कोरोनाच्या संकटात ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केलेलं कार्य इतिहास कधीच विसरू शकणार नाही..
देशात कोरोना विषाणूमुळे एकच खळबळ उडालीये. साथीच्या या दुसऱ्या लाटेत वाढत्या संख्येबरोबर आरोग्य सुविधांचा तुटवडा भासू लागलाय. ऑक्सिजन अभावी मृतांच्या संख्येत वाढ होतेय. देशातील बहुतेक राज्यांची हीच परिस्थिती आहे. केंद्राकडून दिली जाणारी मदत देखील अपुरी पडू लागलीये. अश्या बिकट परिस्थितीत दोन मुख्यमंत्र्यांनी मदतीचा हात पुढे केला असून इतर राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करणार असल्याचे म्हंटल आहे.
ओडिशा सरकार आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांनी ऑक्सिजन पुरवण्याचे दिले आश्वासन
२२ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी इतर राज्यांना मदत करण्याविषयी बोलले आहे . या संदर्भात ओडीसा सीएम कार्यालयाकडून एक ट्विट देखील जारी करण्यात आले आहे.
या ट्विटमध्ये म्हटलं गेलं की, कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेत युद्धासारखी परिस्थिती आहे. कोविडशी सुरु असलेल्या लढयात ओडिसा सर्व राष्ट्रीय स्तरावर सहकार्य करतील. त्यात ऑक्सिजनचे उत्पादन वाढविणे देखील समाविष्ट आहे, जेणेकरून या आपत्कालीन परिस्थितीत इतर राज्यांना मदत करता येईल.
CM @Naveen_Odisha spoke to PM @narendramodi over phone & discussed #COVID19 situation in the country. CM said it is a war-like situation & #Odisha will extend all cooperation at the national level including ramping up oxygen production to assist other states in this emergency.
— CMO Odisha (@CMO_Odisha) April 22, 2021
ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या सूचनेनंतर २२ एप्रिल रोजीच ओडिसा पोलिसांनी एडीजी (कायदा व सुव्यवस्था) वाय.के. जेठवा यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष अधिकारी नेमला, ज्यामुळे इतर राज्यांच्या गरजांसाठी ऑक्सिजनने भरलेल्या वाहनांच्या सुरळीत हालचालीवर नजर ठेवता येईल. ज्या राज्यात ऑक्सिजनची कमतरता आहे तेथे ऑक्सिजन सहजपणे पोहोचविता येईल, यासाठी राज्यातील पोलिस ग्रीन कॉरिडोरवर काम करत आहे. म्हणजेच ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या वाहनांना कोणतेही जाम किंवा अडथळा येणार नाही.
आपल्या कोट्यासाठी ऑक्सिजनचा त्वरित पुरवठा केल्याबद्दल महाराष्ट्र आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी नवीन पटनाईक यांचे आभार मानले
CM Uddhav Balasaheb Thackeray spoke to CM @Naveen_Odisha ji today to thank him for helping in procurement & transportation of oxygen from Odisha to Maharashtra and for standing by each other in these crucial times, as one nation truly!@CMO_Odisha
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 22, 2021
२२ एप्रिल रोजी संध्याकाळी ओडिशाच्या अंगुलहून २० टन मेडिकल ऑक्सिजनची पहिली खेप विशाखापट्टणमला रवाना झाली. दुसर्या दिवशी अर्थात २३ एप्रिल रोजी सकाळी दोन टँकर अंगुलमधून विशाखापट्टणमला रवाना झाले.
अंगुलहून विशाखापट्टणमला जाणारा ऑक्सिजन जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेड (JSPL) पुरवत आहे. ग्रुपचे प्रमुख नवीन जिंदाल यांनी ट्वीट करत सांगितले कि, आमच्या अंगुल प्लांटमध्ये ५०० टन पेक्षा जास्त लिक्विड ऑक्सिजन तयार आहे. याशिवाय गरजू सरकारांना आम्ही दररोज १०० टन लिक्विड ऑक्सिजन पुरवू शकतो. याच साखळीत आम्ही २२ एप्रिल रोजी तेलंगणाला २० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन पाठविला आहे. तर २३ एप्रिल रोजी पुन्हा तेलंगणा आणि मध्य प्रदेश बरोबरच दिल्ली एनसीआरच्या मेदांता, आर्टेमिस आणि बत्रा रुग्णालयांना ऑक्सिजन पाठवू.
Had a discussion with Madhya Pradesh CM Shri @ChouhanShivraj and assured him that we will supply #Oxygen from our @JSPLCorporate Raigarh plant to MP. @OfficeofSSC #IndiaFightsCorona
— Naveen Jindal (@MPNaveenJindal) April 22, 2021
आंध्रप्रदेश धावला महाराष्ट्राच्या मदतीला
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. रेमेडीसिव्हीर, खाटा, लस, ऑक्सिजन तसचं व्हेंटीलेटरसाठी राज्याला केंद्राकडे हात पसरावे लागत आहे. अश्या परिस्थितीत आंध्रप्रदेश महाराष्ट्राच्या मदतीला धावून आलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला मदत करावी अशी विनंती आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना केली. महाराष्ट्रातील परिस्थितीवर चर्चा केल्यानंतर जगनमोहन रेड्डी यांनी गडकरींच्या विनंतीचा मान राखला आणि महाराष्ट्राला ३०० व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली.
गडकरींनी ट्वीट करत दिली माहिती
Andhra Pradesh CM announces that they will send 300 Ventilators to Maharashtra. This after Union Union Minister Shri @nitin_gadkari ji spoke to CM @ysjagan with the request.
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) April 23, 2021
दरम्यान, कोरोना तडाख्यात सापडलेल्या महाराष्ट्राला दररोज १५५० मे. टन ऑक्सिजनची आवशक्यता असते. तर सध्याला ३०० – ३५० मे. टन ऑक्सिजन राज्याला बाहेरून मागवावा लागत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे ११०० व्हेंटीलेटरची मागणी केली आहे.
हे ही वाचा भिडू :
- PM केअर्समधून महाराष्ट्रासाठी १० ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू करायचे होते, झाला फक्त १
- कोरोनाच्या निमित्ताने मोदी सरकार महाराष्ट्रावर खरंच अन्याय करतय का?
- केंद्र आणि राज्याच्या राड्यात गडकरी हिरो ठरलेत..
The post कोरोनाच्या संकटात ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केलेलं कार्य इतिहास कधीच विसरू शकणार नाही.. appeared first on BolBhidu.com.
0 Comments: