातून काही वैद्यकीय उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी कालच्या बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी गोवरसंदर्भात खासगी डॉक्टरांची कार्यशाळा घ्यावी, अशा सूचनाही केल्या आहेत.

जिल्ह्यात सध्या एकही गोवरचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र, तरीही आपली आरोग्य यंत्रणा अलर्ट केलेली आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांना आज बैठक घेवून महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत. लवकरच खासगी डॉक्टरांचीही कार्यशाळा घेतली जाणार आहे. कुठेही संशयित रुग्ण आढळलाच तर तत्काळ आमच्याकडे रिपोर्टिंग करण्याबाबतही कळविले आहे.
                                             -डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

The post नगर : लहान मुलांना ‘गोवर’चा धोका ! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/Ft3puVS
via IFTTT

नगर : मार्केटयार्डात रेशनिंगचा तांदूळ, पिकअप पकडला

नगर : पुढारी वृत्तसेवा : अवैधरित्या विक्रीसाठी जात असलेला रेशनिंगचा तांदूळ कोतवाली पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून पकडला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.24) करण्यात आली. रेशनिंगचा तांदूळ व पिकअप असा दोन लाख 99 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी दोघांवर पोलिस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात … The post नगर : मार्केटयार्डात रेशनिंगचा तांदूळ, पिकअप पकडला appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SdLLRW

नगर : धूमस्टाईलने महिलांचे मंगळसूत्र लंपास

नगर : पुढारी वृत्तसेवा :  भिंगार परिसरातून महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडून नेल्याच्या दोन घटना गुरुवारी (दि.23) घडल्या. पहिली घटना भिंगारमधील सरपण गल्ली समोरील गुगळे इलेक्ट्रीकच्या दुकानासमोर घडली. रस्त्याने महिलेच्या गळ्यातील 22 हजार 500 रूपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने बळजबरीने ओरबडून नेले. याबाबत संगिता गणेश बारटक्के (रा.रंगार गल्ली, भिंगार) यांनी भिंगार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली … The post नगर : धूमस्टाईलने महिलांचे मंगळसूत्र लंपास appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SdLLMV

नगर : वाढदिवसाचा फ्लेक्स लावताय ? दाखल होईल फौजदारी गुन्हा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  दादा, भाऊंचा वाढदिवस आता सार्वजनिक जागेत साजरा करता येणार नाही. सार्वजनिक जागेत वाढदिवसाचा फ्लेक्स बोर्ड लावल्यास अतिक्रमण विरोधी पथक व पोलिस प्रशासन थेट कारवाई करीत फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे. तसा इशाराच महापालिका आयुक्तांनी दिला आहे. महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स बोर्ड लावले जात आहेत. त्यातून महापालिकेचा मोठ्या प्रमाणात … The post नगर : वाढदिवसाचा फ्लेक्स लावताय ? दाखल होईल फौजदारी गुन्हा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SdLL72

वाळकी : महामार्गावर वाहनचालकास लुटले

https://ift.tt/kJtIcNe

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  पिकअप गाडीला मोटारसायकल आडवी लावून थांबवत तीन चोरट्यांनी वाहनचालकाला चाकूचा धाक दाखवत त्याच्या जवळील एक लाख 13 हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना नगर-पुणे महामार्गावर चास (ता.नगर) शिवारात मंगळवारी (दि.22) पहाटे 5.30 वाजता घडली. याबाबत अरविंद रामदास डरंगे (रा.रांजणी, हल्ली रा.सारसनगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डरंगे वाहनचालक असून, त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतकर्‍यांचा शेतीमाल विक्रीसाठी पुण्याला नेला होता. या शेतीमालाच्या विक्रीतून मिळालेली रोकड घेऊन ते नगरकडे परतत होते.

मंगळवारी पहाटे 5.30 वाजता चास शिवारात असलेल्या माथेरान हॉटेलजवळ एका पल्सर मोटारसायकलवर तीन युवक आले. त्यांनी पल्सर मोटारसायकल पिकअपला आडवी लावत, त्यांना वाहन थांबविण्यास भाग पाडले. त्यातील एकजण डरंगे यांना शिवीगाळ करू लागला. तसेच, गाडीला कट का मारला? म्हणून त्यांना गाडीतून खाली ओढले. अंधारात रस्त्याच्या बाजूला ओढत नेले. दोघांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील पाकीट बळजबरीने हिसकावून घेतले. तिसर्‍या व्यक्तीने मोबाईलच्या उजेडात पिकअप गाडीत उचका-पाचक करत चालकाच्या सिटच्या मागे ठेवलेली रोकड काढून घेत तिघेही पल्सरगाडीवर बसून पुण्याच्या दिशेने पसार झाले. या चोरट्यांनी डरंगे यांची तब्बल एक लाख 13 हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

The post वाळकी : महामार्गावर वाहनचालकास लुटले appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/9JujKdX
via IFTTT

शिवसेना के नाम और चुनाव चिन्ह छीने जाने पर राउत ने चुनाव आयोग पर लगाया आरोप

अगर चुनाव आयोग तटस्थ होता तो शिवसेना का नाम और उसका चुनाव चिन्ह छीना नहीं जाता. देश की सभी संस्थाएं दबाव में काम कर रही हैं. हम जो कहते रहे हैं, सुप्रीम कोर्ट ने उस पर मुहर लगाई है.मीडिया से बात करते हुए संजय राउत ने यह बयान दिया है. https://ift.tt/tr8Gwam

नगर : महापालिका पाणी योजनेचा पाणीपुरवठा बंद राहिल्याने पाणीपुरवठा विस्कळीत

https://ift.tt/cSKdx2F

नगर : पुढारी वृत्तसेवा :  मुळानगर, विळद पंपिंग स्टेशन परिसरातील बुर्‍हाणनगर चाळीसगाव पाणी योजनेच्या केंद्रावर बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे महापालिका पाणी योजनेचा पाणीपुरवठा बंद राहिल्याने दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे, असे मनपातर्फे सांगण्यात आले.

दि. 24 रोजी रोटेशननुसार तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, माणिक चौक, आनंदी बाजार, नवीपेठ, कापड बाजार या भागाला उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तसेच, सारसनगर, बुरूडगाव भागातील पाणीपुरवठा शुक्रवारी नियमित वेळेत होईल. मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, माळीवाडा, कोठी या भागात गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर सिव्हील हाडको प्रेमदान हाडको भागाला शुक्रवारी नेहमीच्या वेळेत पाणीपुरवठा होईल.

The post नगर : महापालिका पाणी योजनेचा पाणीपुरवठा बंद राहिल्याने पाणीपुरवठा विस्कळीत appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/AzZHjO4
via IFTTT

अकोले तालुक्यात वाळूची तस्करी वाढली ; पोलिसांची कारवाई, महसूल मात्र सुस्त

अकोले, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात वाळू तस्करांनी खुलेआम वाळू उपसा सुरू केला आहे. महसूल प्रशासनाच्या कारवाई अभावी सध्या वाळू तस्कर मोकाट आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महसूल विभाग कानाडोळा करत असला तरी २ लाख रुपये किमतीचा एक लाल रंगाचा स्वराज कंपनीचा एम एच १४ डि एच ०५४८ हा ट्रॅक्टर बेकायदेशीरपणे वाळु चोरी करताना अकोले पोलिसांनी पकडला. … The post अकोले तालुक्यात वाळूची तस्करी वाढली ; पोलिसांची कारवाई, महसूल मात्र सुस्त appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SdHXfY

अकोले तालुक्यात वाळूची तस्करी वाढली ; पोलिसांची कारवाई, महसूल मात्र सुस्त

https://ift.tt/v80Elyi
Akole Police seized tractor and one brass sand Ahmednagar

अकोले, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात वाळू तस्करांनी खुलेआम वाळू उपसा सुरू केला आहे. महसूल प्रशासनाच्या कारवाई अभावी सध्या वाळू तस्कर मोकाट आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महसूल विभाग कानाडोळा करत असला तरी २ लाख रुपये किमतीचा एक लाल रंगाचा स्वराज कंपनीचा एम एच १४ डि एच ०५४८ हा ट्रॅक्टर बेकायदेशीरपणे वाळु चोरी करताना अकोले पोलिसांनी पकडला. या प्रकरणी चंद्रकांत मारुती बांबळे (वय ३७ रा घोटकरवाडी, सातेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पाच हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू व २ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर असा एकूण २ लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तालुक्यातील प्रवरा, मुळा या नद्या वाळू तस्करांसाठी सोन्याची खाण मानली जातात. निळवंडे, अकोले, कोतुळ, कळस, निब्रळ, पाडाळणे, धामणगाव पाट, विठा तसेच अन्य ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असतो. मुळा, प्रवरा या दोन्ही नद्यांची वाळू चांगल्या प्रतीची मानली जाते. या वाळूला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. परिणामी या वाळूला चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे या वाळू तस्करांची या धंद्यातून मोठी कमाई होत आहे. यातूनच तालुक्यातील तसेच नाशिक, पुणे, ठाणे जिल्ह्याबरोबर गुजरातमधील वाळू तस्करांची संख्या अकोले तालुक्यात वाढू लागली आहे.

नदीकाठच्या शेतकऱ्यांनी वाळू उपसा करण्यास विरोध केल्यास त्यांना दमदाटी केली जाते. त्यामुळे शेतकरी व वाळु तस्कर यांच्यात वादावादीचे प्रकार घडत आहेत. तसेच वाळू वाहतुकीच्या वाहनांमुळे शेतातील शेतकऱ्यांच्या पाईप्स फुटणे, पंपाला जोडलेल्या इलेक्ट्रिक केबल तुटणे हे नित्याचेच झाले आहे. वाळू तस्कर खुलेआमपणे रात्री अपरात्री वाळू उपसा करीत आहेत. परंतु प्रशासनांकडून त्यांच्यावर कोणतीच कडक कारवाई होत नाही. काही वाळू तस्करांना राजकीय वरदहस्त असल्याने जाणीवपूर्वक या वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे टाळले जात असल्याची चर्चा सुरू आहे.

The post अकोले तालुक्यात वाळूची तस्करी वाढली ; पोलिसांची कारवाई, महसूल मात्र सुस्त appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/qESiRsF
via IFTTT

राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती गठीत : पशुसंवर्धनमंत्री विखे पा. यांची माहिती

https://ift.tt/SkfQZzv

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात खासगीरित्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी व कुक्कुट व्यवसाय करणार्‍या कंपन्यांच्या व्यवसायातील अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी प्रथमच राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी दिली. या समितीच्या स्थापनेचा शासन आदेश निर्गमित झाला आहे. 11 सदस्यांच्या समितीची संरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत होणार्‍या या समितीत पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, सहाय्यक आयुक्त, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे समन्वयक, कंत्राटी मांसल कुक्कूट व्यवसाय करणारे तीन शेतकरी, ओपन पद्धतीने मांस कुक्कूट व्यवसाय करणारे शेतकरी, कुक्कूट अंडी उत्पादन करणारे पाच शेतकरी, कुक्कूट व्यवसायीक कंपन्यांचे पाच प्रतिनिधी, राष्ट्रीय अंडी समन्वय समितीचे प्रतिनिधी तर पशुसंवर्धन उपआयुक्त सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

राज्यात कुक्कुटपालन करणारे शेतकरी व कंपन्यांना येणार्‍या अडचणी समजून घेण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे 3 नोव्हेंबर 2022 रोजी बैठक पार पडली. यावेळी राज्याच्या विविध भागातून करार पद्धतीने मांसल कुक्कूट पालन, अंडी उत्पादक शेतकरी व व्यवसायीक कंपन्यांचे प्रतिनिधींच्या अडचणीवर लक्ष वेधण्यात आले. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण विभागाला प्रतिनिधीत्व देवून शेतकरी व कंपन्यांच्या प्रतिनिधीचा समावेश असलेली राज्यस्तरीय कुक्कूट समन्वय समितीची स्थापना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, राज्यात प्रथमच अशा पद्धतीची समिती स्थापन झाल्याचे सांगत, मंत्री विखे पा. म्हणाले, या समितीची तीन महिन्याला नियमित बैठक होवून, तिचे इतिवृत्त शासनास सादर होईल. यातून कुक्कुट पालन करणारे शेतकरी, कंपन्यांना येणार्‍या अडचणींवर चर्चा होईल. महत्वाचे असे की, खासगी कुक्कुटपालन करणारे शेतकरी करार पद्धतीने कुक्कुट पालक कंपन्यांसोबत व्यवसाय करतात, परंतू मुळ दर करार, ग्रोईंग चार्ज, लिफ्टींग चार्ज, मजूरी परतावा न देणे याबाबत तक्रारींचे निराकरण ही समिती करल, अस मंत्री विखे पा. यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

समस्यांवर चर्चेतून करणार उपाययोजना..!

आवश्यक शिफारशी करणे, कुक्कुट व्यवसायात उद्भवणार्‍या प्रासंगिक समस्यांवर चर्चा करुन उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय समिती काम करणार असल्याचे मंत्री विखे पा. म्हणाले.

The post राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती गठीत : पशुसंवर्धनमंत्री विखे पा. यांची माहिती appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/y4Slvg2
via IFTTT

बेलापुरात पाणीपुरवठा टाकीत प्रचंड गाळ ; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

https://ift.tt/Ws0MFTS

बेलापुर : पुढारी वृत्तसेवा :  बेलापूरला दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीवरून ग्रामपंचायतीने बैठक बोलाविली. यावेळी आजी, माजी सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ व कामगारांनी या समस्येचे निराकरण करण्याबाबत चर्चा केली, मात्र यानंतर जे धक्कादायक सत्य बाहेर आले ते समजल्यावर बरे झाले बैठक बोलाविली, असेच काहीसे म्हणावे लागले.  झाले असे की, गेल्या दोन- तीन महिन्यांपासून बेलापूरसह परिसराला दूषित पाणीपुरवठा होत होता. याप्रश्नी सदस्य भरत साळुंके, रवींद्र खटोड, सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले, चंद्रकांत नाईक यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. दूषित पाण्याचे नमुनेही व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर फिरले. गावकरी मंडळाचे मार्गदर्शक शरद नवले यांनी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना तातडीने कारण शोधण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान, यावर उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चेसाठी सरपंच साळवी व उपसरपंच खंडागळे यांनी ग्रामस्थांची बैठक बोलाविली. या बैठकीतील चर्चेतून असे समोर आले की, अनेक वर्षांपासून पाण्याची टाकी स्वच्छ केली नाही. त्यामुळे तातडीने टाकी स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायतीने तातडीने टाकी स्वच्छ करण्याच्या कामास सुरुवात केली. यावेळी भयानक सत्य समोर आले. टाकीत तब्बल चार ते पाच फुटांपर्यंत गाळ साचलेला होता. विशेष असे की, हेच गाळमिश्रीत पाणी बेलापूरसह परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पित होते. या टाकीतील बर्‍याच वर्षांपासून साचलेला गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले. मागील काळात टाकी केव्हा साफ करण्यात आली होती, याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, टाकी स्वच्छ केल्याची तारीख, महिना अन् वर्षसुद्धा सापडले नाही. यावरून अनेक वर्षांपासून नागरिक हे गाळमिश्रीत पाणी पित होते हे उघड झाले.

दूषित पाण्यामुळे होणार्‍या आजाराचे प्रमाण सर्वात जास्त आहे. हे माहित असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष झाले. आरोग्य विभागही याबाबत अनभिज्ञ होता. पाण्याच्या टाकीत साचलेला प्रचंड गाळ वरून पडलेल्या पाण्यामुळे ढवळून निघत होता. तेच ढवळलेले गाळमिश्रीत पाणी नागरिकांना पिण्यास येत होते, हे वास्तव यानिमित्ताने समोर आले.  या प्रकाराबाबत सरपंच साळवी व उपसरपंच खंडागळे यांनी सांगितले की, बैठकीत झालेल्या चर्चेनुसार बेलापूर बु. ग्रामपंचायतीच्यावतीने 5 लाख लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील गाळ काढणे व टाकी स्वच्छ करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. यानंतर 2 लाख लिटरची टाकी देखील गाळ काढून स्वच्छ करण्यात येणार आहे. मेन टाकीवरील पाण्याचे सर्व हौद देखील गाळ काढून स्वच्छ करण्यात येणार आहेत. याआधी अमरधाम, खटकळी-गावठाण,20 घरकुल, अयोध्या कॉलनी येथील पाण्याच्या टाक्या गाळ काढून स्वच्छ करण्यात आल्या.

The post बेलापुरात पाणीपुरवठा टाकीत प्रचंड गाळ ; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/tXxhNez
via IFTTT

महाराष्ट्र के नासिक और अरुणाचल में भूकंप के झटके किए गए महसूस

महाराष्ट्र के नासिक में 23 नवंबर को भूकंप के झटके महसूस किए गए। नेशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी के मुताबिक भूकंप के झटके सुबह लगभग 04:04 बजे महसूस किए गए। https://ift.tt/tr8Gwam

नगर : ‘त्या’1689 गुरुजींना हवी सोयीची बदली!

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यापूर्वी बदलीपात्र आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध झाली होती. तेव्हापासून लक्ष लागलेली संवर्ग एक आणि संवर्ग दोन ही यादी देखील नुकतीच पोर्टलवर दिसू लागली आहे. या यादीनुसार 1471 शिक्षकांना दुर्धर आजार, दिव्यांग, 53 वर्षे पूर्ण इत्यादी आधारे बदलीत प्राधान्य हवे आहे, … The post नगर : ‘त्या’1689 गुरुजींना हवी सोयीची बदली! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SdDVmD

नेवासा : संजीवन समाधीनिमित्त कार्यक्रम, दीपोत्सवाने उजळले मंदिर

https://ift.tt/EGJbMZQ

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 726 व्या संजीवन समाधीच्या निमित्ताने माऊलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये मंगळवारी (दि.22) सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचे प्रवेशद्वार दिव्यांनी उजळून निघाले होते. यावेळी ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषाने परिसर दूमदुमला होता. मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या दीपोत्सवाप्रसंगी पैस खांबाचे विधिवत पूजन करण्यात आले.

त्यानंतर वारकर्‍यांच्या हस्ते पैस खांबासमोर पहिला दीप लावण्यात येऊन संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींना अभिवादन करण्यात आले. दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. संध्याकाळी श्रीधर फडके यांचे ओंकार स्वरूप गायलेली भक्ती गीते यावेळी झाली. तसेच, नेवाशातील समर्पण फाऊंडेशनच्या वतीने डॉ. दिलीप पडघन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, प्रमुख विश्वस्त हभप शिवाजी महाराज देशमुख, जीवन गौरव पुरस्कार प्राप्त डॉ दिलीप पडघन, समर्पणचे डॉ.करणसिंह घुले, मंदिर विश्वस्त ज्ञानेश्वर शिंदे, रामभाऊ जगताप, कैलास जाधव, कृष्णा पिसोटे, भैय्या कावरे, भगवान सोनवणे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भजने गाऊन व माऊलींच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

The post नेवासा : संजीवन समाधीनिमित्त कार्यक्रम, दीपोत्सवाने उजळले मंदिर appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/xmUI5D6
via IFTTT

नगर : ‘त्या’1689 गुरुजींना हवी सोयीची बदली!

https://ift.tt/mNcnLfH
शिक्षक

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यापूर्वी बदलीपात्र आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध झाली होती. तेव्हापासून लक्ष लागलेली संवर्ग एक आणि संवर्ग दोन ही यादी देखील नुकतीच पोर्टलवर दिसू लागली आहे. या यादीनुसार 1471 शिक्षकांना दुर्धर आजार, दिव्यांग, 53 वर्षे पूर्ण इत्यादी आधारे बदलीत प्राधान्य हवे आहे, तर 218 पती-पत्नींनीही संवर्ग दोन मधून एकत्रिकरणाची मागणी केली आहे. शिक्षक बदल्यांची प्रक्रिया कासवगतीने सुरू आहे. यापूर्वी आंतरजिल्हा बदल्या पूर्ण झाल्या. त्यानंतर जिल्हांतर्गत बदल्या सुरू झाल्या. प्रारंभी बदलीपात्र अर्थात सध्याच्या शाळेत पाच वर्षे सेवा करणारे 1471 शिक्षक हे संवर्ग चारमध्ये समाविष्ट आहेत.

अवघड क्षेत्रात सलग तीन वर्षे सेवा देणारे 794 शिक्षक हे संवर्ग तीनमध्ये बदलीसाठी प्राधान्यक्रमावर आहेत. तर संवर्ग एकसाठी 1479 शिक्षकांनी आपली माहिती बदली पोर्टलवर भरली आहे. तर संवर्ग दोनमधील प्राधान्यासाठी 218 पती-पत्नींची माहिती अपलोड आहे. या यादीतून पात्र अपात्र अर्ज काढले जाणार आहेत. यावर शिक्षणाधिकारी यांच्याकडे अपील, त्यावर सुनावणी होईल. त्यानंतर सीईओंकडेही अपील करता येतील. त्यावर सुनावणीनंतरच अंतिम यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर बदलीस पात्र शिक्षक पुढे येतील.

गुरुजींची माहिती खरी की खोटी; पडताळणी करा!

शिक्षकांनी खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे ऑनलाईन बदली प्राधान्यासाठी अर्ज सादर केले असल्यास व त्या आधारे अशा शिक्षकांच्या बदल्या झाल्या, तर संबंधित संवर्गाची पात्रता धारण करणार्‍या खर्‍या पात्र शिक्षकांवर अन्याय होतो. शिक्षकांच्या बदल्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांनी सादर केलेल्या अर्जाच्या पडताळणीबाबत अवर सचिव उर्मिला जोशी यांनी सीईओंना सूचना केल्या आहेत.

‘त्या’1689 गुरुजींना हवी सोयीची बदली!

संवर्ग 1 मध्ये 1479, तर संवर्ग 2 मधून 218 अर्ज; यादी झाली प्रसिद्ध त्रिसदस्यीय समिती ठरविणार ‘पात्र की अपात्र’!
संवर्ग भाग 1 मध्ये प्राधान्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकार्‍याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे. अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेणार आहे. दि. 23 रोजी दुपारी 1.00 वा. पर्यंत हार्ड कॉपीसह या कार्यालयास आवश्यक ती माहिती सादर करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केल्या आहेत.

‘त्या’ शिक्षकांवर होणार शिस्तभंगाची कारवाई!
पडताळणीअंती ज्या शिक्षकांनी जाणिवपूर्वक खोट्या व चुकीच्या प्रमाणपत्र आधारे अर्ज भरल्याचे सिद्ध होईल, त्यांचा अर्ज ऑनलाईन प्रणालीतील संबंधित संवर्गातून बाद करण्यात यावा व अशा शिक्षकांविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

The post नगर : ‘त्या’1689 गुरुजींना हवी सोयीची बदली! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/YZ3C7e4
via IFTTT

कोळपेवाडी : विवाह नोंदणीसाठीही आता प्लॅनचा फंडा!

राजेंद्र जाधव कोळपेवाडी : अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्लॅन सांगून आपल्या कंपनीचा व्यवसाय वाढवितात. असेच काहीसे प्रकार करुन, काही विवाह नोंदणी संस्था उपवर मुलांच्या पालकांना आपल्या प्लॅनमध्ये सहभागी करून घेत, 5 ते 25 हजार रुपयांपर्यंत कमाई करीत आहेत. मुलींचे प्रमाण कमी असल्यामुळे प्रत्येक उपवर मुलांच्या पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. रेतीवाला नवरा नको, … The post कोळपेवाडी : विवाह नोंदणीसाठीही आता प्लॅनचा फंडा! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sd9Mgt

छत्रपति शिवाजी महाराज को लेकर अपने बयान पर घिरे महाराष्ट्र के राज्यपाल बीएस कोश्यारी

महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी द्वारा छत्रपति शिवाजी महाराज को लेकर दिए गए विवादित बयान देने के बाद राज्य में एक बार फिर से सियासी माहौल गरमा गया है। https://ift.tt/yMfNorc

सावरकर विवाद के बीच राउत ने की राहुल की तारीफ, बताया सच्चा दोस्त

जेल से बाहर निकलने के बाद उद्धव गुट के नेता संजय राउत एक बार फिर से राजनीति में सक्रिय हो गए हैं। वे फिर से मीडिया में आकर लगातार बयान दे रहे हैं। इसबार उन्होंने राहुल गांधी के बारे में बयान दिया है। https://ift.tt/XoVlxid

नगर :  दहा कोटींच्या निधीचा महासभेत फैसला

नगर :  पुढारी वृत्तसेवा :  शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील रस्त्यांसाठी दहा कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, कोविड काळात रस्त्याची कामे प्रलंबित राहिली. त्यानंतर स्टील व सिमेंटच्या किमती वाढल्याने ठेकेदाराने वाढीव निधी देण्याची मागणी केली. परंतु, कार्यान्वयन यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग असल्याने वाढीव निधी कोणी द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून रस्त्यांची … The post नगर :  दहा कोटींच्या निधीचा महासभेत फैसला appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sd6J0Q

नगर :  दहा कोटींच्या निधीचा महासभेत फैसला

https://ift.tt/TxoYJZv
nagar mnc

नगर :  पुढारी वृत्तसेवा :  शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील रस्त्यांसाठी दहा कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, कोविड काळात रस्त्याची कामे प्रलंबित राहिली. त्यानंतर स्टील व सिमेंटच्या किमती वाढल्याने ठेकेदाराने वाढीव निधी देण्याची मागणी केली. परंतु, कार्यान्वयन यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग असल्याने वाढीव निधी कोणी द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून रस्त्यांची कामे प्रलंबित राहिली. त्यावर शनिवारी (दि. 26) होणार्‍या महासभेत निर्णय होणार आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत शहरात विकासकामांसाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. शासनाच्या निर्णयानुसार प्रकल्पाअंतर्गतच्या कामासाठी कार्यान्वयन यंत्रणा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाची नियुक्ती करण्यात आली.

या योजनेंतर्गत कामासाठी 9.47 कोटीचे अनुदान शासनाकडून वर्ग करण्यात आले. या प्रकल्पाअंतर्गत 47 कामांची ई-निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदाराला काम दिले. 14 नोव्हेंबर 2019 रोजी कार्यरंभ आदेश देण्यात आला. मात्र, त्यानंतर सिमेंट, स्टीलचे दर वाढ झाल्यानंतर ठेकेदाराने काम करण्यास नकार दिला. महापालिकाच्या बांधकाम विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करून काम तत्काळ करण्याबाबत सुचविले. त्या कामांचे नियंत्रण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने वाढीव रक्कम देण्याचा बांधलकी बांधकाम विभागाचीच आहे. त्यास महापालिका बांधील राहत नाही. तसेच मंजूर निविदेमध्येही अंतर्भूत भाववाढ नाही. त्यामुळे भाववाढ देणे उचित नाही.

शहरातील अमृत भुयारी गटार योजनेची कामे पूर्ण होऊन रस्त्याची कामे प्रलंबित आहेत. प्रलंबित रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेत बैठक होऊन रस्त्याची कामे तत्काळ करावी, असे सूचित करण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत त्या रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाही. महापालिकेने त्या कामासाठी नगर विकास मंत्रालयाकडे अधिकच्या निधी मागणी होती. मात्र, अद्याप त्यास परवानगी मिळलेली नाही. त्यामुळे त्या निधीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, यासाठीचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला आहे.

या रस्त्याची कामे रखडली
1) रामचंद्र खुंट – तेलीखुंट – नेता सुभाष चौकपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. 2) नगर वाचनालय ते भाजप कार्यालय ते पटर्धन चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. 3) तख्ती दरवाजा – घुमरे गल्ली – समाचार प्रेस – लक्ष्मी कारंजापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. 4) शहर सहकारी बँक, नवीपेठ – लोढा हाईट्स, नेता सुभाष चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे.

The post नगर :  दहा कोटींच्या निधीचा महासभेत फैसला appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/0Wkdtgs
via IFTTT

तेरा गावांत 41 बेकायदा वीटभट्ट्या ; नेवासा तालुक्यातील प्रकार

https://ift.tt/FQ0t47K

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  नेवासा तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्यात मातीची रॉयल्टी न भरता बेकायदा व बोगस वीट्टभट्ट्या चालू आहेत. एकट्या नेवासा तालुक्यात तेरा गावात 41 बेकायदा वीटभट्ट्या सुरू असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब गायके यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सन 2015 ते आज अखेरपर्यंत परवानगी घेतलेल्या वीटभट्ट्यांची आदेशाच्या प्रतींसह माहिती मागविली होती. त्यावर जिल्हा गौण खजिन अधिकारी यांनी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांकडे 6(3) अर्ज हस्तांतरित केला आहे. वीटभट्टी परवाना दरवर्षी नूतनीकरण करताना शासनाकडे मातीची रॉयल्टी जमा केली जाते.

ग्रामपंचायतीचा ठराव व जिल्हा प्रदूषण कार्यालयाची पूर्व परवानगी, यानंतर महसूल विभाग मातीसाठी रॉयल्टी जमा करुन नंतर परवानगी दिली जाते. मात्र, माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडे 2015 ते आज अखेरपर्यंत वीटभट्टीच्या मातीसाठी किंवा परवानगीसाठी कुठलाही रितसर अर्ज किंवा रॉयल्टीही प्रतिवर्षी भरली गेल्याचे दिसून येत नाही.

दरवर्षी वीटभट्टी किंवा मातीसाठी परवानगी, त्यासाठी शासनाकडे प्रतिवर्षी मातीची रॉयल्टी भरणे गरजेचे असते. जर वीटभट्टी चालक हा कुंभार समाजाचा असेल, तर वीटभट्टी व मातीसाठी शासनाकडून सवलत दिली जाते. त्यासाठी प्रत्येक तहसीलमधील गौण खनिज कार्यालयाकडे रितसर अर्ज देणे गरजेचे असते व ते बंधनकारक असते. मात्र, माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीवरून अनेक तालुक्यातील कुंभार समाजाच्या वीटभट्टी चालकाने सन 2015 ते आज अखेरपर्यंत असा अर्ज दिलेला दिसून येत नाही.

बेकायदेशीर वीटभट्या चालविल्या जात असल्यास मंडलाधिकारी व तलाठी यांच्यावर जबाबदारी निश्चित असते. अनेक तालुक्यांची माहिती अद्यापि तलाठी, मंडलाधिकार्‍यांकडून देण्यात आलेली नाही. त्यांनी लवकरात लवकर माहिती न दिल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा गायके यांनी दिला आहे. यात रॉयल्टीपोटी शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाल्याने नुकसान झालेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, प्रदूषण मंडळ कार्यालय यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

नेवासा तालुक्यातील वीटभट्ट्या

प्रवरासंगम 1, माळेवाडी खालसा 1, टोका 1, नेवासा खुर्द 13, हंडीनिमगांव 2, मुकिंदपूर 8, मक्तापुर 1, खुपटी 2, गोणेगाव 2, चिंचबन 1, कांगोणी 1, रांजणगाव 2, खरवंडी 6, अशा 41 वीटभट्ट्या गेल्या अनेक वर्षापासून विनापरवाना, शासनाला मातीची रॉयल्टी न भरता चालू आहेत. त्यांनी शासनाची अनेक वर्षांची रॉयल्टी बुडविली असल्याचे गायके यांनी म्हटले आहे.

The post तेरा गावांत 41 बेकायदा वीटभट्ट्या ; नेवासा तालुक्यातील प्रकार appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/IYzAJBD
via IFTTT

पुणे-बैंगलोर हाईवे पर टैंकर ने 50 से ज्यादा गाड़ियों को मारी टक्कर, देखें वीडियो

Pune Bangalore Highway Accident: पुणे के पुणे-बैंगलोर हाईवे पर नेवले ब्रिज पर एक भीशन हादसा हुआ, जहां एक टैंकर चालक ने शराब के नशे में एक साथ लगभाग 50 से ज्यादा गादियों को टक्कर मारने से कुछ लोगों के घायल होने की खबर है। https://ift.tt/XoVlxid

Shraddha Murder Case: इन नौ गवाहों ने श्रद्धा मर्डर केस में खोले कई राज, ऐसे हत्यारे आफताब को किया बेनकाब

अब तक नौ ऐसे प्रमुख गवाह मिले हैं, जो श्रद्धा मर्डर केस में आफताब को फांसी दिलाने में अहम साबित हो सकते हैं। इनकी गवाही इस केस में काफी जरूरी हो गई है। https://ift.tt/XoVlxid

शेवगाव : ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील 12 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून, दहा दिवसांनी (दि.28) सोमावारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तालुक्यातील 12 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीस राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकरण अधिकारी तथा तहसीलदारांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती नोटिसाद्वारे केली आहे. या निवडणुकीसाठी 28 नोव्हेबर ते 2 डिसेंबर या … The post शेवगाव : ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sd43jw

गोळीबार केल्याने चोरटे पसार ; बालमटाकळीत दुसर्‍या ठिकाणी लाखाचा ऐवज लांबविला

बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे शनिवारी (दि.19) पहाटे अडीचच्या सुमारास दिनेश वैद्य यांच्या घरी तीन चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेजारीच राहत असलेले त्यांचे मोठे बंधू उपसरपंच तुषार वैद्य यांनी हवेत गोळीबार केल्याने चोरटे पसार झाले. परंतु, वैद्य यांच्या घरापासून काही अंतरावर राहत असलेल्या योगेश परदेशी यांच्या घराचे कुलूप तोडून … The post गोळीबार केल्याने चोरटे पसार ; बालमटाकळीत दुसर्‍या ठिकाणी लाखाचा ऐवज लांबविला appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sd43Ss

कोळपेवाडी : विवाह नोंदणी संस्था की लूटमारी केंद्र? रक्कम येताच मोबाईल ‘नॉट रिचेबल’

https://ift.tt/WSri5qw

कोळपेवाडी : वंशाला दिवा हवाच, या अट्टाहासाची किंमत आज सर्वांना मोजावी लागत आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी असल्यामुळे विवाह नोंदणी केंद्रांना सुगीचे दिवस आले. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही विवाह नोंदणी संस्था जणू सध्या लुटमारीचे केंद्र झाल्याचे भयावह चित्र सर्वत्र दिसत आहे. या विवाह नोंदणी संस्थांची चौकशी करून यापुढे अशा बोगस संस्थांवर कायद्याचा बडगा उगारण्याची गरज निर्माण झाली आहे. जमाना बदलला की, परिस्थिती बदलते. बदलेल्या परिस्थितीनुसार आपण वागू लागतो. त्यावेळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अनेक समस्या निर्माण होतात.

अशाच समस्या सध्या उपवर मुला- मुलींचे विवाह जुळण्यात निर्माण झाल्या आहेत. त्याचे दुष्परिणाम देखील दिसत आहेत. या परिस्थितीचा समाजातील काही महाविद्वान व्यक्ती फायदा घेवून उपवर मुलांच्या पालकांना लुबाडत असल्याचे समोर आले आहे. याबाबत अजून तरी पोलिसात कुणी तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावत आहे.’ याबाबत आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या माहितीतून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या. यामध्ये उपवर मुलाचे परिचय पत्र एका विवाह नोंदणी संस्थेकडून दुसर्‍या विवाह नोंदणी संस्थेकडे जाते. त्यानंतर या विवाह नोंदणी संस्थेकडून एक महिला अतिशय सभ्य भाषेत संवाद साधून संबंधित परिचय पत्रातील वराच्या पालकांना सांगते की, ‘तुमच्या मुलासाठी अर्थात परिचय पत्रातील ‘वर’ मुलासाठी आमच्याकडे एक स्थळ आहे. त्यांना तुमच्या मुलाचे परिचय पत्र आवडले आहे.

त्यांच्याशी पुढील बोलणी करायची का? आम्ही तुमच्याशी त्यांचा संपर्क करून देवू.’ या संभाषणातून वराच्या पालकांना जणू वाळवंटात ‘ओअ‍ॅसिस’ सापडल्याचा झालेला आनंद समोरच्या व्यक्तीकडून नेमका हेरला जातो. ‘त्यांना विवाह संस्थेत नाव नोंदणी करण्यासाठी कमीत- कमी 4 हजार रुपये भरावे लागतील,’ असे फोनवर बोलणारी व्यक्ती सांगते. संबंधित मुलीकडील पालकांनी आमच्याकडे 4 हजार रुपये भरून नोंदणी केली आहे. तुम्ही नोंदणीसाठी 4 हजार रुपये ऑनलाईन पाठवा,’ असे सांगते. त्याप्रमाणे वराचे पालक 4 हजार रुपये ऑनलाईन पाठवतात, मात्र पैसे मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून सुचविलेल्या मुलीच्या स्थळाबाबत काही दिवस कोणताच प्रतिसाद मिळत नाही. यानंतर संबंधित व्यक्तीशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास तो फोन ‘नॉट रिचेबल’ किंवा ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ असल्याचे उत्तर मिळते. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे उपवर मुलाच्या पालकांच्या लक्षात येते, मात्र तापर्यंत वेळ निघून गेलेली असते.
(क्रमश: – भाग -1)

उपवर मुलांच्या पालकांना लुटीचा गोरख धंदा!

मुलाच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी असल्यामुळे मागील काही वर्षांपासून उपवर मुलांचे विवाह जमविणे, ही मोठी समस्या होऊन बसली आहे. मुलाला सरकारी नोकरी पाहिजे, शेती पाहिजे, कुटुंब छोटे पाहिजे, अशा अनेक उपवर मुलींच्या घरच्यांच्या अपेक्षा असल्यामुळे यापैकी एकही गोष्ट कमी असली तरी साधी विचारपूस देखील केली जात नाही. त्यामुळे अशा संधीचा समाजातील काही संधीसाधू व्यक्ती फायदा घेत आहे. विवाह नोंदणी संस्थांच्या नावाखाली लग्नासाठी इच्छुक असणार्‍या उपवर मुलांच्या पालकांना लुटण्याचा गोरखधंदाच काही विवाह नोंदणी संस्थांनी मांडला आहे.

The post कोळपेवाडी : विवाह नोंदणी संस्था की लूटमारी केंद्र? रक्कम येताच मोबाईल ‘नॉट रिचेबल’ appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/XAMuCIP
via IFTTT

नगर-माळशेज काँक्रिटीकरण ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

https://ift.tt/h2dQM7r

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राज्याच्या पटलावर दळणवळणात नगरचे महत्व वाढविणार्‍या आणखी एका काँक्रिटीकरण रस्त्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. नगर-माळशेज हा 168 कि.मी. रस्ता काँक्रिटीकरणासाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंत्री गडकरी यांनी जाहीर केला. नगर येथील उड्डाणपूल उद्घाटन समारंभप्रसंगी केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री आमदार राम शिंदे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, महापौर रोहिणी शेंडगे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, भैय्या गंधे, सुवेंद्र गांधी, अरुण मुंडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, राष्ट्रीय महामार्गाचे प्रफुल्ल दिवाण, मिलिंदकुमार वाबळे आदी उपस्थित होते.

मंत्री गडकरी म्हणाले, नगर शहरातील उड्डाणपुलासाठी तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांनी बराच पाठपुरावा केला. त्यांच्यानंतर खासदार सुजय विखे पाटील यांनी मागे लागून या कामी यशस्वी पाठपुरावा केला. अनेक अडचणींवर मात करून हा उड्डाणपूल सुंदर पूर्ण झाला असून, तो आज खुला होत असल्याने आनंद आहे.

भूसंपादनासाठी खा. विखेंनी पुढाकार घ्यावा!

सूरत-चेेन्नई हा महामार्ग नगरच्या दृष्टीने औद्योगिक विकासाला चालना देणारा आहे. या कामाचे सोलापूर जिल्ह्यात भूसंपादन झाले आहे. खा. विखे यांच्या सहकार्याने नगर जिल्ह्यातही हे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला.

लॉजिस्टीक पार्कआणि स्मार्ट गावे!

ग्रीन फिल्डमुळे रोजगार निर्मितीही होणार आहे. या मार्गाच्या दुर्तफा लॉजिस्टक पार्क, औद्योगिक क्लस्टर, स्मार्ट शहर, स्मार्ट गावे उभारण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने पुढाकार घ्यावा, अशी विनंती गडकरी यांनी केली आहे. लॉजिस्टीक पार्कमुळे या रोडच्या बाजूला एक नवीन उत्पन्न स्त्रोत तयार होईल. त्यामुळे या भागातील लोकांना रोजगार मिळून सर्वांगिण विकास होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

शेतकरी अन्नदाताच नव्हे, उर्जादाताही बनवा!

नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सविधा निर्माण होत आहे. येथील शेतीचा विकासही चांगला झाला आहे. मी वाहतूक मंत्री असल्याने भविष्याच्या दृष्टीने सगळ्या साखर कारखानदारांना विनंती करतो की, साखर कमी तयार करा आणि इथेनॉल जास्त तयार करा. यातून येणार्‍या काळात आपला शेतकरी देखील केवळ अन्नदाता नाही, तर उर्जादाता बनला पाहिजे, असे आमचे स्वप्न आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, उड्डाण पूल हे नगरकरांचे अनेक वर्षाचे स्वप्न होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे हे स्वप्न साकार होत आहे. त्यांच्या हस्ते हे उद्घाटन होत आहे. याचा आनंद आहे. नगर या ऐतिहासिक शहरामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहला जाईल, असा हा समारंभ आहे. या उड्डाण पुलाच्या कामाला खासदार डॉ. सुजय विखे यांनी गती दिली, मात्र स्व.दिलीप गांधी यांनी या पुलाचा मूळ पाया रोवला आहे. त्यांचे या पुलाच्या कामासाठी विशेष प्रयत्न आहेत. त्यामुळे आज त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तसेच लष्करप्रमुख नरोडे यांचेही यावेळी मंत्री विखे यांनी आभार मानले.

महाराष्ट्राच्या विकासचक्राला गती : फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन उपस्थित दर्शवताना, महाविकास आघाडी सरकारच्या काळात विविधकामे खोळंबली होती. मात्र आता महाराष्ट्राच्या विकासचक्राला गती प्राप्त झाली आहे, असे सांगून या पुलाचे काम करताना युवा खासदार सुजय विखे पाटील यांनी उड्डाण पुलाला जोडून 85 खांब उभारले, व त्यावर शिवचरित्र चित्र रुपात साकारण्याची संकल्पना मांडली. यासाठी त्यांनी खासदार आणि आमदार निधीतून निधीही उपलब्ध करून दिला. मला याचा आनंद असल्याचेही फडणवीस म्हणाले.

The post नगर-माळशेज काँक्रिटीकरण ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/AJeUITb
via IFTTT

नेवासा: न्यायालयाच्या इमारतीसाठी 54 कोटी खर्चाला प्रशासकीय मंजुरी : आमदार शंकरराव गडाख

नेवासा: पुढारी वृत्तसेवा : नेवासा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू झाल्याने गेल्या 7-8 वर्षात न्यायालयीन कामकाजाची व्याप्ती आणि विस्तार वाढला आहे. त्यामुळे न्यायालयाला सध्याच्या इमारतीत जागा कमी पडत होती. ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हा न्यायालयाला नवीन इमारत व्हावी अशी वकील संघाची मागणी होती. म्हणून नवीन इमारतीसाठी आपण केलेल्या प्रयत्नाला यश आले असून आता … The post नेवासा: न्यायालयाच्या इमारतीसाठी 54 कोटी खर्चाला प्रशासकीय मंजुरी : आमदार शंकरराव गडाख appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sd1vfg

रुग्णसेवेचा विडा; पण मनुष्यबळाचा तिढा!

https://ift.tt/O6nyRJa

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी कोट्यवधीची साहित्य साम्रुगी, आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, पुरेसे मनुष्यबळ नसल्याचेही तितकेच वास्तव आहे. सध्या वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, आणि वर्ग 4 या संवर्गातील तब्बल 358 पदे रिक्त असून, ही पदे भरण्यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून शासनाकडे आवश्यक ती माहिती पाठविण्यात आल्याचे समजले.
शासनाने नुकतीच नोकरी भरतीवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे क संवर्गातील 80 टक्के रिक्त जागा भरण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. हे सुरू असताना आरोग्य सेवेसारख्या विभागातही केवळ संवर्ग क नव्हे तर वर्ग1, वर्ग 2 सारख्या जागाही रिक्त असल्याच दिसते.

डॉक्टरांची 59 पदे रिक्त

वर्ग 1 आणि वर्ग 2 मध्ये प्रामुख्याने डॉक्टरांची पदे भरली जातात. सिव्हील रुग्णालयात 210 पदे मंजूर आहेत. मात्र, यापैकी 151 पदे भरलेली आहे. तर 59 पदे रिक्त असल्याचे आकडेवारीतून दिसते. ही पदे मंत्रालयातून भरली जातात.

संवर्ग 3 ची भरती नाशिकहून?

संवर्ग 3 मध्ये पॅरोमेडीकलमध्येही 320 पैकी 100 जागा रिक्त आहेत. फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ इत्यादी पदे यामध्ये रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्याची जबाबदारी नाशिक विभागीय अधिकार्‍यांकडे असल्याचे समजते.

‘सुश्रुषा‘ भरतीच्या हालचाली

संवर्ग 3 मध्ये सुश्रूषामधील परिचारीका, परिचर इत्यादी पदे भरण्यासाठीही प्रशासनाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. सुश्रूषाची 26 पदे रिक्त आहेत.

सिव्हीलमध्ये 282 बेड
जिल्हा रुग्णालयात 282 बेड आहेत. या रुग्णालयाकडे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांचाही कल आहे. दिवसेंदिवस खासगीच्या तुलनेत सिव्हीलमध्ये गोरगरीबांना चांगल्या दर्जाची रुग्णसेवा मिळत असल्याने इकडे आता बेडही कमी पडू लागल्या आहेत. तर मनुष्यबळही कमी पडू लागले आहे.

कोरोनानंतर घडी पूर्वपदावर

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी कोरोनात विस्कळीत झालेली रुग्णसेवेची घडी पुन्हा एकदा बसवली आहे. कोरोना कालावधीत रुग्णालयात प्रसुती बंद होती. आता जानेवारीपासूनच ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. 24 तास रुग्णांना सेवा कशी देता येईल, यासाठी त्यांनी प्रशासनासोबत मायक्रो प्लॅन तयार केलेला आहे.

संवर्ग मंजूर भरलेली रिक्त
वर्ग 1 50 25 25
वर्ग 2 160 126 34
वर्ग 3 320 220 100
शुश्रुषा 362 326 36
वर्ग 4 387 224 163
एकूण 1279 921 358

The post रुग्णसेवेचा विडा; पण मनुष्यबळाचा तिढा! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/FHubN9n
via IFTTT

वाळकी : महिलेचे दागिने दोघांनी हिसकावले

https://ift.tt/FktV5ad
chain snaching

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  घरासमोर बसलेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने दोघा अनोळखी इसमांनी भरदिवसा हिसकावून नेले. ही घटना नगर तालुक्यातील मठपिंप्री गावात मंगळवारी (दि.15) दुपारी घडली.
याबाबत चंद्रकला रमेश बोरकर ( वय 45, रा. मठपिंप्री, ता.नगर ) यांनी बुधवारी (दि.16) दुपारी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोरकर या मंगळवारी (दि.15) दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास घराच्या पडवीत बसलेल्या होत्या.

त्यावेळी दोन इसम त्यांच्या जवळ आले व पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना बोलण्यात गुंतवले. त्यानंतर अचानक त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, तसेच कानातील कर्णफुले असे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून चोरून नेले. अचानक झालेल्या या प्रकाराने त्या गोंधळून गेल्या. त्यानंतर सायंकाळी त्यांनी ही घटना कुटुंबियांना सांगितली. याबाबत त्यांनी बुधवारी (दि.16) दुपारी नगर तालुका पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

The post वाळकी : महिलेचे दागिने दोघांनी हिसकावले appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/9ktAOoh
via IFTTT

नगर : ‘त्यांच्या’वर गोमूत्र शिंपडण्याची गरज : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

https://ift.tt/SNGgoxL
Raosaheb Danve

नगर : पुढारी वृत्तसेवा :  स्वर्गीय बाळासहेब ठाकरे यांना ज्या शक्तीने शिव्या शाप दिला, त्याच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हिंदुत्ववादी विचाराशी प्रतारणा करीत आघाडी करणारे जे कोणी आहेत. त्यांच्यावरच खर्‍या अर्थाने गोमूत्र शिंपडले पाहिजे, अशी टीका केंद्रीय रेल्वे व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस आघाडीबरोबरच शिवसेनेवर केली. नगर ते आष्टी या रेल्वे मार्गाच्या शुभारंभासाठी राज्यमंत्री दानवे गुरुवारी नगरला आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे विचाराने कोणा एका कुटुंबाचे वारस ठरु शकत नाहीत. त्यांच्या विचारांचे बुहुतांश वारस आहेत. मात्र, त्यांच्या संपत्तीचे काही जण वारस आहेत. संपत्तीचे वारस हे विचारांचे वारस असतीलच असे नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

गुरुवारी त्यांचा स्मृतिदिन होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर काहींनी त्या ठिकाणी गोममुत्र शिपडून शुध्दीकरण केले. याकडे राज्यमंत्री दानवे यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना शिव्या शाप दिले. त्या नेत्यांबरोबर म्हणजेच महाविकास आघाडीबरोबर शिवसेनेने सरकार स्थापन केले. त्यामुळे त्यांच्यावरच खर्‍या अर्थाने गोमूत्र शिंपडण्याची गरज होती, अशी टीका दानवे यांनी शिवसेनेवर केली. त्यांचा हिंदुत्वाचा प्रखर विचार पुढे नेण्याचे काम भाजप व मुख्यमंत्री करीत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, राज्यमंत्री दानवे म्हणाले की, ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान माहीत नाही, ज्यांना सावरकर माहिती नाहीत.
त्यांचा स्वातंत्र्यासाठी असलेला त्याग, तपस्या माहित नाहीत, अशा व्यक्तींनी स्वातंत्रवीर सावरकरांवर बोलणे योग्य नाही, अशी टीका त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

त्यांनी इंग्रजांची माफी मागितली असती तर त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली नसती. ते शेवटपर्यंत इंग्रजांना शरण गेले नाहीत. त्यामुळे उगाचच सावरकरांवर टीका करु नये, असा सल्ला राज्यमंत्री दानवे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार डॉ. प्रितम मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर उपस्थित होते.

The post नगर : ‘त्यांच्या’वर गोमूत्र शिंपडण्याची गरज : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/Dj7i4Wy
via IFTTT