मुंबईतील फौजदाराला पाथर्डीत लाथाबुक्क्यांनी मारहाण; कारण ऐकून धक्का बसेल!

विजयसिंह होलम । अहमदनगर पोलिस दलात फौजदारपदी (पोलिस उपनिरीक्षक) कार्यरत असलेले संदीप भगवान फुंदे (मूळ रा. फुंदेटाकळी ता. पाथर्डी) यांना पाथर्डीत मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्याकडील १७ हजार रुपये हिसकावून नेले. पोलिस ठाण्यात फुंदे यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी पार्किंग करताना धक्का लागल्याचे निमित्त झाले आणि ही घटना घडली. मुंबई पोलिस दलात कार्यरत संदीप फुंदे मुळेचे पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथील आहेत. सुट्टीवर ते गावी आले होते. पाथर्डी शहरात शेवगाव रस्त्यावर दुचाकी उभी करताना पाठीमागे असलेल्या मोटारीला फुंदे यांच्या वाहनाचा धक्का लागला. या कारणावरून मोटारीचा चालक आणि त्याच्या साथीदांरांनी फुंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या खिशातील १७ हजार रुपये हिसकावून नेले, अशी फिर्याद फुंदे यांनी दिली. यावरून पाथर्डी पोलिसांनी ज्ञानदेव कोंडीराम केळगंद्रे, प्रकाश नामदेव केळगंद्रे, सचिन गोरख केळगंद्रे, अक्षय ज्ञानदेव केळगंद्रे (सर्व रा. पागोरी पिंपळगाव ता. पाथर्डी), राहुल बापुराव त्र्यंबके, लतीफ शेख (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. हेही वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

भाजपची गोव्यातली स्ट्रॅटेजी म्हणजे, इतर पक्षांच्या फुटलेल्या मतांवर जिंकून यायचं.

जशी जशी गोवा विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तश्या तश्या अनेक राजकीय घडामोडी राज्यात पाहायला मिळत आहेत. 

गोव्याचे राजकीय गणित थोडं किचकटच झालं म्हणायला लागेल. त्यात राज्याच्या राजकारणात तृणमूल आणि आप’ने आपली मजबूत एंट्री केल्यानंतर आता कॉंग्रेसच म्हणण आहे कि, युती झाली तरी अन नाही झाली तरी राज्यात केवळ काँग्रेसच येणार….पण २०२२ च्या निवडणुकीत २०१७ ची पुनरावृत्ती करू. तसेच राज्यात सर्वाधिक मताधिक्क्यांनी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार पुन्हा निवडून आणू, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला आहे….त्यामुळे आता गोवा निवडणूकीचं रिंगण ‘गोवा प्लॅन’ एवढंच इंटरेस्टिंग ठरणारं आहे…

थेट गोव्यात काय चाललंय ते बघू….. 

गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकांमुळे, भारतीय जनता पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी सारख्या पक्षांनी राज्यात धोरणात्मकदृष्ट्या प्रयत्न चालू केले आहेत. 

त्यात आता भाजपच्या आमदारांचं वेगळंच काहीतरी चालूये…… भाजपच्या आमदारांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी तिकिट मिळवीत म्हणून प्रयत्न चालू केले आहेत. भाजपच्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे किमान १० नेते सध्या आपल्या मुलांना किंवा पत्नीला तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

गोव्याच्या राजकारणात प्रवेशासाठी भाजपचे नेते या पक्षांवर निशाणा साधत असले तरी त्यामुळे विरोधी मतांचे विभाजन होऊन भाजपलाच फायदा होईल, असे सत्ताधारी पक्षाच्या रणनीतीकारांचे मत आहे.

राजकीय रणनीतीकारांचा असा दावा आहे की,  बहुपक्षीय लढतीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला गोव्यात सत्ता टिकवून ठेवता येईल. तर आघाडीला आपल्या आपल्या पक्षांतील उमेदवारांचे  मतभेद आणि तिकीटाच्या दावेदारांसारख्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. या सगळ्यांच्या भांडण्यामध्ये मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपलाच फायदा होईल, असे सत्ताधारी पक्षाच्या रणनीतीकारांचे मत आहे.

पण असंही नाहीये कि भाजपला आयताच फायदा होईल, भाजपला देखील या निवडणुकीत स्वबळावर तिकीटाच्या दावेदारांना सांभाळणे एक मोठं आव्हान असणार आहे. त्यातल्या त्यात उत्तर गोव्यातील मतांचे विभाजन रोखण्यासाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत युती करणे हा एक मोठा प्रश्न आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑक्टोबरमध्ये जेंव्हा गोव्याचा दौरा केला होता तेंव्हा त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांना स्पष्टपणे सांगितले होते की, विरोधी उमेदवारांचे मते जितकी फुटतील तितकं पक्षाला निवडणुका जिंकणे सोपे जाईल.

त्यामुळे, आपली युती मजबूत करत करत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी सारख्या पक्षांशी युती करणाऱ्या काँग्रेसच्या प्रयत्नांवरही भाजप लक्ष ठेवून आहे. हे तर स्पष्ट आहे कि,दक्षिण गोवा जो कॅथलिकबहुल आहे तो भाजपविरोधी आहे त्यामुळे या वर्गाची मते टीएमसी आणि आप यांसारख्या पक्षांमध्ये विभागली जातील आणि हीच बाब त्यांच्यासाठी दिलासा देणारी आहे. पण तरी याचा फायदा सत्ताधारी पक्षालाच होणार आहे.

कारण सरकार स्थापन करण्यासाठी भाजप छोट्या पक्षांशी युती करतो. याची परिणीती २०१७ च्या विधानसभा निवडणुकीला आलेली. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४०  सदस्यीय विधानसभेत केवळ १३ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस दक्षिण गोव्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता आणि कॅथोलिक लोकांच्या मोठ्या प्रमाणातल्या पाठिंब्यावर १७ जागा जिंकल्या होत्या. दोन्ही पक्षांना बहुमत नव्हते तरी देखील कॉंग्रेसच्या हाती सत्ता येता येता राहिली आणि भाजपने  छोट्या पक्षांशी युती केली अन सरकार स्थापन केले होते. 

पण आत्ता बहुमत घेऊ शकणारी कॉंग्रेस लेचीपेची झाली म्हणायला लागेल कारण गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजीन्हो फेलेरो यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला. आणि त्यात गोव्यात एंट्री केलेल्या  टीएमसीची ताकद फेलेरो यांच्यामुळे आणखीनच वाढली. यामुळे आता असं होणार कि,  टीएमसी काँग्रेसची व्होट बँक खराब करेल. कॉंग्रेस गटाला मिळणारी मते आता टीएमसीला मिळतील मात्र  भाजपची मते कमी होणार नाही. 

कारण टीएमसी आणि कॉंग्रेस पक्षांमुळे भाजपविरोधी मते विभागली जातील. 

आणि सर्वात महत्वाचा मानला जाणारा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजेच दक्षिण गोव्यात टीएमसीच्या एंट्रीमुळे अल्पसंख्याक मते फुटतील..काही कॉंग्रेस तर काही आप तर काही टीएमसीला जातील. त्यामुळे भाजप फारच उत्साहित आहे.

२०१७ च्या निवडणुकीत AAP ने ३६ जागांवर निवडणूक लढवली पण एकही जागा मिळवली नव्हती. गोव्यातील प्रत्येक विजेच्या खांबावर फक्त झेंडे लावून मते मिळत नाहीत. गोव्यात सर्वांचे स्वागत. अशी गोव्याची जनता आप वर टीका करत असे आत्ताही असचं काही वातावरण गोव्यात आहे असं भाजप च्या नेत्यांच म्हणन आहे.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत १७ जागा जिंकणार्‍या काँग्रेसकडे आता फक्त पाच आमदार उरले आहेत.

उमेदवार निवडीबाबत भाजप याची वाट बघतोय कि, तिकीट वाटपापर्यंत कोण किती आणि कोणते पक्ष बदलतो. हे सगळं चित्र डिसेंबरअखेर स्पष्ट होईल. भाजप तर फुल ऑन तयार असल्याचं सांगतायेत. भाजपच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे गोवा निवडणुकीच्या बाबतीतचा  A, B आणि C सर्व प्लॅन तयार आहेत. कोणी पक्ष सोडल्यास त्याच्या जागी कोणाला तिकीट मिळणार हे देखील पक्षाने आधीच ठरवले आहे.  

राज्याच्या लोकसंख्येमध्ये हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिम हे अनुक्रमे ६६, २६ आणि ८.३३ टक्के आहेत. भाजपच्या २७ आमदारांपैकी १५  कॅथलिक आहेत. त्यापैकी दक्षिण गोव्यात विजयी झालेले काँग्रेसचे आठ माजी आमदार आहेत. पण अलीकडेच वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करण्यात आल्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांना भारतभेटीचे निमंत्रण दिल्याने, दक्षिण गोव्यातील निवडणुकीवर त्याचा परिणाम चांगला पडेल अशी भाजपला आशा आहे.

“ कारण पंतप्रधानांच्या पोपसोबत झालेल्या भेटीमुळे गोव्यातल्या कॅथलिक समाजात चांगले संकेत गेलेत आणि  कॅथलिक समाजाचा भाजपवरील विश्वास वाढलाय असा अंदाज आहे. आणि याचाच फायदा भाजपला होईल. आणि शिवाय भाजपविरोधी असलेली काही मते टीएमसी कमी करेल, या सर्व गोष्टी भाजपच्या बाजूने जातायेत. आता निवडणुकांच्या निकालावरूनच सर्व अंदाज स्पष्ट होईल. 

 

 

The post भाजपची गोव्यातली स्ट्रॅटेजी म्हणजे, इतर पक्षांच्या फुटलेल्या मतांवर जिंकून यायचं. appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

२०२१ पण संपत आलं.. खरं भारताचे अंतराळवीर अजूनही आभाळाकडेच डोळे लावून बसलेत

भारतीय अंतराळवीर स्वबळावर अवकाशात पाठविण्याची योजना भारताच्या वतीने इस्रोने २००९ मध्ये आखण्यात आली होती. यावेळी २०१५ मध्ये दोन अथवा तीन अंतरिक्षयात्री (गगननॉट्स) पाठविण्याचा संकल्प केला होता. तसेच त्यावेळी भारताच्या नियोजन समितीने पाठबळ पुरविण्याचे मान्यही केले होते. त्यामुळे हि योजना लवकरात लवकर मार्गी लागणार अशीच चिन्हे होती.

इस्रोने इंडियन ह्युमन स्पेसलिफ्ट प्रोग्रॅम हा कार्यक्रम आखला होता. त्यानुसार अंतराळवीरांच्या प्रशिक्षणाची सोय करण्यापासून ते इतर सर्व नियोजन ठरले होते. २००९ मध्येच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं होत. तसेच यावेळी रशियाकडून सहकार्य घेण्याची शक्यता बोलून दाखविण्यात आली होती.

१५ ऑगस्ट २०२१ ला भारतीय अंतराळवीर झेप घेतील असे सांगण्यात आले होते.

यानंतर चीनने सुद्धा २०१२ मध्ये आपण अंतराळवीर पाठविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भारताच्या वतीने या इस्रोच्या मोहीलेम वेग वेग देण्यात येईल असं सांगितलं गेले होते. मात्र २०२१ संपत आले असून अजूनही गगननॉट्स योजना पूर्णत्वास येऊ शकली नाही.

आता याबाबत केंद्रीय अंतरिक्ष राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मोहिमे बाबत भाष्य केले आहे.

त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, गगनयान मिशन अंतर्गत पुढच्या वर्षी जानेवारीत दोन मानवविरहित उड्डाणे होतील असे सांगितले. तसेच भारतीय अंतराळवीर २०२३ अंतराळात जातील अशी माहिती दिली.

२०२१ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष होतील. त्याचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी भारताचा पहिला अंतराळवीर घेऊन इस्रोचे यान उड्डाण करेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये केली होती. मात्र मध्येच कोरोनाने गोधंळ घातल्याने यांना संदर्भातील काही बाबी पूर्ण पूर्ण होऊ शकल्या नाहीत. तसेच त्याची ट्रायल सुद्धा वेळेत पूर्ण झाले नाही.

मुख्य म्हणजे कोरोनामुळे अंतराळवीरांना देण्यात येणारे प्रशिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे २०२१ मध्ये होणारे गगनयान मोहीम पूर्ण होऊ शकली नाही. केंद्रीय अंतरिक्ष राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह गगनयान मोहीम पूर्ण होण्यासाठी २०२३ उजाडावे लागणार आहे.

तसेच यावेळी केंद्रीय अंतरिक्ष राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारतीय अंतराळवीर ज्यावेळी अंतराळात जाईल त्याच वेळी खोल समुद्रयान मिशन अंतर्गत ५ हजार मीटर समुद्र खोलीत मानव पाठविण्याची मोहीम यशस्वी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

एकीकडे एक भारतीय अंतराळवीर उड्डाण घेईल त्याच वेळी दुसऱ्या भारतीयाने सागराचा तळ गाठावा. तसेच त्यांनी हे सुद्धा मान्य केलं की, समुद्र तळ शोध मोहीम मागे पडत आहे. मात्र आता याकडे सरकार विशेष लक्ष घालून या मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार असल्याचे सांगितले.

जर गगनयान मोहीम यशस्वी तर भारताने खूप मोठा पल्ला गाठल्याचे सिद्ध होईल.

अंतराळ मोहिमेत भारत सध्या मागे

भारत सध्या अंतराळ मोहिमेत मागे पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या २ वर्षात केवळ ४ यानाचे प्रक्षेपण झाले आहे. जर याबाबतची तुलना चीन सोबत केल्यास एक वर्षांत जवळपास ४० मोहीम फत्ते केल्या आहेत. हे करून चीनने जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे.

तसेच एका वर्गाकडून कायम अशा खर्चिक मोहिमेला विरोध करण्यात येतो. या मोहिमेवर होणारा खर्च भारतातील गरिबी निर्मूलनाकडे हा निधी वळवून त्यावर लक्ष केंद्रित करावं अशी टीकाही करण्यात येते.

हे ही  वाचं  भिडू :

The post २०२१ पण संपत आलं.. खरं भारताचे अंतराळवीर अजूनही आभाळाकडेच डोळे लावून बसलेत appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

'दीड फूट उंची असणाऱ्या पोपटाचा जन्मच शिमग्याला झालेला'; निलेश राणेंवर मेहबूब शेख यांची जहरी टीका

बीड : गेल्या काही दिवसांपासून राणे कुटुंब महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नाही. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या डान्स करतानाच्या व्हायरल झालेले व्हिडिओ वरून भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत टीका केली होती. त्यांच्या याच ट्विटला उत्तर देताना 'दीड फूट उंची असणाऱ्या पोपटाचा जन्मच शिमग्याला झालेला आहे', असा खोचक टोला राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी लगावला आहे. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि राऊत यांनी एकत्र डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून टीका करताना निलेश राणे म्हणाले होते की,' दारू वरची एक्साईज ड्युटी ५०% कमी करण्याचं कारण आत्ता समजलं. शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे सरकारचे प्रमुख नेते डान्स करत आहेत. दोन वर्षात महाराष्ट्राचं वाटोळं करणारं सरकार कसं जनतेच्या छातीवर नाचतं याचं उदाहरण हा व्हिडिओ आहे. या नेत्यांना काही पडली नाही कोणाची, अशी टीका राणे यांनी केली होती. निलेश राणे यांच्या याच ट्विटला उत्तर देतांना मेहबूब शेख यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "वैचारिक दृष्ट्या 'दीड फूट' उंची असणाऱ्या या पोपटाचा जन्मच 'शिमग्याला' झालेला आहे वाटतं, कोणाच्याही बद्दल दोन्ही हातांनी बोंबलत बसण्या पलीकडे काही कर्तृत्व नाही," अशी जहरी टीका शेख यांनी केली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

'मंत्र्याच्या ड्रायव्हरला ४०-४५ हजार पगार मिळतो, एसटी ड्रायव्हरला का मिळू नये?'

उद्धव गोडसे । करोना काळात थकलेल्या वीज बिलांची वसुली करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून सध्या विशेष वसुली मोहीम सुरू आहे. वीज बिल न भरल्यास कृषी पंपाचे कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जात आहे. याविरोधात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री () यांनी नाराजी दर्शवली आहे. महिनाभरापासून संपावर असलेल्या एसटी कामगारांच्या मागण्यांनाही त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू आज एका कार्यक्रमानिमित्त सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 'विद्युत विभाग सध्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. वीज बिलांच्या वसुलीसाठी कनेक्शन तोडणे योग्य नाही. शेतकऱ्यांना फक्त आठ तास वीज दिली जाते, तर मग वीज बिलात ५० टक्के सवलत का मिळू नये? या मागणीसाठी मी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आता कामावर पुन्हा रुजू व्हावे, असे आवाहन करत त्यांच्या मागण्यांचे समर्थनही मंत्री बच्चू कडू यांनी केले. जिल्हाधिकारी, मंत्री यांच्या गाडीवरील चालकाला ४० ते ४५ हजार रुपये पगार मिळतो, तर मग शेकडो कष्टकऱ्यांच्या प्रवासाची सोय करणाऱ्या एसटी चालकालाही चांगला पगार मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाचा: केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केल्याच्या मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच केंद्र सरकारच्या कृषी विषयक धोरणांवर टीकाही केली. केंद्र सरकारला कृषी धोरण समजत नाही, त्यामुळे देशात कृषी मालाचे दर स्थिर नसतात, असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे. केंद्राचे कृषी विषयक धोरण बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याशिवाय शिक्षणविषयक कायद्यातही बदलांची आवश्यकता मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली. सध्याचे शिक्षण कायदे संस्थाचालकांच्या बाजूचे आहेत. त्यात बदल करून ते पालकांच्या बाजूचे करावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

राजकीय आखाड्यात सगळ्यांना रडवणारे संजय राऊत स्वतःच रडले, मुलीची पाठवणी करताना झाले भावूक

मुंबई । संजय राऊत हे नाव ऐकलं की समोर येतो शिवसेनेचा आक्रमक चेहरा. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते आतापर्यंत शिवसेनेच्या सर्व राजकीय घडामोडींचे साक्षीदार ते आहेत. मोदींपासून ते सर्वच विरोधकांना सळो की पळो करून सोडतात. यामुळे ते सतत चर्चेत असतात. असे असताना आता ते रडतानाचे भावूक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील हळवा बापमाणूस यानिमित्ताने महाराष्ट्राने पाहिला. मुलीची पाठवणी करताना संजय राऊत हे भावूक झाल्याचे दिसून आले. काल त्यांची मुलगी पूर्वशी हिचा विवाह सोहळा पार पडला.

गेल्या दोन दिवसांपासून राऊत आणि नार्वेकर कुटुंबातील लग्नसोहळा चर्चेचा विषय बनला आहे. याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचा डान्स व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

असे असताना मात्र दुसऱ्याच दिवशी मुलीची पाठवणी करताना संजय राऊत भावूक झाल्याचे दिसून आले. पूर्वशीच्या मातोश्रींच्या डोळ्यातील पाणी पाहून संजय राऊत यांचाही कंट दाटला होता. मुलीच्या पाठीवर हात ठेवत संजय राऊत यांनी दिला आशीर्वाद दिले.

या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणातील आक्रमक नेता भावूक झाल्याचे महाराष्ट्राने पाहिले. या लग्नाची धावपळ गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. या लग्नात संजय राऊत कधी नाचताना दिसले तर कधी मोठ्या नेत्यांचे स्वागत करताना दिसले. मात्र ते शेवटी भावूक झालेले दिसून आले.

या लग्न सोहळ्यासाठी बडे नेते उपस्थित होते, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, सुप्रिया सुळे, यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

चंद्रकांत पाटलांनी जवळचा शिलेदार गमावला; विश्वासू नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश, पाटलांना धक्का

कोल्हापूर । राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांनी प्रवेश केला आहे. असे असताना आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या जवळचे कोल्हापूर महानगरचे माजी अध्यक्ष संदीप देसाई आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

यामुळे भाजपला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. नुकतीच त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली आहे. पुढील आठवड्यात ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे.

चंद्रकांत पाटील यांनी संदीप देसाई यांना महानगर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यांचा पक्षविस्तार करण्यात मोठा वाटा होता. असे असताना पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांची पीछेहाट झाली. राजकीय कुरघोड्यांना वैतागून त्यानी अखेर हा निर्णय घेतला आहे.

एका फसवणुकीच्या तक्रारीवरून त्यांची महानगरअध्यक्ष पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. यामुळे ते नाराज होते. यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर निष्ठा ठेवून गेले दोन वर्षे वाट बघूनही पक्षाने त्यांना बेदखल केले. यामुळे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या ते जवळचे मानले जात होते, यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांना पुन्हा राजकीय आखाड्यावर संधी दिली जाऊ शकते. आता मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात ते अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

हे झालं नसतं तर बरं झालं असतं, मला आता पश्चाताप होतोय; पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचे मोठे वक्तव्य

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पुर्ण झाले आहे. पण त्याआधी झालेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपतविधी कोणीही विसरु शकणार नाही. अशात देवेंद्र फडणवीसांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारला दोन वर्षे स्थापन झाल्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीसांनी मुंबई तकला मुलाखत दिली आहे. यावी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या त्या पहाटेच्या शपथविधीवर पश्चाताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

शिवसेनेने विश्वासघात केल्यानंतर जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही अजित पवारांसोबत मिळून सरकार स्थापन झाले होते. कारण आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला होता. पण आम्ही जशाच तसं उत्तर देण्याचा विचार केला याचा आम्हाला पश्चाताप होत आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

हे नसतं झालं तर चांगलं झालं असतं असंही सारखं वाटतं. मला माहितीये आहे, त्यावेळी काय झालं होतं आणि कोणी काय केले होते, असे देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीत म्हटले आहे. या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकाही केली आहे.

राज्य सरकारने १० हजार मृत्यु लपवले आहे. सरकारने कोरोना स्थिती योग्य प्रकारे हाताळल्याचे सांगत आपली पाठ थोपटली होती. मात्र देशातील एकूण मृत्युंपैकी ३५ टक्के एकट्या महाराष्ट्रात झाल्याचं सत्य ते स्वीकारत नाहीत?, अशी टीकाही देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकार पडण्यावरही भाष्य केले आहे. ठाकरे सरकार जितके स्थीर वाटते तितकेच ते पडण्याची शक्यता जास्त असते, मी गॅरंटी देतो की ही सरकार नक्की पडेल, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या संपूर्ण माहिती नाहीतर होईल नुकसान..
..तर संसदच बंद करून टाका; संतापलेल्या राहूल गांधींची मोदी सरकारकडे मागणी
१० नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले, आदित्य ठाकरेंच्या दाव्याने खळबळ


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या संपूर्ण माहिती नाहीतर होईल नुकसान..

मुंबई । सध्या SBI ने एक नवीन नियम लागू केला आहे. यामध्ये एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. ATM व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम असा आहे की, आता तुम्हाला ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल.

यामुळे आता OTP शिवाय पैसे काढता येणार नाहीत. हा OTP तुमच्या मोबाईलमध्ये येणार आहे. पैसे काढण्याच्या वेळी, ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर एक ओटीपी मिळेल, जो टाकूनच एटीएममधून पैसे काढता येतील. यामुळे अधिक सुरक्षा वाढणार आहे.

बँकेने म्हटले आहे की, एसबीआय एटीएममधील व्यवहारांसाठी आमची ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली हे फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध एक लसीकरण आहे. यामुळे फसवणूक थांबणार आहे. फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करणे हे नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल.

SBI ग्राहकांनी OTP आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली कशी कार्य करेल हे माहित करुन घ्या, अशी माहिती त्यांनी दिली आहे. तसेच हा नियम 10 हजार रुपये आणि त्याहून अधिक पैसे काढण्यावर लागू होणार आहे. ग्राहकांना पैसे काढण्यासाठी त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येणारा ओटीपी आणि पिन टाकून 10 हजार आणि त्याहून अधिक रक्कम काढता येईल.

हा OTP चार अंकी असेल, पैसे काढताना तो टाकावा लागेल. फसवणुकीपासून ग्राहकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. याबाबत फसवणूकीच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. यामुळे आता सुरक्षेत वाढ होईल.

SBI कडे इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या अंदाजे 91 दशलक्ष आणि 20 दशलक्ष आहे. तसेच 22 हजारांपेक्षा जास्त शाखा आहेत. यामुळे याचा या नवीन नियमाचा सुरक्षेसाठी फायदा होणार आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

..तर संसदच बंद करून टाका; संतापलेल्या राहूल गांधींची मोदी सरकारकडे मागणी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. काल संसदेत कृषीविषयक तीनही कायदे केंद्र सरकारने मागे घेतले. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा विजय झाला आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. संसदेतI चर्चा न करताच तीनही कृषि कायदे मागे घेण्याचा निर्णयावर राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी सद्या संपूर्ण मोदी सरकार संभ्रमात असल्याचे म्हटले आहे. मागील काही वर्षांपासून मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांना आणि कामगारांना दाबण्याचा प्रयन्त करत आहे. मात्र देशातील शेतकरी आणि कामगार वर्ग हा स्वाभिमानी आहे, तो आपल्या न्याय हक्कांसाठी नेहमीच लढत राहिला आहे.

मोदी सरकारने संसदेत कृषी कायदे मागे घेणे, हा देशातील सर्व शेतकऱ्यांचा विजय आहे. त्यांच्या संघटित लढ्याचे हे यश आहे. संसदेत तीन कृषी विषयक कायदे, लाखीमपूर खिरातील शेतकऱ्यांची हत्या, आंदोलनात 700 हुन अधिक शहीद झालेल्या देशातील नागरिकांवर संसदेत चर्चा व्हायला हवी होती.

जर सरकारला चर्चाच करायची नाही तर त्यांनी संसद बंद करून टाकावी. देशातील संसद चर्चा करण्यासाठी आहे. मात्र मोदी सरकार चर्चेपासून पळ काढत आहे. आजही मोदी सरकार आम्ही चुकीचं काहीही केलं नव्हते असं म्हणतंय, तर मोदी देशाची माफी का मागत आहेत. देशातील प्रश्नांवर संसदेत चर्चा होणं आवश्यक आहे,असं राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

मोदींनी हे कायदे मागे घेतले असले तरी मोदींवर टीका होत आहे. अनेक शेतकऱ्यांचे जीव या आंदोलनात गेले आहेत. अजून शेतकरी आंदोलन करत आहेत. एमएसपी आणि अन्य मागण्यांसाठी अजून शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकारने आमच्याशी बातचीत सुरू करावी अशी मागणी किसान संयुक्त मोर्चाने केली आहे.
महत्वाच्या बातम्या
मुंबईत शिक्षण, अवघ्या दहा वर्षात ट्विटरच्या सीईओ पदापर्यंत झेप; जाणून घ्या कोण आहेत पराग अग्रवाल
चक्क सलमान खानने साबरमती आश्रमात जाऊन चालवला बापूंचा चरखा; नंतर म्हणाला…
माजी कर्मचाऱ्याने भन्नाट ट्रिक वापरत फ्लिपकार्टला गंडवत कमावले लाखो रूपये; वाचून चकीत व्हाल१० नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले, आदित्य ठाकरेंच्या दाव्याने खळबळ


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

नगर शहराला हादरवून टाकणाऱ्या रेखा जरे हत्याकांडाला वर्ष झाले, पण अजूनही...

विजयसिंह होलम । यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येला () आज मंगळवारी (३० नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण होत आहे. या खटल्यात ११ जणांना अटक झाली असून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल झाले आहे. मात्र त्यावरील सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही. मुख्य आरोपी पत्रकार याच्यासह ११ आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चितीची प्रक्रिया झाल्यावर या खून खटल्याची न्यायालयात नियमित सुनावणी सुरू होईल. या प्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे व बाळ बोठे यांनी अनुक्रमे जिल्हा न्यायालय व औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी अर्ज केले आहेत. त्यावरील सुनावणीही प्रलंबित आहे. ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात जरे यांची हत्या झाली. त्यांच्या कारला अडवून दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून दोघांनी त्यांच्याशी वाद घालत असताना धारदार चाकूने त्यांचा गळा चिरून हत्या केली. सुरवातीला हे प्रकरण रस्त्यात झालेल्या वादावादीची असल्याचे समोर आले होते. मात्र, वाद सुरू असताना जरे यांच्या मुलाने एका आरोपीचा फोटो मोबाईलमध्ये काढला होता. त्याच्या आधारे पोलिसांनी तपास केला. अवघ्या दोन दिवसातच ज्ञानेश्‍वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) पाच आरोपींना अटक झाली. त्यांच्या चौकशीतून जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बोठे असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी तीन डिसेंबरला जाहीर केले. त्यानंतर मात्र बोठे फरार झाल्याने त्याचा शोध राज्यात व देशभरात घेण्यात आला. वाचा: तब्बल १०२ दिवसांनंतर १२ मार्च २०२१ रोजी बोठे याला हैदराबाद येथे अटक झाली. त्यावेळी बोठेला फरार होण्यास मदत करणार्‍या आरोपींना अटक झाली. जरे यांच्या खून प्रकरणात एकूण ११ आरोपी असून, यात प्रत्यक्ष खुनात सहा व फरार असतानाच्या काळात बोठेला मदत करणारे पाच जण आहेत. डिसेंबरच्या मध्यावर आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चितीची प्रक्रिया होऊ शकते. त्यानंतर खटल्याची नियमित सुनावणी होईल. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. यादव पाटील काम पाहत आहेत. तर फिर्यादी जरे कुटुंबातर्फंही स्वतंत्र वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाचा: जरे यांच्या हत्येनंतर बोठे विरोधात विनयभंग व खंडणीचे असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. तो फरार असतानाच्या काळात त्याचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. त्याच्या संपत्तीची चौकशी करावी व अन्य मागण्यांसाठी पोलिसांसह राज्य सरकारला निवेदनेही पाठविण्यात आली होती. याशिवाय दोन्हा बाजूंनी विविध तक्रारी होत राहिल्याने प्रकरण गाजत राहिले. मुख्य आरोपी बोठे याचा जामीनासाठीचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने त्याने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. तेथे येत्या २ डिसेंबरला त्यावर सुनावणी होणार आहे. आणखी एक आरोपी भिंगारदिवे याच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयात सुनावणी बाकी आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Weather Alert : राज्यावर पुन्हा आस्मानी संकट; थंडी गायब, 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा

नागपूर : राज्याच्या समुद्र किनाऱ्याजवळील पूर्वमध्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील वातावरणात बदल घडणार आहेत. यामुळे राज्यातील थंडी परत एकदा गायब होणार असून ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भ व उपराजधानीतसुद्धा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लक्षद्वीप आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्रात सध्या वादळी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम दक्षिणेतील राज्ये, महाराष्ट्र आणि मध्य भारतावरसुद्धा होणार आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवसांत राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरामध्ये हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. यामुळे कोकण व मुंबईसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येसुद्धा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात मंगळवारपासून आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच गुरुवार, २ व शुक्रवार, ३ डिसेंबरला काही ठिकाणी तुरळक पावसाचीही शक्यता आहे. यामुळे तापमानात ३ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, पुढे ५ डिसेंबरपासून परत एकदा पाऱ्यात घसरण होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे. भारतीय हवामान विभागाकडून इशारा राज्यात आज, मंगळवारपासून दक्षिण व उत्तर कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे, तर बुधवारी मराठवाड्यातही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. कोकणात व उत्तर महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद येथे बुधवारी एक डिसेंबरला आणि औरंगाबाद, जालना, बीड येथे तुरळक ठिकाणी दोन डिसेंबरला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजा; तसेच जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

उद्धव ठाकरेंनीच शिवसेना संपवायचं ठरवलेलं दिसतंय; माजी मंत्र्याची जहरी टीका

उद्धव गोडसे । सांगली 'आपली खुर्ची मजबूत आहे का? हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सारखं तपासून पहावं लागत आहे. मुख्यमंत्र्यांनीच शिवसेना पक्ष संपवायचं ठरवल्याचं दिसून येत आहे, अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या सत्कारप्रसंगी पेठनाका येथे ते बोलत होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप राज्यात एक क्रमांकाचा पक्ष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक भाजप कमळ चिन्हावरच लढवेल. स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. भाजपचे चिन्ह घराघरात पोहोचविण्यासाठी ताकदीने कामाला लागा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाचा: कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या घरी जाण्याची पद्धत मी मोडून काढत आहे. जिल्हा बँकेत विजय झालेल्या पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यासाठी मी स्वतः आलो आहे. सांगलीत भाजप दमदार असल्याने पॅनेलचा आग्रह धरला. काहींनी पॅनेल न होण्याचा प्रयत्न केला. भाजप संघटितपणे महाविकास आघाडीच्या विरोधात उभी राहिली. राजकारणात काहीवेळा हवे ते घडत नाही. तरीही अल्पावधीत मिळालेले यश वाखाणण्याजोगे असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. वाचा: यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शिवाजीराव नाईक, सी. बी. पाटील, सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पंडित दीनदयाळ उपाध्याय, वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेले संग्राम देशमुख, राहुल महाडिक आणि सत्यजित देशमुख यांचा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

नगर शहराला हादरवून टाकणाऱ्या रेखा जरे हत्याकांडाला वर्ष पूर्ण झाले, पण अजूनही...

विजयसिंह होलम । यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येला () आज मंगळवारी (३० नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण होत आहे. या खटल्यात ११ जणांना अटक झाली असून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल झाले आहे. मात्र त्यावरील सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही. मुख्य आरोपी पत्रकार याच्यासह ११ आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चितीची प्रक्रिया झाल्यावर या खून खटल्याची न्यायालयात नियमित सुनावणी सुरू होईल. या प्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे व बाळ बोठे यांनी अनुक्रमे जिल्हा न्यायालय व औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी अर्ज केले आहेत. त्यावरील सुनावणीही प्रलंबित आहे. ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात जरे यांची हत्या झाली. त्यांच्या कारला अडवून दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून दोघांनी त्यांच्याशी वाद घालत असताना धारदार चाकूने त्यांचा गळा चिरून हत्या केली. सुरवातीला हे प्रकरण रस्त्यात झालेल्या वादावादीची असल्याचे समोर आले होते. मात्र, वाद सुरू असताना जरे यांच्या मुलाने एका आरोपीचा फोटो मोबाईलमध्ये काढला होता. त्याच्या आधारे पोलिसांनी तपास केला. अवघ्या दोन दिवसातच ज्ञानेश्‍वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) पाच आरोपींना अटक झाली. त्यांच्या चौकशीतून जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बोठे असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी तीन डिसेंबरला जाहीर केले. त्यानंतर मात्र बोठे फरार झाल्याने त्याचा शोध राज्यात व देशभरात घेण्यात आला. वाचा: तब्बल १०२ दिवसांनंतर १२ मार्च २०२१ रोजी बोठे याला हैदराबाद येथे अटक झाली. त्यावेळी बोठेला फरार होण्यास मदत करणार्‍या आरोपींना अटक झाली. जरे यांच्या खून प्रकरणात एकूण ११ आरोपी असून, यात प्रत्यक्ष खुनात सहा व फरार असतानाच्या काळात बोठेला मदत करणारे पाच जण आहेत. डिसेंबरच्या मध्यावर आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चितीची प्रक्रिया होऊ शकते. त्यानंतर खटल्याची नियमित सुनावणी होईल. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. यादव पाटील काम पाहत आहेत. तर फिर्यादी जरे कुटुंबातर्फंही स्वतंत्र वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाचा: जरे यांच्या हत्येनंतर बोठे विरोधात विनयभंग व खंडणीचे असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. तो फरार असतानाच्या काळात त्याचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. त्याच्या संपत्तीची चौकशी करावी व अन्य मागण्यांसाठी पोलिसांसह राज्य सरकारला निवेदनेही पाठविण्यात आली होती. याशिवाय दोन्हा बाजूंनी विविध तक्रारी होत राहिल्याने प्रकरण गाजत राहिले. मुख्य आरोपी बोठे याचा जामीनासाठीचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने त्याने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. तेथे येत्या २ डिसेंबरला त्यावर सुनावणी होणार आहे. आणखी एक आरोपी भिंगारदिवे याच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयात सुनावणी बाकी आहे.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये चुरस वाढली, ठाकरे विरुद्ध गडकरी अशा चर्चेला उधाण

अकोला : अकोला, बुलडाणा, वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका नगरसेवक पराग कांबळे व रमेश बजाज यांची याचिका सोमवारी नागपूर हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. अकोला, बुलढाणा, वाशीम विधानपरिषदेच्या निवडणूक रिंगणात भाजपातर्फे वसंत मदनलाल खंडेलवाल यांनी २२ नोव्हेंबरला नामांकन अर्ज सादर केला. सदर नामनिर्देशन अर्जाची छाननी करण्यात आली आणि छाननी दरम्यान या मतदारसंघातील मतदारांपैकी एक असलेले नगरसेवक पराग मधुकर कांबळे यांनी भाजपा उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्जाच्या मान्यतेवर आक्षेप नोंदवला व त्याचप्रमाणे रमेश सत्यनारायण बजाज यांनी देखील आक्षेप नोंदविला होता. रमेश बजाज हे महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांचे निवडणूक प्रतिनिधी आहेत, तर हे दोन्ही आक्षेप रिटर्निंग ऑफिसरने फेटाळले. रिटर्निंग अधिकाऱ्याने दिलेल्या आक्षेपांना नकार देण्यास अनुक्रमे पराग मधुकर कांबळे आणि रमेश सत्यनारायण बजाज यांनी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात दोन स्वतंत्र रिट याचिकांद्वारे उमेदवारी अर्जाला आव्हान दिले होते. मात्र, सोमवारी उच्च न्यायालयाने दोन्ही रीट याचिका फेटाळून लावल्या असल्याने आता या निवडणुकीत अजूनच चुरस वाढली आहे. कारण, यावेळी ही निवडणूक दोन्ही उमेदवारांच्या प्रतिष्ठेची आहे. गेल्या १८ वर्षापासून महाविकास आघाडीचे उमेदवार गोपिकीशन बाजोरिया हे आमदार असून यावेळी भाजप आणि शिवसेनेची युवती नसल्याने दोन चागले मित्र आणि शेजारी हे एकमेकांच्या विरोधात उभे असून वसंत खंडेलवाल हे एक सराफाचे व्यापारी सुरवातीपासून भाजपसी जुडले आहेत. नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक मानले जात असल्याने ही निवडणूक ठाकरे विरुद्ध गडकरी अशीच चर्चा सर्व दूर आहे. तर दोन्ही उमेदवार एकमेकांवर ताशेरे ओढायला कुठलीच कसर सोडत नाहीत. सध्या निवडणूक आता चुरशीची होणार असून यामध्ये कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

तुुम्ही आमचा पंचवीस वर्षांचा संसार मोडला, पण...; गिरीश महाजनांचा जयंत पाटलांना टोला

म. टा. प्रतिनिधी । 'राज्यात शिवसेना-भाजप युतीचा गेल्या २५ वर्षापासून चांगला संसार सुरू होता. मात्र, जयंतराव आपण २५ वर्षाचा संसार मोडून टाकला', असा मिश्किल टोला माजी मंत्री () यांनी जलसंपदामंत्री यांना लगावताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा धाकटा मुलगा विक्रम याच्या लग्न सोहळ्याचे आयोजन सोमवारी पाळधी येथील साईबाबा मंदिराच्या आवारात करण्यात आले होते. या सोहळ्याला राज्यातील आजी, माजी मंत्री व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वधूवरांना आशीर्वाद देतांना गिरीश महाजन यांनी राजकीय फटकेबाजी केली. 'गुलाबराव पाटील यांच्याशी आमचे पूर्वीपासून कौटुंबिक संबंध आहेत. अनेक वर्षे आम्ही एकत्र काम केलं. पण हा २५ वर्षांचा संसार तुम्ही (जयंत पाटील यांच्याकडं पाहून) मोडून टाकला. संसार मोडला असला तरी अजूनही आमचे स्नेहसंबंध कायम आहेत,' अशी कोपरखळी महाजन यांनी यावेळी मारली. त्यावेळी उपस्थितांना हसू आवरता आलं नाही. ही तर महाजनांची खदखद गिरीश महाजन यांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देखील जोरदार उत्तर दिले आहे. राज्यातील भाजपचे सरकार गेल्यामुळे गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांची खदखद अद्यापही संपलेली दिसून येत नाही. त्यामुळे लग्नसोहळे असो वा इतर कार्यक्रम त्या त्या ठिकाणी ही खदखद बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून होत असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. तसेच गिरीश महाजन यांच्या कोणत्याही वक्तव्याला गांभीर्याने घेत नसून, त्यांच्या वक्तव्याला जास्त प्राधान्य देण्याची गरज नसल्याचे सांगितले. वाचा: या विवाहसोहळ्यासाठी राज्य मंत्रीमंडळातील डझनभर मंत्र्यांनी उपस्थित राहून वधु-वराला आशिर्वाद दिले. यामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील,परिवहन मंत्री अनिल परब, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार या मंत्र्यांचा समावेश होता. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

दोन दिवसांत सोयाबीनचे भाव ६०० रूपयांनी उतरले, शेतकऱ्यांची घालमेल

हिंगोली : या आठवड्यात सोयाबीन व कापसाच्या दरातील चढ उताराणे शेतकऱ्यांची चागलीच घालमेल होत आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने उत्पादन घटले तर नगदी पीक समजले जाणारे कापूस आणि सोयाबीनच्या दराची घसरण पहाता शेतकरी चिंताग्रस्त होते. परंतु, मागील आठवड्यात दरांमध्ये चांगलीच वाढ होत, हिंगोली शुक्रवार दि.२६ रोजी उच्च दर्जाची सोयाबिन ७ हजार १०० प्रतिक्विंटल असा दर मिळाला. परंतु रविवारी सोमवार दि.२९ रोजी याच सोयाबीनला ६४०० ते ६२०० रुपये दर मिळाला, प्रति क्विंटल मागे दोन दिवसात ८०० ते ६०० रुपयांनी दर घसरले. शेतीमालाच्या दरात सतत चढ उतार पाहून शेतकऱ्यांच्या मनाची घालमेल सुरू आहे. गेल्या हंगामात सोयाबीन प्रतिक्विंटल ११ हजार रुपयेच्या पुढे गेल्याने यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पहिली पसंती दिली. त्यामुळे कापसाला मागे सारून सोयाबीन नंबर एकचे पीक ठरले. सुरवातीला पाऊस वेळेवर पडल्याने सोयाबीन जोमात आले परंतु फुले लागत असताना पावसाने ओढ दिली, तसेच शेंगा लागल्यानंतर अतिवृष्टी झाली. याचा मोठा फटका बसून उत्पादन घटले. दर चांगला असल्याने हे नुकसान भरून निघेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु, शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरुवात करताच केंद्र शासनाने तेल आयातीवरील कर घटवले, सोया पेंड आयात केली. याचा परिणाम म्हणून सोयाबीनचे दर कोसळायला सुरुवात झाली. ११ हजारांवर असलेले दर ४ हजार ८०० ते ५ हजारांवर आले. अतिवृष्टीमुळे आणि कोसळणारे दर पहाता शेतकरी चिंतेत होता. दर वाढतील या आशेवर ७० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीनचे खळे करुन माल घरातच साठवून ठेवले आहे. हा अंदाज खरा ठरत असून मागील सात-आठ दिवसांपासून सोयाबीन दरात वाढ होत असून शुक्रवारी दि.२६ हिंगोली, सेनगाव मध्ये प्रतिक्विंटल ७ हजार १०० असा दर मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचां पेरा आहे. पांढर सोनं म्हणून ओळखले जाणारे कापसाचे यंदा उत्पादन घटले आहे. उत्पादनाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने सुरवातीपासूनच यावर्षी कापसाला साडेसात हजार प्रतिक्विंटल दर मिळाला. वाढत तो ८८०० वर पोचला होता. दिवाळीनतर कापसाचे दर घसरत ८१०० पर्यंत खाली आले. मागील आठवड्यापासून कापसाचे दरात चढ उतार होत आहे. वाढते दर पाहून शेतकरी समाधान व्यक्त करीत होते. परंतु दोन दिवसात सोयाबीन, कापसाचे दर घसरण्यास सुरू झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची चागलीच घालमेल होत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मुंबईत शिक्षण, अवघ्या दहा वर्षात ट्विटरच्या सीईओ पदापर्यंत झेप; जाणून घ्या कोण आहेत पराग अग्रवाल

मुंबई । मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आता पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे सध्या ते चर्चेत आले आहेत. पराग अग्रवाल आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत.

2011 मध्ये पराग यांनी ट्वीटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. फक्त 10 वर्षांत पराग यांची कंपनीच्या सीईओपदी निवड झाली आहे. पराग अग्रवाल यांच्या कामावर जॅक डोर्सी समाधानी होते. यामुळे त्यांना सध्या ही संधी मिळाली आहे.

जॅक डोर्सी यांनी अग्रवाल यांचे नाव सीईओ पदासाठी पुढे केल्याची माहिती समोर आली आहे. 2017 मध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सीटीओ या पदावर त्यांची निवड झाली होती. त्यांनी याठिकाणी चांगले काम केले असून त्याचा मोठा फायदा झाला होता.

आता पराग अग्रवाल लवकरच पदभार स्वीकरणार आहेत. जगभरातील मोठ्या तंत्रज्ञानाविषयक कंपन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतीय आहेत. यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, ‘आयबीएम’चे अरविंद कृष्ण, अ‍ॅडोबचे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचेही नाव आता यामध्ये आले आहे.

भारतीयांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. पराग अग्रवाल यांची एकूण संपत्ती 1.52 मिलिअन डॉलर इतकी आहे. याबाबत पराग अग्रवाल यांनी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये अग्रवाल यांनी जॅक आणि संपूर्ण टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

संपूर्ण जग आपल्याकडे पूर्वीपेक्षाही अधिक अपेक्षेने पाहत आहे. आपण ती अपेक्षापूर्ती करूया. भारतात जन्मलेल्या पराग अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बेमधून पदवी घेतली आहे. त्यांनी याहू, माइक्रोसॉफ्ट आणि AT&T यासारख्या दिग्गज कंपनीमध्ये काम केले आहे. सध्या जगभरात त्यांची चर्चा सुरू आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अश्लील व्हिडिओ काढून भय्यु महाराजांची होत होती ब्लॅकमेलिंग; चॅट्समधून झाले धक्कादायक खुलासे

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी भोपाळ फॉरेन्सिक ऑफिसर तिलक राज यांनी १०९ पानांची मोबाईल चॅटिंग कोर्टात सादर केली आहे. यामध्ये भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणारी पलक आणि कोणीतरी पियुष जीजू यांच्यात व्हॉट्सऍप चॅटिंगद्वारे संभाषण झाले आहे.

या व्हॉट्सऍप चॅटमुळे भैय्यू महाराज प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. काही चॅट कोड्स वर्डमध्ये देखील आहेत, जसे लिहिले आहे – BM ला वेडा बनवावे लागेल आणि घरी बसवावे लागेल. तांत्रिकासोबत २५ लाखांचा सौदा झाला आहे. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पलकला पोलिसांनी अटक केली होती.

हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेश सोने यांच्या न्यायालयात सुरू आहे. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त करून चॅटिंग डेटा जप्त केला. शुक्रवारी आरोपी पलकचे वकील धर्मेंद्र गुर्जर आशिष चौरे यांनी या घटनेची फिर्यादी पक्षाकडून उलटतपासणी घेतली. तसेच या चॅटिंगची माहितीही मिळाली. आरोपींच्या जप्त केलेल्या मोबाईलवरून मिळालेल्या चॅटिंगमध्ये अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत.

पलकच्या मोबाईल चॅटिंगमधील काही उतारे

पलक : भाऊ, आयुषीने एका तांत्रिकाला पकडले आहे. २५ लाखात सौदा झाला आहे.
पियुष जिजू : कोणाकडून?
पलक : तांत्रिकाकडून…
पलक : बीएमला वेडा करून घरी बसवले आहे.
पियुष जिजू : कुहू घरी येणार आहे. उद्या कुहूची खोली ठीक होईल.
पलक : कुहूने शरदला सांगितले की ती समोर आली तर मी तिला मारून टाकेन.
पलक : यावेळी कुहू पूर्णपणे तयार होऊन गेली आहे का?
पियुष जिजू : कुठे? इंदोर
पलक : आयुषीने येऊन पुन्हा काम बिघडवले.
पलक: आयुषीने वहिनी आणि कुहू आणि बापूचे फोटो जाळले.

आयुषी ही भय्यू महाराजांची दुसरी पत्नी आहे. कुहू ही त्यांची मुलगी. धर्मेंद्र गुर्जर यांच्या म्हणण्यानुसार, या खटल्यात आतापर्यंत ३१ साक्षीदार सादर करण्यात आले आहेत. या तिन्ही आरोपींना ३ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी महाराजांचे दोन सेवक विनायक आणि शरद यांनाही आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली होती. शरद हा चालक होता, तर विनायक हा जुना कर्मचारी होता. भय्यू महाराजांचा सर्व हिशोब विनायक पाहत असे.

पलकने भय्यू महाराजांचे अश्लील व्हिडिओ बनवले होते आणि त्याद्वारे ती त्यांना ब्लॅकमेल करत होती. १७ एप्रिल २०१७ रोजी भय्यू महाराज यांनी आयुषीसोबत लग्न केले. पलकने वर्षभरात लग्न करण्यासाठी दबाव टाकला. पलक दोन वर्षांपासून त्याच्या संपर्कात होती. तिला महाराजांशी लग्न करायचे होते, पण महाराजांनी डॉ आयुषीशी लग्न केले. पलकने लग्नाच्या दिवशीही गोंधळ घातला होता आणि त्यांना १६ जूनपर्यंत लग्नासाठी वेळ दिला होता.

महत्वाच्या बातम्या-
चक्क सलमान खानने साबरमती आश्रमात जाऊन चालवला बापूंचा चरखा; नंतर म्हणाला…
माजी कर्मचाऱ्याने भन्नाट ट्रिक वापरत फ्लिपकार्टला गंडवत कमावले लाखो रूपये; वाचून चकीत व्हाल
महिला खासदारांसोबत सेल्फी घेणे शशी थरूर यांच्या अंगलट, मागावी लागली माफी


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

चक्क सलमान खानने साबरमती आश्रमात जाऊन चालवला बापूंचा चरखा; नंतर म्हणाला…

‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांनी गुजरात दौरा केला आहे. अहमदाबादला आलेल्या सलमानची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सलमानने महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी सलमानने चक्क बापूंचा चरखाही चालवला.

सलमान केवळ 10 ते 15 मिनिटे साबरमती नदीच्या काठावरील ‘साबरमती’ आश्रमात थांबला होता. या ऐतिहासिक ठिकाणी वसलेले महात्मा गांधीजींचे निवासस्थान असलेले ‘हृदय कुंज’लाही त्याने यावेळी भेट दिली. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आश्रमाला भेट देऊन निघताना सलमानने व्हिजिटर बुकमध्ये आपला अभिप्राय लिहिला. ‘मला इथे यायला खूप आवडले आणि हा आनंद मी कधीच विसरणार नाही. मला पहिल्यांदाच अशा ठिकाणी फिरायला मिळाले आहे. मला या आश्रमात पुन्हा यायला आवडेल, असे त्याने म्हटले आहे.

त्याने हिरव्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. ती याठिकाणी येणार ही बातमी समजताच त्याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. याठिकाणी व्हरांड्यात बसून त्याने चरख्यावर हात फिरवण्याचा प्रयत्न केला.

याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुखांनी सूत कातले आहे. आश्रमाने त्यांच्या परंपरेनुसार सलमानचे स्वागत करताना कापसाचा हार घालण्यात आला. यामुळे सलमान खान भारावून गेला.

सलमानने देखील त्यांच्या खास शैलीत तो हार हाताला गुंडाळला. तसेच त्याने चाहत्यांना देखील बघत हात उंचावला. यामुळे त्याचे चाहते देखील खुश झाले. आता सगळ्यांना या त्याच्या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

माजी कर्मचाऱ्याने भन्नाट ट्रिक वापरत फ्लिपकार्टला गंडवत कमावले लाखो रूपये; वाचून चकीत व्हाल

मध्यप्रदेशमधील जबलपूर शहरात फ्लिपकार्टला माजी कर्मचाऱ्याने लाखो रुपायांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीसांनी शुभम मिश्रा आणि त्याचा साथीदार अंकित रैकवारला वर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार शुभम मिश्रा हा पुर्वी फ्लिपकार्ट मध्ये कामाला होता,

आणि अंकित रैकवार हा फ्लिपकार्ट कंपनीत डिलिव्हरी एंजट म्हणुन काम करत होता. शुभम आणि अंकित ची पुर्वीपासुन मैत्री होती. शुभम यांने फ्लिपकार्ट कंपनीला गंडवून लाखो रुपये कमवण्याचा प्लन आखला, या प्लन नुसार तो पुढे काम करीत राहीला.शुभमने फ्लिपकार्ट कंपनी कडून एअरपॉड्स मागवायला सुरुवात केली.

तो नेहमी वेगवेगळ्या व्यक्तींच्या आणि वेगवेगळ्या पत्त्यावर एअरपॉड्सची मागणी करत असे. एअसपॉड्सची डिलीव्हरी करण्याचे काम अंकित करत असे, अंकित पार्सल घेवून शुमम जवळ येत असे. त्यानंतर शुभम कंपनीचे एअसपॉड्स काढून स्वःताजवळ ठेवायचा, आणि तसेच दिसणारे खोटे एअरपॉड्स अंकित जवळ द्यायचा.

अंकित हे पार्सल कस्टमरने घेतले नाही असे दाखवण्यासाठी पार्सलची नोंद अनडिलिव्हर्ड पार्सल अशी करत असे, आणि ते पार्सल पुन्हा फ्लिपकार्टला पाठवत असे. त्यानंतर शुभम कंपनीचे ओरिजनल एअरपॉड्स कैलाश आसवानी यांच्या दुकानात विकत होता. या प्रकरणात पोलिसांनी कैलास आसवानी यांनाही अटक केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी तिन्हीही आरोपींना अटक केली आहे. या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाईंड शुभम असल्यांचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या तिन्ही कडून जवळपास ५ लाख किंमतीचे १९ एअरपॉड्स जप्त केल्याची माहीती समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या 
१० नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले, आदित्य ठाकरेंच्या दाव्याने खळबळ
महिला खासदारांसोबत सेल्फी घेणे शशी थरूर यांच्या अंगलट, मागावी लागली माफी
VIDEO: नोरा फतेहीच्या टॉप अशा जागी फाटला की नेटकरी भडकले; म्हणाले, इथेच बरा फाटतो..
होय,मी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात गेलो नाही; पण का? फडणवीस काय म्हणाले बघा


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

'संपाने गिऱ्हाइकं संपवली', एसटी संपामुळे बसस्थानकातील दुकानदारांचे गणित बिघडले

म. टा. प्रतिनिधी, नागपूरनागपूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला आर्थिक तोटा होत असतानाच बसस्थानक परिसरातील दुकानदार, कॅन्टीनचालकांचे गणितदेखील बिघडले आहे. संपाने अक्षरश: गिऱ्हाइकी संपविल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. एसटी स्थानकावरील कॅन्टीनचा व्यवसाय मुख्यत: तेथील कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतो. ते संपावर गेल्याने त्याचा मोठा परिणाम कॅन्टीनच्या व्यवसायावर झाला आहे. रिकाम्या खुर्च्या आणि ग्राहकांसाठी वाट पाहणारे कर्मचारी, असे तेथील सध्याचे चित्र आहे. कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याने सांगितले की, 'पूर्वी दररोज १००-१२० प्लेट नाश्ता विकला जायचा. परंतु, संपामुळे दिवसाकाठी दहा प्लेटदेखील विक्री होत नाही. आधी १०-१२ लिटर चहा तयार करावा लागत होता. आता अर्धा लिटरही विकल्या जाण्याची शाश्वती नाही. विक्री वाढावी म्हणून आम्ही खाद्यपदार्थांच्या किमतीही कमी केल्या. परंतु, त्याचा काहीही फायदा झाला नाही. विक्री नसल्याने डोसा, राइस थाली बंद केली आहे. समोसा, सांबर वडादेखील रोज फेकावा लागत आहे. संप संपल्याशिवाय ही परिस्थिती सुधारण्याची शक्यता नाही. बसस्थानकावरील अन्य दुकानांचीदेखील हीच अवस्था आहे.' बेसन-भात, कच्चा चिवडा गणेशपेठ बसस्थानकावर दिवसभर उपाशीपोटी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी स्थानिक कर्मचारी सरसावले आहेत. बेसन-भात, कच्चा चिवडा, चहा-बिस्किट यावर कर्मचाऱ्यांना दिवस काढावा लागत आहे. गणेशपेठ बसस्थानकावर शुकशुकाट बघायला मिळत असला तरी दुसरीकडे संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेदनांचा आवाज घुमतोय. स्थानिक कर्मचारी सकाळी सातपासून धरणास्थळी येतात तर बाहेर गावातील कर्मचारी रात्रभर तिथेच ठाण मांडून बसतात. दहा-वीस रुपये वर्गणी गोळा करून जेवणाची सोय केली जात आहे. आंदोलनस्थळी तयार होणारे जेवण तेथील पोलिस कर्मचारी, ऑटोचालक आणि स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांनादेखील पुरवले जाते. 'पोटासाठी करतोय आंदोलन' 'दिवसभर आम्ही आंदोलनस्थळी असतो. एकही कर्मचारी उपाशी राहू नये म्हणून थोडीफार वर्गणी गोळा करून जमेल ते अन्न शिजविण्यात येत आहे', अशी भावना एका कर्मचाऱ्याने व्यक्त केली. आंदोलनातील एक महिला कर्मचारी म्हणाल्या की, 'फार वाईट स्थितीत आम्ही दिवस काढतोय. इथे थोडेफार अन्न तयार करून ते मी घरच्यांसाठी नेते. पोटासाठी हे आंदोलन करावे लागत आहे.'


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Vishal Ahire Death: महाराष्ट्रातील तरुणाचा ओडिशात अपघाती मृत्यू; सद्भावना यात्रा यशस्वी झाली, पण...

अहमदनगरमधील संस्थेच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या नगर ते बांगलादेश सद्भावना सायकल यात्रेहून परतताना यांचा अपघाती मृत्यू झाला. आहिरे प्रवास करीत असलेल्या रुग्णवाहिकेला राज्यात अपघात झाला. त्यात टीम लीडर आहिरे यांचा मृत्यू झाला तर त्यांचे तीन सहकारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कोलकाता येथे उपचार सुरू आहेत. आहिरे यांचे पार्थिव नगरला नेण्यात येणार आहे. ( ) वाचा: महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर रोजी अहमदनगरच्या भुईकोट किल्ला येथून ही सायकल यात्रा सुरू झाली होती. या सायकल यात्रेचे नियोजन आणि नेतृत्व विशाल अहिरे यांच्याकडे होते. शंभर सायकलस्वार या यात्रेत सहभागी झाले होते. वाटेत प्रत्येक ठिकाणचे निवास, भोजन, औषधोपचार व्यवस्था तसेच प्रत्येक राज्यातील सामाजिक संस्था यांच्याशी समन्वय साधत त्यांनी भारतातील पाच राज्ये आणि बांगलादेश मधील नवलाखीपर्यंत यशस्वीपणे पार पाडली. ठरल्याप्रमाणे यात्रेचा बांगलादेशात समारोप झाला. यात्रा संपल्यानंतर भारतात पुन्हा येताना विविध मार्गांनी सायकलपटूंना रवाना करण्यात आले. वाचा: विशाल अहिरे, अजय वाबळे, संतोष धर्माधिकारी आणि योगेश जाधव हे सोबत नेलेल्या स्नेहालय संस्थेच्या रुग्णवाहिकेतून प्रवास करीत होते. ओडिशा राज्यातील भुवनेश्वर जवळ शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात विशाल यांचा मृत्यू झाला. जखमी असलेले अजय वाबळे, संतोष धर्माधिकारी आणि योगेश जाधव यांच्यावर कोलकाता येथे उपचार सुरू आहेत. विशाल अहिरे यांचे पार्थीव अहमदनगरकडे आणण्यात येत आहे. सोबत स्नेहालयचे डॉ. , श्याम असावा आणि भाऊ मनोज अहिरे आहेत, अशी माहिती स्नेहालयचे हनिफ तांबोळी यांनी दिली आहे. अहिरे स्नेहालयच्या युवा निर्माणचे समन्वयक होते. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीच ते परिस्थितीने स्नेहालयात दाखल झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर आहिरे यांनी पूर्णवेळ स्नेहालयला देत काम सुरू केले. ते मूळचे श्रीरामपूरचे होते. त्यांच्या मागे वृद्ध वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अण्णा हजारेंच्या आंदोलनात लवकरच नवी टीम, ‘यांची’ लागणार वर्णी

विजयसिंह होलम । बराच काळ प्रत्यक्ष आंदोलनांपासून दूर राहिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक () यांच्या या संघटनेची फेरबांधणी करण्यात येत आहे. काही जुन्या कार्यकर्त्यांना नारळ देऊन नव्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्यभर तालुका ते जिल्हास्तरापर्यंत कार्यकर्त्यांच्या निवडीसाठी बैठका बोलाविण्यात आल्या आहेत. नगर जिल्ह्याची बैठक मंगळवारी, ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे. संघटनेच्या निकषात बसणाऱ्या आणि बैठकीला उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यांचीच यासाठी निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. करोना आणि इतर कारणांमुळे हजारे यांची विविध मुद्द्यांवरील प्रत्यक्ष आंदोलने थांबली आहेत. त्यामुळे मधल्या काळात त्यांच्या संघटनेतही मरगळ आली होती. काही कार्यकर्ते दुरावले होते. शाखा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या होत्या. नवीन नियुक्त्या रखडल्या होत्या. काही दिवसांपूर्वी हजारे यांनी पुन्हा एकदा तालुका ते देशपातळीपर्यंत संघटना मजबूत करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता काम सुरू झाले आहे. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास या संघटनेची फेरबांधणी करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्याची बैठक ३० नोव्हेंबरला होणार असल्याची माहिती जिल्हा संघटक सुधीर भद्रे यांनी दिली. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अशोक सब्बन यांच्या उपस्थितीत मार्केट यार्डमधील किसान क्रांती बिल्डिंगमधील सभागृहात ही बैठक होणार आहे. यामध्ये संघटनेची पुर्नरबांधणी करून जिल्हा, तालुका व शहर कार्यकारणीची निवड करण्यात येणार आहे. ती नावे मान्यतेसाठी केंद्रीय कार्ययालयाकडे पाठवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी तसेच नव्याने सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व प्रामाणिक, चारित्रसंपन्न, त्यागी, निस्पृह, सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या व समाज कार्यासाठी वेळ देऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनीच या बैठकीला उपस्थित राहावे. जिल्हा, शहर व तालुक्यातील कार्यकारणीवर काम करण्यास इच्छुक असणार्‍या सर्वांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे, असे अशोक सब्बन यांनी सांगितले. हेही वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून 'तलाठ्या'ची आत्महत्या, नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत चुकीचे काम करण्यासाठी येणारा दबाव आणि जाचाला कंटाळून अप्पर तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागात कार्यरत एका तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण नामदेव बोराटे (वय ३८, रा. कोळेकर गल्ली, सातारा परिसर) असे या तलाठ्याचे नाव आहे. तर आत्महत्येचा घटनेनंतर गुन्हा नोंदवण्यासाठी नातेवाईक पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, बोराटे हे आवक- जावक विभागात कार्यरत होते. मात्र तेथे काम करतांना त्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांकडून मानसिक छळ करण्यात येत होता, असे आरोप नातेवाइकांनी केला आहे. गेली अनेक दिवस बोराटे वरिष्ठांचा छळ सहन करत होते, मात्र गेली काही दिवसात हे प्रमाण अधिकच वाढल्याने कंटाळून त्यांनी गळफास घेतला, असा दावाही नातेवाईकांनी केला. बोराटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, ज्यात ११ ते १२ अधिकाऱ्यांचे नाव आहेत. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली असून नाव सांगण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बचाव करत असल्याचा आरोप बोराटे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. राजीनामाही दिला होता... लक्ष्मण बोराटे यांच्यावर चुकीच्या कामासाठी वरिष्ठ अधिकारी नेहमीच दबाव आणत होते. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात असतांना खूप त्रास देण्यात आला. त्यामुळे त्यांनी वैतागून राजीनामा दिला होता. पण राजीनामा फेटाळून त्यांची आवक-जावक विभागात बदली करण्यात आली.पण येथेही त्रास कमी झाला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असे बोराटे यांच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

राज्यात पुन्हा निर्बंध लागणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा नव्या संसर्गाने डोकं वर काढल्याने चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये समोर आलेल्या ओमिक्रॉन संसर्गामुळे आता पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही सतर्क राहण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमिवर आता राज्यात मंत्रिमंडळाची तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे, यामध्ये राज्यात निर्बंध लागू करणार का? यावर चर्चा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये नव्या संसर्गाचा शिरकाव होऊ नये, या दहशतीमुळे शाळा सुरू करण्याचा निर्णयही पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. या सगळ्यावर आज मंत्रिमंडळाची तातडीने बैठक होणार आहे. एक डिसेंबरपासून होणाऱ्या बदलांबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता या बैठकीमध्ये होऊ शकते. खरंतर, एक डिसेंबरपासून शाळा सुरू होणार होती, पण याचा धोका वाढल्यामुळे हा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे किंवा या निर्णयावर फेरविचार केला जाऊ शकतो. इतकंच नाहीतर राज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार का या सगळ्यावरही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलावली असून यामध्ये चर्चा करणार आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

शेतकऱ्यांची विजतोडणी सुरू, सत्ताधारी डान्स करण्यात मग्न, तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या

बीड । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. याचे कारण म्हणजे शेतीची विजतोडणी सध्या केली जात आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील एक तरुण शेतकऱ्यांने धक्कादायक पाऊल उचलले. या 23 वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

कृष्णा राजाभाऊ गायके असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या गावाचा वीज पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून खंडीत करण्यात आला आहे. यामुळे शेतीचे हाताला आलेली पिके जळून जात होती. यामुळे त्याने टोकाचा निर्णय घेतला.

यामुळे त्यांच्या कुटूंबाला एकच धक्का बसला आहे. त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कृष्णा गायके याने आत्महत्या केली नसून महावितरणने केलेला खून आहे, असा आरोप कृष्णाच्या नातेवाईकांना महावितरणावर केला आहे. यामुळे नातेवाईक संतप्त झाले आहेत.

गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील कृष्णा गायके याने शेतात कांद्याचे बी लागवडीसाठी आणले होते. मात्र लाईट नसल्याने तो चिंतेत होता. शेतातील विहिरीत पाणी असताना देखील पिकाला पाणीही देता येत नव्हते. आणि कांदाही लागवड करता येत नाही, या समस्येने तो चिंतेत होता. यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

अगोदरच अतिवृष्टीने कंबर मोडलेला शेतकऱ्याला आधार देण्याऐवजी महाविवितरणकडून सक्तीची वीजबिल वसुली सुरु आहे. महावितरण शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. कृष्णा गायके याने आत्महत्या केली नसून महावितरणने केलेला खून आहे, असे कुटूंबाने म्हटले आहे.

दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी ही कारवाई सुरू असल्याने सध्या शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. यामुळे आता विरोधी पक्ष देखील आक्रमक झाला आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

पुन्हा चिंता वाढली! डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी करोना पॉझिटिव्ह

डोंबिवली : दक्षिण अफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला करोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार असून त्याला ओमिक्रॉन व्हेरिएंटची () लागण झाली आहे का? हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. पण यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. राज्यात पुन्हा एकदा संसर्ग वााढून लॉकडाऊन होईल का? अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले आहे. अधिक माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून २४ नोव्हेंबर रोजी दिल्ली आणि तेथून मुंबईला आलेल्या डोंबिवलीकर प्रवाशाची दिल्ली एअरपोर्टला केलेली करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याने आपल्या नातेवाईकांना फोन करून याची कल्पना दिली होती. यामुळे त्याचे कुटूंबीय नातेवाइकांच्या घरी शिफ्ट झाले होते तर तो एकटाच घरी विलगीकरनात राहत होता. त्याला ताप येऊ लागल्याने त्याची करोना टेस्ट केली असता करोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने तातडीने लॅबकडून याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली. करोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असतानाच परदेशातून आलेला प्रवाशाला करोनाची लागण झाल्याने पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या रुग्णाला पालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याचे टेस्टचे नमुने उद्या जिनोम सिक्वेन्सीगसाठी मुंबई येथे प्रयोग शाळेत पाठवले जाणार आहेत. अशात पुन्हा संसर्गाचा फैलाव सुरू झाला असल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Parliament Session : आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी वातावरण तापण्याची शक्यता

नवी दिल्ली : सोमवारपासून म्हणजे आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter session of Parliament) सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत वातावरण तापण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतही (All Party Meeting)तणावाचे वातावरण होते. आम आदमी पक्षाने (AAP) बैठकीतून वॉकआउट केलं तर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल टीका केली. यामुळे आजच्या अधिवेशनाकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या एमएसपी आणि वीज बिलावर चर्चा होऊ शकते. यासोबतच विरोधक कोविड-१९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा मुद्दाही उपस्थित करू शकतात. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी एकजुटीने सरकारला घेरण्याचा डाव आखला असल्याची राजकीय चर्चा आहे. इतकंच नाहीतर, सीमेवर चीनची आक्रमकता आणि पेट्रोल-डिझेलसह इंधनाच्या वाढत्या किमतींवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. सगळ्यात विशेष म्हणजे सरकारने यापूर्वीच हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वादग्रस्त तीन कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयकही सभागृहात मांडले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. सत्ताधारी पक्ष भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने आपल्या खासदारांना व्हीप जारी करून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. हिवाळी अधिवेशनाबाबत संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी म्हटले आहे की, या अधिवेशनात कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास सरकार तयार आहे, मात्र चर्चा पूर्णपणे सकारात्मक असावी. त्यामुळे आज नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

एसटी बंद आंदोलन कधी संपणार? हिंगोलीत ९० जणांचे निलंबन, दोघे सेवामुक्त

हिंगोली : संपामध्ये सहभागी होणे, सूचना देऊनही कामावर न येणे, तसेच प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता शासन आदेशानुसार विभागीय कार्यालयाने आतापर्यंत जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, हिंगोली या तिन्ही आगारातून ९० कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. तर यामध्ये दोघा जणांना सेवामुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तिन्ही आगारातील चालक, वाहक आणि यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे. यासाठी विलीनीकरणाचा लढा सुरू आहे. १ नोव्हेंबरपासून या संपाला सुरुवात झाली. आज २९ व्या दिवशीसुद्धा एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. तटपुंजी वेतन वाढ करून शासन संप मिटविण्याचा मार्गावर आहे. एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडू पाहत आहे, कर्मचाऱ्यानी कामावर यावे म्हणून शासन दडपशाही करत असल्याचा आरोप देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी केला आहे. या दडपशाहीला कर्मचारी आता घाबरणार नाहीत, संप पुढे असाच चालू राहणार असा एक मुखी निर्धार या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कर्मचाऱ्याने आदेशाचे पालन करावे असं एसटी मधील वरिष्ठांकडून वारंवार सांगण्यात येत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

राज्यासाठी धोक्याची घंटा; द. आफ्रिकेतून आलेला प्रवासी करोना पॉझिटिव्ह

ठाणे: संसर्गाच्या या विषाणूचा धोका वाढू लागला आहे. आफ्रिकन देशांमध्ये या विषाणूने थैमान घातले आहे. ही स्थिती लक्षात घेत देशपातळीवर आणि राज्यपातळीवर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रविवारी मुख्यमंत्री यांनी राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. ( ) वाचा: दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून हा व्यक्ती डोंबिवलीत परतला आहे. या प्रवाशाला करोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्याला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. या रुग्णाचे नमुने आज जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच संबंधित रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे किंवा नाही, हे स्पष्ट होईल. संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांचीही उद्या तपासणी केली जाईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले. या रुग्णाला आपल्याला करोनाची लागण झाल्याचे नेमके कळले कुठे, करोनाची लागण झाल्याचे त्याने यंत्रणांना कळवले होते किंवा नाही, याबाबत महापालिका प्रशासन माहिती घेत आहे. वाचा: करोना पॉझिटिव्ह असतानाही प्रवास? केपटाऊन येथून संबंधित व्यक्ती २४ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे आला. तिथून मुंबई विमानतळ आणि मग असा या व्यक्तीने प्रवास केला. दिल्ली विमानतळावर या व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती व त्याने लगेचच डोंबिवलीत फोन करून याची कल्पना कुटुंबीयांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित व्यक्तीचे कुटुंबीय नातेवाईकांच्या घरी गेले आहेत तर तो घरात विलगीकरणात राहत होता, असेही सांगण्यात आले. या रुग्णाच्या भावाची करोना चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, असेही सांगण्यात आले. याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, दिल्ली विमानतळावर करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता तर या व्यक्तीने तिथून डोंबिवलीपर्यंतच प्रवास कसा केला, हा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

इंदुरीकर महाराजांचं कीर्तन पुन्हा चर्चेत; आता केलं 'हे' विधान

अहमदनगर : सोशल मीडिया आणि विरोधकांवर चांगलेच संतापले आहेत. त्यांचे एखादे वादग्रस्त विधान सोशल मीडियातून व्हायरल होते आणि महाराज नव्या वादात अडकतात. त्यामुळे आपल्या कीर्तनातून नेहमीच विरोधकांचा समाचार घेतात. ‘आपण वास्तव मांडतो, त्यामुळे टीका केली जाते. आपली विधाने चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियातून व्हायरल केली जातात. उद्या हेच लोक म्हणतील करा,’ असे म्हणत इंदुरीकरांनी पुन्हा एकदा विरोधकांना फटकारले आहे. ( ) वाचा: तालुक्यातील माळेवाडी येथील एका कार्यक्रमात इंदुरीकरांनी कीर्तनातूनच आपली खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आपण खरे बोलतो, समाजातील वास्तव मांडतो. त्यामुळे काही लोक माझ्या सतत मागे लागतात. माझ्या कीर्तनातील एखादे विधान सोशल मीडियातून व्हायरल केले जाते. त्याद्वारे गैरसमज पसरविले जातात. दररोज सकाळी झोपेतून उठतो तेव्हा माझ्या मागे काहीतरी नवी झंजट लावलेली असते. तरीही मी खऱ्याची साथ सोडणार नाही. जी काही टीका होईल ती सहन करीत वास्तव मांडत राहणार. आभाळात विजा कडकडत असल्या तरी ढगांतून पाऊस पडतो याचे समाधान आहे. त्यामुळे विजांचा हा कडकडाट सहन करायला काय हरकत आहे? असे म्हणून आपण आपले काम सुरू ठेवले आहे. उद्या हेच लोक म्हणतील इंदुरीकरांची नार्को चाचणी करा,’ असेही इंदुरीकर म्हणाले. वाचा: सोशल मीडियातून त्यांच्यावर होत असलेली टीका आणि बदनामी यासंबंधी त्यांनी खेद व्यक्त केला. ही मंडळी जोडतोड करून विधान प्रसारित करीत असल्याचे ते म्हणाले. समाजाचे किती तरी प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्यांना वाचा फोडली पाहिजे. त्यातील वास्तव जनतेसमोर आणले पाहिजे. मात्र, असे होताना दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. शेतकरी संघटनेचे अनिल औताडे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे नेते हेही उपस्थित होते. त्यांनी इंदुरीकरांचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘इंदुरीकर महाराज स्पष्टवक्ते आहेत. त्यामुळे काहींनी त्यांच्या बोलण्यावर आक्षेप घेतला असला तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत.’ वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

ओमिक्रॉन डेल्टापेक्षा का घातक?; टास्क फोर्सने दिली धडकी भरवणारी माहिती

मुंबई: कोविडच्या नव्या विषाणूची घातकता लक्षात घेत मुख्यमंत्री यांनी आज राज्यातील सर्व प्रमुख अधिकारी, टास्क फोर्स सदस्य, आरोग्य यंत्रणांचे प्रमुख यांची बैठक घेत चर्चा केली. या बैठकीत कोविडच्या या नव्या विषाणूबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती टास्क फोर्सकडून देण्यात आली व सावध करण्यात आले. ( ) वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोविडच्या नव्या पाहता त्यांनी तिथूनच आज तातडीची बैठक घेतली व या विषाणूचा शिरकाव महाराष्ट्रात होऊ नये म्हणून महत्त्वाच्या सूचना केल्या. ओमिक्रॉनची घातकता लक्षात घेता या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. बैठकीच्या प्रारंभीच मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही बैठक बोलविण्यामागे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हे कारण असल्याचे सांगितले. आरोग्य विभगाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण करून युरोप तसेच दक्षिण आफ्रिकेत वेगाने पसरणाऱ्या विषाणूविषयी माहिती दिली. यावेळी टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक व डॉ. राहुल पंडित यांनी यासंदर्भात काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. बैठकीत टास्क फोर्सचे सदस्य यांनी या विषाणूविषयी जी माहिती दिली ती पाहता या विषाणूबाबत अधिक सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. वाचा: डॉ. जोशी ओमिक्रॉनबाबत म्हणाले... - कोविडच्या या नव्या विषाणूने दक्षिण आफ्रिकेतील यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकाराची जागा घेतली असून त्याचा संसर्ग कितीतरी अधिक आहे. - डेल्टाची जागा ओमिक्रॉनने अवघ्या दोन आठवड्यात घेतली यावरून त्याची घातकता लक्षात येते. - दुसऱ्या लाटेस कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते पण आहेत. - हा व्हेरिएंट सध्याच्या औषधांना, लसीला दाद देतो किंवा नाही ते डॉक्टर्स आणि तज्ञ जाणून घेत आहेत पण घाबरून न जाता आपण काळजी घेण्याची गरज आहे कारण याचा संसर्गाचा वेग पूर्वीच्या डेल्टापेक्षा कितीतरी जास्त आहे. वाचा: टास्क फोर्सने केल्या या सूचना? - डबल मास्क घालणे योग्य राहील. सर्जिकल ३ प्लाय मास्क आणि एन ९५ प्रकारातील एक मास्क घालणे उचित ठरेल - खाताना किंवा जेवताना जेव्हा मास्क काढलेला असेल तेव्हा अधिक खबरदारी बाळगावी लागेल. - अनावश्यक गर्दी टाळा, आवश्यक असेल तरच प्रवास करा. - ज्यांनी वरील लस घेतली नाही त्यांनी ती त्वरित घ्यावी. - दुहेरी मास्कचा वापर, मोकळ्या हवेत वावर, आणि लसींचे दोन्ही डोस हाच ओमिक्रॉनला रोखण्याचा एकमेव मार्ग. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

संप मिटत नसल्याने एसटी कर्मचारी तणावाखाली; नगरमध्ये घडली धक्कादायक घटना

अहमदनगर : आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. नगर जिल्ह्यातील आगारातील एका कर्मचाऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर नगर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत आहे. संप आणि त्यातून आलेल्या तणावतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र, यासंबंधी त्यांनी अधिकृतपणे तक्रार केलेली नाही. ( ) वाचा: एसटीच्या शेवगाव आगारात कार्यरत चालक (वय ४७ रा. लोहसर खांडगाव, ता. पाथर्डी) यांनी शनिवारी रात्री घरीच विषारी औषध घेतले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दगडखैर २००५ पासून एसटीच्या सेवेत आहेत. सध्या सुरू असलेल्या संपात ते सहभागी झाले. व्हावे, या मागणीवर ते ठाम आहेत. त्याच तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. मात्र, यासंबंधी अधिकृतपणे तक्रार करण्यात आलेली नव्हती. यावर अधिक बोलण्यासही त्यांच्या मुलाने नकार दिला. वाचा: दगडफेकीत चालक जखमी घेण्यात आला असला तरी धूसफूस सुरूच असल्याचे दिसून येते. दुसऱ्या दिवशीही बसवर दगडफेकीची घटना घडली. रविवारी शेवगाव-नेवासा ही बस शेवगावकडे परतत असताना भानसहिवरा गावाजवळ समोरील बाजूने दगडफेक करण्यात आली. बसची काच फुटून एक दगड चालक दत्तात्रेय नारायण काकडे यांना लागला. त्यामुळे त्यांच्या मानेला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे. शेवगाव येथील आगार प्रमुखांनी स्वतः काकडे यांना नगरमध्ये आणत रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कामगार संघटनेचे विभागीय सचिव दिलीप लबडे यांनी दिली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

करोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट अधिक घातक; CM ठाकरेंनी दिला 'हा' इशारा

मुंबई: कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाला तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लागू द्यायचा नाही या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावी लागतील, असे सांगून मुख्यमंत्री यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पावले लगेच टाकावीत असेही त्यांनी स्पष्ट केले. ( ) वाचा: आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. "कुछ नही होता है यार" हा विचार मोठ्या संकटात टाकू शकतो असे सावधगिरीचे बोल सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मास्क न वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे असे पहा. विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या उत्परिवर्तित प्रकारामुळे संसर्गाचा धोका वाढणार असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येतील याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई, डॉ. खुस्राव्ह बजान, डॉ. केदार तोरस्कर, डॉ. झहीर अविराणी , डॉ. वसंत नागवेकर, डॉ. नितीन कर्णिक, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींची उपस्थिती होती. राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली, यामध्ये प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या प्रारंभी सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. वाचा: ऑक्सिजन, औषध उपलब्धता तपासा कोविडशी अव्याहतपणे लढत असल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनातील सर्वांचे कौतुक केले. ते म्हणाले की, नवा व्हेरिएंट हा उंबरठा ओलांडून आला आहे का हे काळजीपूर्वक पाहावे लागेल. दोन्ही लाटांमध्ये आपल्याला कुठं कमी पडलो ते कळत होते. ऑक्सिजनचा साठा वाढविण्यासाठी धावपळ करावी लागली होती. त्यामुळे आता या नव्या विषाणू प्रकारामुळे शहरे असो किंवा दुर्गम भागातली रुग्णालये असोत, आपल्याला ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन साठा, आगीच्या घटना घडू नयेत म्हणून अग्निसुरक्षा तसेच स्थापत्य विषयक ऑडिट, औषधांची उपलब्धता हे सर्व प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जातीने पाहावे. मास्क आवश्यकच, अनावश्यक गर्दी होऊ देऊ नका महाराष्ट्रातील जनता समजूतदार आहे. यापूर्वीही सरकारच्या सर्व सूचनांचे पालन त्यांनी केले आहे. कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे लोकांमध्ये बेसावधपणा आला आहे. या विषाणूशी कसे लढायचे, कोणते उपचार करावेत हा नंतरचा भाग झाला पण मुळात हा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर मास्क अनिवार्य आहेच, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता लग्नसराईचे दिवस आहेत. मित्र- आप्तेष्ट परदेशातून देखील येतील त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. वाचा: परदेशातून आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे गरजेचे परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे. त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमानसेवेने, रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे, त्यादृष्टीने लगेच युद्धपातळीवर कामाला लागा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चाचण्या वाढवा, आवश्यक किटस पुरवा यावेळी मुख्यमंत्र्यांनी मधल्या काळात कमी झालेल्या चाचण्यांवर चिंता व्यक्त केली व चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले. विषाणूच्या नव्या प्रकाराला ओळखणारे किटस राज्यातील प्रयोगशाळांना मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. छोट्या छोट्या गोष्टींनी या विषाणूला प्रतिबंध होऊ शकतो हे लक्षात ठेवा असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, दोन्ही डोससह करून घेणे अतिशय आवश्यक असून प्रत्येकाने ही काळजी घेतलीच पाहिजे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,