'शून्याचे शंभर करण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे'
यवतमाळ: 'शून्य असेल तर त्याचे शंभर करण्याची धमक आपण ठेवली आहे. हा शरद पवारांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यामुळं ऐकीने पक्ष वाढविण्यासाठी कामाला लागा,' असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री यांनी आज केलं. दौरा यात्रा आज नवव्या दिवशी यवतमाळमध्ये पोहोचली आहे. जयंत पाटील यांनी आज जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना जोमानं कामाला लागण्याचा सल्ला दिला. 'मला जाहीर सभांची अपेक्षा नाही. मी पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. आपल्या सर्वांना मिळून हा पक्ष बांधायचा आहे. जे खरं आहे ते स्वीकारलं पाहिजे असंही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. वाचा: यावेळी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदिप बाजोरिया, आमदार इंद्रनील नाईक, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: