आजच मी ‘वर्षा’वरुन मुक्काम हलवतोय : उद्धव ठाकरे
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ३४ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी या बंडखोर आमादारांना समोर येऊन चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच तुम्हाला मी नकोय असं स्पष्टपणे सांगितल्यास मी लगेच मुख्यमंत्रीपद सोडेन, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. इतकच नाही तर मुख्यमंत्री आजच आपण मुक्काम वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरुन ‘मातोश्री’वर मुक्काम हलवत असल्याचंही सांगितलं.
राज्यामध्ये सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मला काँग्रेसचे कमलनाथ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन केले. तसेच आमचा तुम्हाला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस तसेच राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे नकोत असं म्हटलं तर हरकत नाही. मात्र माझ्या लोकांनी असं म्हणणं हे माझ्यासाठी खेदजनक असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. माझीच लोक म्हणत असतील की तुम्ही आम्हाला नकोय, तर माझ्यासाठी हे क्लेशदायक आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तुमचं जर असं म्हणणं असेल तर तुम्ही इथं येऊन बोलायला काय हरकत होतं? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना विचारलाय.
“तुम्ही कारभार करायला नालायक आहात. हे टॉप पाचव गैरे सोडून द्या, असं थेट समोर येऊन सांगा, मी उठतो. एकाने जरी स्टेटमेंट दिलं तर मी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. पण हे माझ्यासमोर येऊन बोला,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“धक्का? हो.. धक्का! माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहीत नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार आहे,” असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, “आजच मी वर्षावरुन मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला,” असंही बंडखोर आमदारांना सांगितलं.
“मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवणार आहे. ते घेऊन जावंं,” असंही मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमादारांना म्हटलं आहे.
https://ift.tt/zf8Spn3
0 Comments: