UPA अध्यक्षपदावरून संजय राऊत यांचा काँग्रेसला टोला, म्हणाले...
मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक चकमक सुरू आहे. शिवसेनेचे खासदार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अर्थात यूपीएच्या अध्यक्षपदाबाबतचा मुद्दा छेडल्यानंतर त्यावर काँग्रेसकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांना द्यावे असे वक्तव्य खासदार राऊत यांनी केले होते. त्यावर राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला राऊत यांनी उत्तर दिले आहे. ( mp gives reply to over ) संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदाचा विषय हा केंद्र स्तरावरील चर्चेचा विषय आहे. त्या संदर्भात राज्यातील किंवा जिल्हा-तालुका स्तरावरील नेत्यांनी बोलू नये, असा टोला राऊत यांनी पटोले यांना लगावला आहे. आपण युपीएबाबत बोललो, त्यासाठी यूपीएचा भाग असल्याची काही आवश्यकता नाही. या देशात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षांची एक मजबूत आघाडी उभी करावी लागेल आणि त्यासाठी यूपीएबाबत चर्चा होणे गरजेचे असल्याचे राऊत म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- राऊत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव न घेता ही प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय दिल्ली स्तरावरील आहे. त्यात महाराष्ट्रातील नेत्यांनी पडू नये असे राऊत म्हणाले. याबाबत आणि राहुल गांधी काही बोलले तर आम्ही त्याला उत्तर देऊ. या देशात विरोधी पक्षांची एक मजबूत आघाडी बनली पाहिजे. असे झाले नाही, तर मग भाजपचा पराभव कसा काय करणार? असा सवाल करत या प्रश्नाचे उत्तर या नेत्यांनी दिल्लीत बसून द्यावे, असे राऊत म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- काँग्रेस पक्षाने जर यूपीएच्या अध्यक्षपदाचा हट्ट सोडला नाही, तर मग काही राष्ट्रीय स्तरावरील नेते यूपीए-२ स्थापन करण्याची तयारी करत आहेत. हा चिंतेचा विषय असल्याने यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे असे आपण म्हटल्याचे राऊत म्हणाले. असे असले तरी यूपीएमध्ये काँग्रेस पक्ष हा हवाच असेही ते पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: