...तर ७० कोटी लोकांना ऐकण्यासाठी यंत्राची मदत घ्यावी लागेल!

March 04, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई वाहनांचा वाढता आवाज, सतत वाजवले जाणारे हॉर्न, सणउत्सवादरम्यान ढोल-ताशे, डीजे या सगळ्याकडे बहुतांश मुंबईकर दुर्लक्ष करतात. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने सन २०५० पर्यंत जगातील २५ टक्के नागरिकांमध्ये श्रवणदोष निर्माण होईल, असा इशारा दिल्यानंतर याची काळजी काळजी घ्यायला हवी, असे आवाहन ध्वनी प्रदूषणाविरोधात लढणाऱ्यांनी केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २ मार्च रोजी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. पहिला श्रवण अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार आज जर ध्वनी प्रदूषणाविरोधात कार्यवाही केली नाही तर ७० कोटी लोकांना ऐकण्यासाठी यंत्राची मदत घ्यावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. वाचा: माणसाची श्रवणशक्ती महत्त्वाची असते. यावर उपचार न झाल्यास बोलण्यााची ताकद नष्ट होऊ शकते. यामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, असे जागितक आरोग्य संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. टेड्रोस गेब्रिएसस स्पष्ट केले आहे. जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेतर्फे अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालानुसार श्रवणदोषाशी लढण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. श्रवणदोष हा केवळ ज्येष्ठ नागरिकांमध्ये निर्माण करतो, हा समजही चुकीचा असल्याचे या निमित्ताने स्पष्ट करण्यात आले आहे. वाचा: या अहवालानुसार कामाच्या ठिकाणी, रस्त्यावर असलेला अती उच्च आवाज हा श्रवणदोष किंवा श्रवण ताकद कायमची हरवून बसण्यासाठी कारणीभूत असतो. भारतामध्ये अनेक ठिकाणी कानाची योग्य पद्धतीने काळजी घेण्यात येत नाही, याकडे आवाज फाऊंडेशनच्या सुमैरा अब्दुलली यांनी लक्ष वेधले. भारतामध्ये ऑडिऑलिजिस्टची संख्या वाढत आहे आणि तरुणांमध्ये जनजागृतीही होत असल्याचे या अहवालात नमूद आहे. यासंदर्भात अभिनंदन करताना अब्दुलली यांनी ध्वनी प्रदूषणाच्या स्रोतांवर नियंत्रण येणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. 'ऐकणे सुरक्षित व्हावे' बहिरेपणासाठी ज्या गोष्टींना नागरिक सामोरे जातात, त्याविरोधात कारवाई व्हायला हवी, अशी मागणी अब्दुलली यांनी केली आहे. बहिरेपणा हे जागतिक पातळीवरील अपंगत्व आहे. त्यामुळे ऐकणे सुरक्षित व्हावे यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: