पाच राज्यांच्या निकालांमध्ये भाजपचा झंझावात; राज्यात महाविकास आघाडीवरील हल्ल्यांना बळ

March 11, 2022 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांमधून भाजपचा झंझावात अजूनही कायम असल्याचेच समोर आले असून, काँग्रेस पक्ष व गांधी कुटुंबाची राजकारणातील मूल्य जवळपास शून्य झाल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणावरही त्याचे नजीकच्या काळात व दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सरकारवर याचे काहीही परिणाम होणार नसल्याचे म्हटले असले तरी ते उसने अवसान असल्याचेच राजकीय गोटात बोलले जात आहे. राज्य सरकारवरील भाजपचे हल्ले या निवडणूक निकालामुळे तीव्र होणार असून, अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर गुंडाळले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे आमदार हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईत आले असून, नवाब मलिक यांची अटक व शिवसेनेच्या विविध नेत्यांवर पडत असलेल्या ईडी व आयकर खात्याच्या छाप्यांमुळे आघाडीच्या आमदारांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. सरकार भाजपला कोणत्याही प्रकारे प्रत्त्युत्तर देत नसल्याने बावरलेले सत्ताधारी आमदार या निकालाने अधिकच धास्तावले आहेत. तर अत्यंत टेचात असलेल्या विरोधी आमदारांचे बळ या विजयाने दुपटीने वाढलेले असून अधिवेशन २५ तारखेच्या आधीच गुंडाळले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाचा पंजाब, गोवा, उत्तराखंड या राज्यांमध्ये पुरता धुव्वा उडाल्याने पक्षाच्या राज्यातील नेत्यांना आपल्या भविष्याची चिंता सतावू लागली आहे. शिवसेनेच्या आमदारांमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार बनवून पक्षाने नक्की काय मिळवले, अशी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा मागे लावून घेतला असून, दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जनाधार निवडणुकीत शिवसेनेला काही केल्या मते देत नाहीत, असे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून स्पष्ट झाल्याचे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्ष नवनवे नीचांक स्थापित करत असूनही काँग्रेसचे नेते कुठल्या जिवावर 'एकला चलो रे'सारखे नारे देतात, असा उद्वेगजनक सवाल शिवसेनेच्या एका नेत्याने केला. पंजाबमध्ये काँग्रेसची जी अवस्था झाली, तशीच किंबहुना त्यापेक्षाही दारूण अवस्था मुंबईत होण्याची शक्यता असतानाही काँग्रेसचा एकटे लढण्याचा हट्ट असल्याबद्दल शिवसेनेतून नाराजी व्यक्त होत आहे. आता लक्ष्य पहिल्या क्रमांकाचे नेते भाजपच्या गोटात प्रचंड जल्लोषाचे वातावरण असले तरी भाजपमध्येही दोन मतप्रवाह आहेत. एक तर हे सरकार पाडून अथवा आघाडीचे आमदार फोडून नवे सरकार बनवावे, अशा मताचे काही जण असून, असे न करता या आघाडीला असेच थकवून थकवून संपवावे आणि भाजपने स्वबळावर राज्यात निवडून यावे, असा एक मतप्रवाह आहे. मात्र या विजयामुळे भाजपचे महाविकास आघाडीवरील हल्ले अधिक तीव्र होणार आहेत. आत्तापर्यंत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमाकांच्या नेत्यांना लक्ष्य केले जात होते. आता पहिल्या क्रमांकाच्या नेत्यांच्या दिशेने केंद्रीय यंत्रणांचा रोख वळण्याची शक्यता भाजपच्या गोटातून वर्तवली जात आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: