ज्योतिषशास्त्र गुरुजींवर विश्वास ठेऊन ‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे यांनी केल दुसऱ्यांदा लग्न
‘चला हवा येऊ द्या’ हा शो वर्षानुवर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाने आणि कौशल्याने प्रत्येकाला खळखळून हसण्यास भाग पाडले आहे. तसेच या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःच स्थान निर्माण केल आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या बद्दल.
‘चला हवा येऊ द्या’ शोच्या माध्यमातून भारत गणेशपुरे घराघरात जाऊन पोहचले. या कलाकारांविषयी आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी प्रेक्षक जाणून घेण्यास उत्सुक असतात. २१ वर्षापूर्वी भारत गणेशपुरे यांचे अर्चना गणेशपुरे यांच्याशी लग्न झाले.
भारत गणेशपुरे यांनी ३ वर्षापूर्वी आपली पहिली पत्नी अर्चना हिच्याशी पुन्हा लग्न केले. यातूनच त्या दोघांमधील प्रेम दिसून येत. त्यांना एक मुलगा देखील आहे. पुन्हा लग्न करण्यामागच करण खूपच वेगळ आहे. जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
‘चला हवा येऊ द्या’ ची टीम काही वर्षांपूर्वी परदेश दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी भारत गणेशपुरे यांना सौम्य अटॅक् आला होता. उपचारानंतर भारत गणेशपुरे यांनी ज्योतिषशास्त्रावर विश्वास असल्याने तातडीने ज्योतिष्याकडे हात दाखवला. तर त्यांच्या गुरुजींनी या गोष्टीवर समाधान म्हणू पुन्हा एकदा लग्न करण्याचा सल्ला दिला.
भारत गणेशपुरे यांनी वेळ न दवडता गुरुजींचे म्हणणे ऐकून पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लग्नासाठी ९ मेचा मुहूर्त निवडला होता. तसेच ठरल्याप्रमाणे दोघेही पुन्हा एकदा बोहल्यावर चढले होते. हळदीपासून ते लग्नापर्यंत सर्व विधी त्यांनी पार पाडले.
त्यावेळीही भारत गणेशपुरे यांच्या लग्नाच्या चर्चा होत होत्या. भारत गणेशपुरे अनेकांचे आवडते अभिनेते म्हणून घराघरात पोहचले आहे. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलेलं पाहायला मिळतंय.
हे ही वाचा-
या अभिनेत्रीवर होते करण जोहरचे प्रेम, नंतर तिनेच केले करणच्या खास मित्रासोबत लग्न
तौक्तेनंतर आता चक्रीवादळ यासचा मोठा धोका, भारतीय हवामान विभागाने दिला हा इशारा
सकाळी निर्णय, संध्याकाळी जीआर! कोरोना रोखण्यासाठी अजितदादा इन ॲक्शन मोड
0 Comments: