चर्चा संविधानाच्या करायच्या आणि कृती मात्र, मनस्मृतीची हा दुहेरी चेहरा भाजपाने सोडला पाहिजे; अतुल लोंढे
चर्चा संविधानाच्या करायच्या आणि कृती मात्र मनस्मृतीची. हा दुहेरी चेहरा भाजपने सोडला पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावर आपले दोन केंद्रीय मंत्री बसले आहेत आणि अमेरिकेचे मंत्री त्यांच्यासमोर ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे वाभाडे काढतात हे निंदनीय असल्याचेही लोंढे म्हणाले.
भाजपाने आत्मपरिक्षण करायला हवे
८ वर्षामध्ये भाजपाची संपूर्ण सत्ता आली. दुसऱ्यांदा लोकांनी तुम्हाला सत्तेवर बसवले. देशात बेरोजगारी कमी होईल, कायदा सुव्यवस्था चांगली राहील असे जनतेला वाटले होते. गेल्या ८ वर्षात आपण काय केलं याचे भाजपाने आत्मपरिक्षण करायला हवे. मात्र, भाजपाने एका जातीच्या विरोधात दुसऱ्या जातीला उभे करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप लोढें यांनी केला. त्यामुळे कथली आणि करणी यातील अंतर आपल्या मिटवावे लागेल असेही लोंढे म्हणाले.
https://ift.tt/wQxDkmr
0 Comments: