'मोदी-शहा हे फडणवीसांना गांभीर्यानं घेत नाहीत म्हणून'

April 03, 2021 0 Comments

मुंबई: लावायचा असेल तर आर्थिक पॅकेज दिलं पाहिजे ही यांची मागणी रास्तच आहे. फक्त त्यांनी ती मागणी नरेंद्र मोदी यांच्याकडं करणं अपेक्षित आहे. पण दिल्लीत मोदी-शहा हे कदाचित फडणवीसांना गांभीर्यानं घेत नाहीत म्हणून ते राज्य सरकारच्या नावावर मोदींना हे सुचवत असावेत,' असा बोचरा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी देवेंद्र फडणवीस यांना हाणला आहे. वाचा: लॉकडाउनला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना फटकारताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जगभरच्या देशांतील परिस्थितीचे दाखले दिले होते. त्याला उत्तर देताना फडणवीसांनी पाश्चिमात्त्य देशांनी तेथील नागरिकांसाठी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजची जंत्री मांडली. तुलना केवळ परिस्थितीशी नको, कृतीशी देखील करा, असंही ते म्हणाले होते. फडणवीसांच्या या टीकेला पटोले यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. 'राज्य सरकारला पॅकेज संदर्भात विचारणा करणारे देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदी सरकारकडून महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी काय केले? मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले? या २० लाख कोटी रुपयांतून महाराष्ट्राला किती कोटी मिळाले? याची उत्तरे त्यांनी जनतेला द्यावीत,' असं पटोले म्हणाले. थाळ्या वाजवायला सांगण्यापलीकडं तुम्ही काय केलं? ' संकटात भरीव उपाययोजना करण्याचे सोडून देशातील जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवण्याचं आवाहन करण्यापलीकडं केंद्रातील भाजपच्या सरकारनं काय केलं? कसलीही तयारी न करता अचानक लॉकडाऊन लावून आख्ख्या देशाला अंधारात ढकलून दिलं. सामान्य जनतेला आगीच्या खाईत लोटून देण्याचं पाप भाजपनं केलं. लाखो लोकांचे संसार उघड्यावर आले. सामान्य जनतेला किती मरणयातना दिल्या हे जगानं पाहिलं. पॅकेजच्या नावाखाली ज्यांनी फक्त मोठ्या आकड्यांची जुमलेबाजी केली. देशाला देशोधडीला लावले, त्या भाजपला महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार नाही, असंही पटोले यांनी सुनावलं आहे. वाचा: 'गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र विविध संकटाचा सामना करत आहे. करोना महामारी, चक्रीवादळ, अतिवृष्टी, विदर्भातील पूरस्थिती अशी संकटाची मालिकाच सुरू आहे. अशा परिस्थितीतही महाविकास आघाडी सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी नेहमी तत्पर राहिलं आहे. करोनामुळं आर्थिक संकट असतानाही जनतेच्या हितासाठी सरकारनं कधीही हात आखडता घेतला नाही. परंतु केंद्रातील मोदी सरकारनं नेहमीच महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली. राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा तसंच, इतर निधीही देण्यास टाळाटाळ केली. राज्य संकटात असताना राज्यातील भाजपचे नेते सरकारविरोधात कटकारस्थाने करत राहिले. कधी राजभवनच्या माध्यमातून, कधी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून षडयंत्र रचण्यातच ते मग्न राहिले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून देशात बदनामी केली. राज्याला आर्थिक मदतीची गरज असताना मुख्यमंत्री मदतनिधीत पैसे जमा न करता राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान केअर फंडात पैसे जमा केले, असा पाढाच पटोले यांनी वाचला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: