बदल्यांचं रॅकेट, फोन टॅपिंगच्या प्रकरणावर अजित पवारांनी सोडलं मौन

March 25, 2021 0 Comments

मुंबई: परमबीर सिंग यांनी गृहमंत्री यांच्यावर केलेले आरोप आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटबद्दल केलेला गौप्यस्फोट, त्यासाठी दिलेले फोन टॅपिंगचे पुरावे अशा सगळ्या मुद्द्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया दिली. फोन टॅपिंगचं प्रकरण सरकारनं गांभीर्यानं घेतल्याचं सांगतानाच, गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या चौकशीचे संकेतही त्यांनी दिले. ( on allegations by ) मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचे आरोप अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. 'या संदर्भात फडणवीसांनी जी कागदपत्रे दिली, ती आमच्याकडंही आहेत. ज्या-ज्या अधिकाऱ्यांची नावं त्यात आहेत, त्यापैकी कुठल्याही अधिकाऱ्यांच्या बदल्या कागदपत्रामध्ये नमूद केलेल्या ठिकाणी झालेल्या नाहीत. पोलिसांच्या बदल्या त्यासाठी असलेल्या समितीच्या शिफारसीनुसारच झाल्या आहेत,' असं पवार म्हणाले. वाचा: फोन टॅपिंगविषयी देखील अजित पवारांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. 'कोणत्याही तपास अधिकाऱ्याला फोन टॅपिंग करायचे असल्यास गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या परवानगीनंच करता येते. त्यामुळं त्यावेळी तशी परवानगी घेतली गेली होती का? पोलिसांच्या बदल्या कोणाच्या सांगण्यावरून केल्या गेल्या का? नेमकं काय झालं? ह्या सगळ्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेले व आता मुख्य सचिव असलेले सीताराम कुंटे यांच्याकडून मागवला आहे. कदाचित आज संध्याकाळपर्यंत तो अहवाल येईल. त्यातून संपूर्ण सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. फोन टॅपिंग बेकायदा असल्याचं समोर आल्यास संबंधितांवर कारवाई होईल, असे संकेतही अजित पवारांनी दिले. 'प्रत्येक बाबतीत सरकारनं कठोर भूमिका घेतली आहे. इतरही काही प्रकरणात चौकशीची गरज भासल्यास तशी भूमिका देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल. कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न होणार नाही,' असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. ...म्हणून राज्यपालांना भेटणार होतो! राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती राज्यपालांना देण्याची एक प्रथा आहे. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री ती देत असतात. सध्या वेगवेगळ्या आरोपांमुळं जो काही गोंधळ उडाला आहे, त्या संदर्भात राज्यपालांना भेटून माहिती देण्याचं महाविकास आघाडीनं ठरवलं होतं. मात्र, राज्यपाल मुंबईत नसल्यानं भेट झाली नाही. ते पुन्हा मुंबईत आल्यावर ही भेट होईल, असं पवार म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: