लोकल अनलॉक होताच उसळली गर्दी; सोशल डिस्टनसिंगचा फज्जा
मुंबईः करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळं गेल्या दहा महिन्यांपासून बंद असेली लोकल आजपासून सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, लोकल अनलॉक होताच तिकीट स्थानकांवर तिकीटासाठी प्रवाशांची गर्दी उसळली आहे. त्यामुळं सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र आहे. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात आला असला तरी अद्यापही करोनाचा धोका कायम आहे. त्यामुळं लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु होत असली तरी फेस मास्क, सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टनसिंग वापरण्याच्या सूचना वेळोवेळी होत असतात. मात्र, तरीही या सूचनांकडे प्रवासी दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय. वाचाः सर्वांना लोकल प्रवासांची मुभा देण्यात आली असली तरी लोकल प्रवासासाठी काही वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसंच, या वेळेचं बंधन नागरिकांनी पाळलं नाही तर शिक्षा व दंडही आकारण्यात येत आहे. लोकल आज सुरु होताच रेल्वे तिकिट खिडक्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. पश्चिम रेल्वेवरील अंधेरी, बोरिवली या तिकीटघरातील सर्व एन्ट्रन्स प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहेत. जेणेकरुन अधिक गर्दी होणार नाही. त्याचबरोबर विनातिकीट प्रवास करु नये यासाठी प्रत्येक स्थानकात टीसीचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: