राज्यातील कोणत्या जिल्ह्यात लॉकडाऊन कायम, कोणत्या जिल्ह्यात सवलत?

June 01, 2021 0 Comments

मुंबईः राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. मात्र, अजूनही काही जिल्ह्यात संसर्गाचा प्रादुर्भाव कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवण्यात आला असल्याची घोषणा केली असली तरी काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले असून काही जिल्ह्यात लॉकडाऊनचे नियम जैसे थे आहेत. याबाबत घेतलेला आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असल्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर, राज्यातील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध कठोर किंवा शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात येईल. 'ब्रेक द चेन' अंतर्गंत नियमावलीही जारी करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी राज्यातील इतर जिल्ह्यातील लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला आहे. या जिल्ह्यात निर्बंध शिथिल मुंबईतही दुकानं उघडणार मुंबईत काही घटकांमधील निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यात अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने आठवड्यातून पाच दिवस आलटून पालटून सुरू ठेवण्यास पालिकेने अनुमती दिली आहे. मुंबईतील अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवता येणार आहेत. त्याचवेळी, बिगर अत्यावश्यक दुकाने सोमवारी ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली राहतील. ई-कॉमर्स अंतर्गत आवश्यक घटकांमध्ये समाविष्ट नसलेल्या वस्तूंचेही वितरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुणेकरांना दिलासा राज्य सरकारने दिलेल्या आदेशांनुसार पुणे महापालिकेतील घटलेला संसर्ग पाहता पुण्यात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत शहरातील संचारबंदी शिथिल करण्यात आली असून, जमावबंदी कायम ठेवण्यात आली आहे. पुढील दहा दिवस दुपारी तीन ते सकाळी सात या काळात पुन्हा संचारबंदी राहणार असून, अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुठल्याही कारणास्तव घराबाहेर पडता येणार नसल्याने महापालिका आयुक्तांनी आपल्या आदेशांमध्ये नमूद केले आहे. शहरातील मॉल, मल्टिप्लेक्स, शॉपिंग सेंटर्समधील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत उघडण्यात येणार आहेत. नाशिककरांना दिलासा नाशिक शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सूरज मांढरे यांनी निर्बंध काहीसे शिथिल केले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवांसह इतर दुकानेही, आज सोमवारपासून सकाळी ७ ते २ या वेळेत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेतच सुरू राहणार आहेत. ठाण्यात निर्बंध शिथिल ठाणे शहरातील करोना बाधित होण्याचा दर १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने शहरातील निर्बंध अंशत: शिथिल करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी घेतला. राज्य सरकारच्या निर्देशानुसार ठाणे शहरामध्ये आवश्यक वस्तू व सेवांच्या दुकानांची वेळ सकाळी ७ ते दुपारी २ अशी करण्यात आली आहे. नागपूरमध्ये दुकाने उघडणार शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून असलेले निर्बंध शिथील करण्याचा निर्णय नागपूर महापालिकेने घेत नागरिकांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. त्यामुळे आता शहरात अत्यावश्यक सेवांची आणि अत्यावश्यक सेवेत न मोडणारी एकल दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे अर्थचक्र बऱ्यापैकी रुळावर येणार आहे. पिंपरीत निर्बंध शिथील पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवेमधील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस रोज सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. याशिवाय अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील, तसंच, रेस्टॉरंट व बार यांना फक्त पार्सल व घरपोच सेवा देता येणार आहे. असे आदेश महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी सोमवारी जारी केले. लातूरमधील निर्बंध अंशतः शिथिल लातूर शहरातील अत्यावश्यक सेवेत नसणारी सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येतील. मात्र, गर्दी होऊ शकणारे मॉल किंवा अशा प्रकारची दालने सध्या बंद ठेवण्यात येणार आहेत. आंतरजिल्हा वाहतुकीसाठी पास बंधनकारक असेल. कृषीविषयक दुकानांसाठी पाच वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. अमरावतीत नवे नियम कोणते? जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, किराणा, भाजीपाला, बेकरी, चिकन, मासे आदी दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बिगरजीवनावश्यक एकल दुकानेही (मॉलमधील नव्हे) शनिवार व रविवार वगळता सकाळी ७ ते २ या वेळेत सुरू राहतील. उपाहारगृहांनाही सकाळी ११ ते ७ या वेळेत घरपोच सेवेची परवानगी देण्यात आली आहे. गडचिरोलीत नवे नियम - विविध दुकाने आस्थापना सुरू करत असताना वेळांमध्ये बदल करून तो आता सकाळी ७ ते दुपारी २ असा राहणार आहे. - आधी प्रमाणे आत्यावश्यक सेवेत येणारी दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ सुरू राहतील. - शुक्रवार दुपारी २ पासून मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत आत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून सर्व बंद राहतील. - हॉटेल, उपहारगृह, खानावळही बंदच राहिल मात्र पार्सल व घरपोच सुविधा सुरू राहील. - धार्मिक स्थळे बंदच असतील या जिल्ह्यात निर्बंध कायम पुणे ग्रामीणमध्ये निर्बंध १५ जूनपर्यंत कायम पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील करोना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण सुमारे १३ टक्के असल्याने जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील परिस्थिती ‘जैसे थे’ राहणार आहे. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेतच सुरू ठेवण्यात येणार असून, ‘वीकेंड लॉकडाउन’ हा कायम असणार आहे. वसईत निर्बंध जैसे थे ठाणे आणि पालघर जिल्ह्यास दिलासा मिळाला असला तरी वसई-विरार महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. वसई-विरार महापालिकेमध्ये ऑक्सिजन खाटांवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४५ टक्क्यांच्या आसपास असल्याने या महापालिका हद्दीत पूर्वीचे निर्बंध कायम राहणार आहेत. साताऱ्यामध्ये लॉकडाउन वाढवला जिल्ह्यात वाढती करोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी किराणा दुकाने, बेकरी, मटण, चिकन शॉप, हॉटेल बंदच राहणार असल्याचे आदेश सोमवारी सायंकाळी काढले. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील बाबी राहणार सुरू राहणार असून, पेट्रोल पंपावरदेखील अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच मिळणार पेट्रोल मिळणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: