न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करावा लागेल: संजय राऊत
मुंबईः गृहमंत्री यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयनं १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालायाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शिवसेना नेते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'हे प्रकरण थोडं राजकीय आहे. या देशातील कोणतीही तपासयंत्रणा म्हणजे परमेश्वाराचा अवतार नसतो. तपास हा त्या पास हा त्या त्या पद्धतीने होत असतो. काल ममता बॅनर्जींनी देखील केंद्रीय तपास यंत्रणेबाबत काही टिप्पणी केली आहे, अन्यजण देखील करतात. पण शेवटी आपण न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयासमोर मान झुकवतो व आदर करतो,' असं संजय राऊत म्हणाले आहे. 'न्यायालयाच्या संपूर्ण निकालाचा अभ्यास करावा लागेल. सरकारला एक विधी व न्याय खातं असतं. जे काय निकालपत्र आहे. त्याबाबत सरकार अभ्यास करेल. माझा काही व्यक्तीशा संबंध नाही. महाविकास आघाडी म्हणून म्हणाल तर शेवटी या संपूर्ण निकाल पत्राबाबत सरकारच्यावतीने मत वक्त केलं पाहिजे. पूर्ण निकाल काय आहे तो अजून मी पाहिलेला नाही. मीडियाच्या माध्यमातून जी काही माहिती मला मिळाली आहे. त्यावर विसंबून राहून कोणतीही प्रतिक्रिया मला देता येणार नाही. कारण जो काही असेल तो उच्च न्यायालयाचा निर्णय आहे आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असेल अशाप्रकारे तर त्याचा संपूर्ण अभ्यास करायला हवा,' असं मत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: