'भाजप महाभारत घडवतोय; पण ममता बॅनर्जी नावाची वाघीण पुरून उरेल'
मुंबई: 'पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेलं महाभारत खऱ्या महाभारतापेक्षाही भयंकर आहे. यांच्या पराभवासाठी केंद्रातील सरकार हे महाभारत घडवत आहे. पण भाजपनं कितीही ताकद लावली तरी ममता बॅनर्जी नावाची एकटी वाघीण त्यांना पुरून उरेल,' असा विश्वास शिवसेनेचे खासदार यांनी आज व्यक्त केला. ( on ) वाचा: ते पत्रकारांशी बोलत होते. पश्चिम बंगालच्या निवडणुकीबद्दल त्यांना प्रतिक्रिया विचारली असता, पश्चिम बंगालची जनता ममता बॅनर्जी यांच्या बाजूनं असल्याचं ते म्हणाले. 'करोनाची भीती अद्याप कायम आहे. लॉकडाऊनचं सावटही कायम आहे. करोनाचं युद्ध १८ दिवसांत संपेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्षभरापूर्वी म्हणाले होते. मात्र, ते युद्ध आताही सुरू आहे. करोना अद्याप हरलेला नसताना केंद्रातील संपूर्ण सरकार ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी एक नवं महाभारत घडवतंय. पश्चिम बंगालमध्ये काय चाललंय ते पूर्ण देश बघतो आहे. पश्चिम बंगालची जनता समजूतदार आहे. तिथं काय होणार आहे हे आम्हालाही माहीत आहे. लढाई मोठी आहे, पण नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय पक्का आहे,' असं राऊत म्हणाले. 'देशाचं राजकारण नेमकं कुठल्या दिशेनं जाणार हे पश्चिम बंगालच्या निकालानंतर कळेल,' असंही ते म्हणाले. वाचा: भाजप लोकशाहीवर आघात करत असून त्या विरोधात सर्वांनी एकत्र यावं असं पत्र नुकतंच ममता बॅनर्जी यांनी देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना लिहिलं आहे. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, 'देशातील लोकशाहीवर पूर्वीपासून आघात होत आले आहेत. हे आघात काही नवीन नाहीत. मग तो आणीबाणीचा काळ असो किंवा आणखी काही. मात्र, लोकशाहीवरील या हल्ल्यांविरोधात जनता सातत्यानं लढत आली आहे आणि लोकशाही नेहमी जिंकत आली आहे. ममता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या पत्रावर देशातील विविध पक्ष नक्कीच विचार करतील.' वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: