शेतकरी आंदोलनात मुख्यमंत्री सहभागी होणार का?; पवारांनी दिलं 'हे' उत्तर

January 25, 2021 0 Comments

मुंबईः केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी ठाण मांडला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत सुरु आहे. आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन होत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आझाद मैदानात येणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री यांनीही मोर्च्याला पाठिंबा दिला असून तेदेखील मोर्चात सहभागी होणार का?, अशा चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्रीपद हे घटनात्मकपद आहे. त्यामुळं त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली असल्याचं सूत्रांकडून समजतंय. त्याचबरोबर, अद्यापही मुंबईत करोनाचं संकट आहे असं असताना मुख्यमंत्र्यांनी गर्दी असलेल्या ठिकाणी जाऊ नये, असंही पवारांचं मत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं मुख्यमंत्री मोर्च्यात सहभागी होणार असल्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आझाद मैदानातील मोर्चात सहभागी होणार आहे. तसंच, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही शेतकरी मोर्च्याला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या काय? केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, करोना काळात राज्य सरकारनं स्थगित केलेली महात्मा फुले कर्ज माफी योजना पुन्हा सुरू करावी, वनाधिकार खात्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: