'बाळासाहेबांचे खरे वैचारिक वारसदार राज ठाकरेच; बाकी गोष्टी महत्त्वाच्या नाहीत'

March 31, 2021 0 Comments

मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत स्मारकाचं भूमिपूजन आज होणार आहे. स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यातील आमंत्रितांच्या यादीवरून राजकारण रंगलं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बाळासाहेबांच्या वैचारिक वारशाचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला जोरदार टोला हाणला आहे. मनसेचे सरचिटणीस यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. 'स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं पुढं नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची आहे. बाकी भूमिपूजन कोण करतंय ते फारसं महत्त्वाचं नाही,' असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या विराट सभांनी गाजलेल्या शिवाजी पार्क मैदानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जुन्या महापौर निवासाच्या ठिकाणी बाळासाहेबांचं राष्ट्रीय दर्जाचं स्मारक होत आहे. या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह हा सोहळा होणार असून त्याचे ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे यावेळी उपस्थित असतील. मात्र, आमंत्रितांच्या यादीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. वाचा: भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी यावरून उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे. आज बाळासाहेब असते तर पहिले आमंत्रण देवेंद्र फडणवीस यांना दिले असते. बाळासाहेब मनाचा राजा माणूस. राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत,' असं नीतेश राणे यांनी म्हटलं आहे. तर, एकनाथ शिंदे यांना आमंत्रण न दिल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: