बजेटचं स्वागत करताना निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले...
मुंबईः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन भाजपचे नेते यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र व मुंबईला या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेलं नाहीये, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. तर, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. निलेश राणे यांही अर्थसंकल्पाचं स्वागत करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. वाचाः संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर निलेश राणेंनी एक ट्विट केलं आहे. देशाचा बजेट आज जाहीर झाला, मागचं वर्ष संकटात गेलं तरी यंदाचा अर्थसंकल्प धाडसी आहे. अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे, असं म्हणत कौतुक केलं आहे. तर, एकीकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन, हातात कागद न घेता अर्थसंकल्प या विषयावर ३० मिनिटं बोललं पाहिजे, असा टोला लगावला आहे. दरम्यान, अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय. संपूर्ण बजेटचा भार महाराष्ट्रावर अवलंबून आहे. पण, बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काहीही विशेष तरतूद नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: