'मी आमच्या पक्षाचा एजंट, पवार साहेबांवर टीका केल्यानंतर गप्प बसू का?'
कोल्हापूर: 'शरद पवार यांच्याबद्दल जिंदाल यांनी केलेल्या विधानावर भाजपनं माफी मागावी एवढंच मी म्हटलं होतं. चंद्रकांत पाटलांना चोमडेपणा करायला कुणी सांगितला होता? मी आमच्या पक्षाचा एजंट आहे, पवार साहेबांसारख्या उत्तुंग नेत्यांवर वा महाविकास आघाडीवर बदनामीकारक टीका केल्यानंतर गप्प बसू का?,' असा सवाल ग्रामविकास मंत्री यांनी केला आहे. वाचा: शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल भाजपचे मीडिया सेल प्रमुख नवीन जिंदाल यांनी केलेल्या वक्तव्यावर मुश्रीफ यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली होती. भाजपच्या नेत्यांनी त्यावर खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, यांनी ही मागणी धुडकावून लावली होती. त्यावर बोलताना मुश्रीफ यांनी पाटील यांच्यावर टीकास्र सोडलं होतं. त्यास भाजपनं प्रत्युत्तर दिलं होतं. मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांचं काम बघावं मग बोलावं. कोल्हापूर बाहेरच्या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं, असं आव्हान भाजपनं दिलं होतं. त्यावर बोलताना मुश्रीफ यांनी आज पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं. वाचा: 'मी सहा वेळा विधानसभा निवडणुका लढवल्या. पाच वेळा निवडून आलो. शरद पवारांच्या आशीर्वादामुळं २० वर्षे मी मंत्री आहे. हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून जीवाला जीव देणारी माणसं तयार करावी लागतात. चंद्रकांत पाटलांना काय अनुभव आहे,' असा टोला त्यांनी हाणला आहे. 'चंद्रकांत पाटलांच्या लोकप्रियतेबद्दल मला काहीच बोलायचं नाही. ते प्रचंड लोकप्रिय आहेत. आयत्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांना सवय आहे. त्यामुळं भविष्यात ते नागपुरातूनही निवडणूक लढू शकतात. लोकांमध्येच तशी चर्चा आहे. पुढच्या निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभेत पाठवलं जाणार आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी असल्यानं फडणवीसांना लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळणार नाही. पण राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार आहे. त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे, असं ते म्हणाले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: