मुंबई: अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह आढळला
मुंबई: उद्योगपती यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. या घटनेचा तपास सुरू असतानाच, त्या कारचे मालक यांचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदरच्या खाडीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ गेल्या महिन्यात कार आढळली होती. तिची तपासणी केली असता, त्यात जिलेटिनच्या कांड्या आढळल्या होत्या. त्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास सुरू होता. ही कार कुणाची आहे याची माहिती उघड झाली होती. मनसुख हिरेन हे या कारचे मालक होते. त्यानंतर ते मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजरही झाले होते. कार चोरीला गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती. मात्र, आता मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनसुख हे काल रात्रीपासून बेपत्ता झाले होते. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रारही दिली होती. त्याचा तपास सुरू असतानाच, त्यांचा मृतदेह खाडीमध्ये आढळला. मनसुख हिरेन यांचा ठाण्यात कार डेकोरचा व्यवसाय आहे. सामाजिक कार्यक्रमांत ते नेहमी भाग घेत होते. त्यांची पत्नी विमला हिरेन या सुद्धा सामाजिक कार्यकर्ता आहेत, अशी माहिती समजते. मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. मनसुख हे या संपूर्ण प्रकरणात महत्वाची व्यक्ती होती. त्यांना तात्काळ संरक्षण पुरवण्यात यावे, अशी मागणी मी केली होती. हे पूर्ण प्रकरण गुंतागुंतीचे आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला पाहिजे. अशीच मागणी मी काही वेळापूर्वी विधानसभेत केली होती, असे ते म्हणाले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: