जळगाव वसतीगृह प्रकरणात नवा ट्विस्ट; गृहमंत्र्यांनी दिली क्लीन चिट
मुंबई: जळगाव येथील महिला वसतीगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचा मुद्द्यावरुन काल सभागृहात चांगलंच वातारवरण तापलं होतं. काल गृहमंत्र्यांनी यासंबंधी तपास करु असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर, आज गृहमंत्र्यांनी यासंदर्भात निवेदन सादर केलं असून पोलिसांवरील आरोपात तथ्य नसल्याची माहिती दिली आहे. जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. या प्रकरणात एका पोलिस अधिकाऱ्यांना याचा व्हिडिओ काढल्याचाही आरोप केला जात होता. मात्र, या संदर्भात गृहमंत्र्यांनी आता स्पष्टीकरण देतय याप्रकरणी निवेदन सादर करत महिला अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला. वाचाः वसतीगृहात एकूण १७ महिला आहेत. या महिलांनी वसतीगृहात काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते. त्यात गरबा, कविता वाचन, गाण्याचा कार्यक्रम होता. महिला अधिकाऱ्यांनी तिथं भेट देऊन सर्व कामकाज पाहिलं, महिलांसोबत चर्चा केली. महिलांचं वसतीगृह असल्यानं एकही पोलीस कर्मचारी तिथे आत जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये कोणी अधिकारी कधी आतमध्ये गेल्याची नोंद नाही. त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडीओ झाला, नग्न व्हायला लावलं आणि पोलिसांनी व्हिडीओ काढला यामध्ये काही तथ्य नाही. तशा पद्धतीचा अहवाल महिला अधिकाऱ्यांन दिला असून तो मी पटलावर ठेवतो, असं गृहमंत्री यांनी म्हटलं आहे. वाचाः ज्या महिलेने तक्रार केली होती त्या महिलेच्या पतीने अनेकदा तक्रार केली होती की माझी पत्नी वेडसर आहे. तिला रुग्णालयात दाखल करा, असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुखांना प्रतिप्रश्न केला आहे. करोना काळात असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास कोणी परवानगी दिली?, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यावरही, अनिल देशमुखांनी सांगितलं की, १७ महिलांना कविता म्हणण्याचं, गाणी गाण्याचं बंधन नाही. तिथे फक्त १७ महिला होत्या, असं उत्तर दिलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: