मुंबई पोलिसांसाठी 'सीआययू' शापित

March 28, 2021 0 Comments

दीपेश मोरे, मुंबई रणजित शर्मा गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त असताना, तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक आणि सध्याचे निवृत्त सहायक पोलिस आयुक्त यांची ''मध्ये नियुक्ती करण्यात आली. अबू सालेम टोळीचा गँगस्टर अबू सायमा उर्फ हा २६ ऑगस्ट १९९७ मध्ये दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर परिसरात ढोबळेंच्या एन्काउंटरमध्ये मारला गेला. हे एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप करीत ढोबळे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. या प्रकारामुळे 'सीआययू' आणि अर्थातच गुन्हे शाखा चर्चेत आली. 'सीआययू'ला काही दिवस पूर्वीप्रमाणेच अकार्यक्षम करण्यात आले. त्यानंतर गुन्हे शाखेत आलेल्या सहपोलिस आयुक्तांनी दोन भागांत विभाजन करीत पोलिस मुख्यालयातील 'सीआययू' आणि अंधेरी येथे 'सीआययू उपनगर' अशी दोन युनिट केली. सीआययू उपनगरची जबाबदारी प्रदीप शर्मा यांच्याकडे देण्यात आली. याचवेळी सचिन वाझेही याच 'सीआययू उपनगर'मध्ये कार्यरत होते. घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपी ख्वाजा युनूस याला अहमदनगर येथील तुरुंगात नेत असताना, ७ जानेवारी २००३ रोजी सचिन वाझे यांच्या तावडीतून पसार झाला. ख्वाजाचा काहीच पत्ता न लागल्याने वाझे यांच्या कोठडीतील मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. वाझे आणि तीन पोलिस कॉन्स्टेबल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि ३ मार्च २००४ रोजी राज्य गुन्हे अन्वेषण पथकाने वाझे यांना अटक केली. त्यावेळी सत्यपाल सिंग गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त होते. या प्रकारानंतर 'सीआययू उपनगर' बंद करून पोलिस मुख्यालयात एकच 'सीआययू' ठेवण्यात आले. आताही 'सीआययू'च निर्मिती करण्यापासूनच 'सीआययू'ला कधी कार्यक्षम म्हणून अधिकार देण्यात आला, तर कधी अकार्यक्षम बनवून केवळ प्रशासकीय काम सोपविण्यात आले. पुढे राकेश मारिया, हिमांशू रॉय सहपोलिस आयुक्त असताना, 'सीआययू' आणि 'सीआययू ऑपरेशन' अशा दोन युनिटमध्ये काम सुरळीत सुरू होते. करोनाकाळात सचिन वाझे यांना पोलिस दलामध्ये घेताच 'सीआययू'चे प्रमुख करण्यात आले. आयुक्त परमबीर सिंग यांनी टीआरपी घोटाळा, डीसी अवंती कार घोटाळा, फेक फॉलोअर्स प्रकरण, कंगना-हृतिक ईमेल वाद ही सर्व महत्त्वाची प्रकरणे तपासाकरिता इतर पथके असताना केवळ 'सीआययू'कडे दिली. याच 'सीआययू'मुळे तिसऱ्यांदा मुंबई पोलिस दल अडचणीत आले असून, आयुक्तांना पायउतार व्हावे लागले आहे. इतकेच नाही, तर वाझे यांच्यामुळे गुन्हे शाखेच्या ६५ अधिकाऱ्यांची अपमानास्पदरित्या बदली करण्यात आली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: