मोदी सरकार अर्णव गोस्वामीला का वाचवतंय?; 'या' नेत्याचा सवाल
मुंबई: टीआरपी घोटाळ्यात अटक करण्यात आलेला 'बार्क'चा माजी सीईओ पार्थो दासगुप्ता याच्या चौकशीतून रोजच्या रोज नवी माहिती समोर येत आहे. त्यासोबतच, रिपब्लिक टीव्हीचे मालक, संपादक यांचा या घोटाळ्यातील सहभाग दिवसेंदिवस स्पष्ट होत आहे. त्यावरून महाराष्ट्र काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाला घेरलं आहे. 'मोदी सरकार अर्णव गोस्वामी यांना संरक्षण का देतंय?,' असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते यांनी केला आहे. वाचा: सचिन सावंत यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. रिपब्लिक टीव्हीकडून दासगुप्ताला दोन वेळा हॉलिडे पॅकेज म्हणून १२ हजार अमेरिकी डॉलर मिळाले होते. तर, तीन वर्षांत एकूण ४० लाख रुपये दासगुप्ताला मिळाले होते. दासगुप्ता याने पोलिसांकडं तशी कबुली दिली आहे. त्यावरून सचिन सावंत यांनी भाजपला टोला हाणला आहे. वाचा: 'टीआरपी घोटाळ्यात अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात स्पष्ट पुरावे हाती आले आहेत. असं असतानाही भ्रष्टाचारी अर्णव यांच्याविरोधात कारवाईची मागणी भाजप का करत नाही? देशाला याचं उत्तर हवं आहे,' असं सावंत यांनी म्हटलं आहे. 'मोदी सरकार अर्णवला संरक्षण का देत आहे? तो भाजपचा कार्यकर्ता असल्यानं त्याला पाठिशी घातलं जातंय का? त्याला बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती कोणी पुरवली?,' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. अर्णव गोस्वामी यांना ताबडतोब अटक करून रिपब्लिक टीव्हीवर कारवाई करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: