... म्हणून साखरपुड्यातच उरकला जातोय विवाह सोहळा

January 02, 2022 0 Comments

औरंगाबादः ओमिक्रॉन या करोनाच्या नवीन विषाणूने जगासह देशाची चिंता वाढवली आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात येत आहे. त्याचप्रमाणे संभाव्य करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धास्तीने आगामी काळात होणारे लग्न आताच साखरपुड्यातच उरकण्याचा ग्रामीण भागातील लोकांनी धडाकाच लावला आहे. महाराष्ट्रात करोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत मिळत असल्याने राज्य सरकारने निर्बंध आणखी कठोर केले आहेत. त्यानुसार विवाह सोहळ्यांबरोबरच कोणत्याही समारंभात फक्त ५० जणांनाच परवानगी असेल. त्यामुळे मोठा खर्च करून ५० लोकांमध्ये लग्न करण्यापेक्षा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित साखरपुड्यातच लग्न उरकण्याचे प्रमाण गेल्या आठवड्याभरात ग्रामीण भागात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तर शहरात सुद्धा काही प्रमाणात असे कार्यक्रम पार पडत आहे. वाचाः पुढील काही काळात आणखी कठोर निर्बंध लावले जाणार आल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्यामुळे भविष्यात लग्न समारंभावर बंदी आली किंवा ५० पेक्षाही कमी लोकात कार्यक्रम साजरे करण्याचे आदेश काढल्यास लग्न कसे लावणार? असा प्रश्न वधू-वराच्या कुटुंबातील लोकांना पडला आहे. त्यामुळे त्यापूर्वीच सद्या ५० लोकांमध्येच साखरपुड्यात लग्न उरकून घेण्याचे प्रमाण वाढत आहे. वाचाः आधीच मुली मिळेना... आपलं लग्न यादगार राहावे असे सर्वानाच वाटते, म्हणून लग्न धुमधडाक्यात करण्याचं अनेकांच स्वप्न असते. पण सद्याची परिस्थिती पाहता आणखी किती दिवस निर्बंध कायम राहतील याचा अंदाज नाही. त्यात एवढ्या काळासाठी मुलीकडेच्या लोकांना थांबवून ठेवणंही अवघड असते. तर लग्न लवकर उरकून घेण्याचा सूर मुलीकडच्या लोकांचा असतो, त्यामुळे मुलीकडच्या लोकांना नाराज करता येत नसल्याने लग्न साखरपुड्यातच उरकले जात आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: