अमिताभ, अक्षयला गप्प बसवलं गेलंय; मोदी सरकावर गंभीर आरोप

February 22, 2021 0 Comments

मुंबई: शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याचं स्वातंत्र्य जिथं उरलं नाही, तिथे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरुद्ध देशातले सेलिब्रिटी आवाज उठवतील ही अपेक्षा कोणी का करावी? आज पेट्रोल-डिझेल दरवाढीवर संताप व्यक्त करण्याचं स्वातंत्र्यही आपण गमावलं आहे. त्यामुळं अक्षय कुमार, यांना उगाच दोष का देता?,' असा उपरोधिक सवाल करत, शिवसेनेनं मोदी सरकावर जोरदार तोफ डागली आहे. ( Over Rising ) वाचा: पेट्रोल, डिझेलच्या दरवाढी विरोधात सध्या देशात संतापाचे वातावरण आहे. केंद्र सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. तर, सोशल मीडियातून मीम्स व्हायरल होत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीसारख्या पक्षांनी यूपीए सरकारच्या काळात इंधनाच्या दरवाढीवर बोलणाऱ्या सेलिब्रिटींना लक्ष्य केलं आहे. या सगळ्या घडामोडींवर शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून तिरकस भाष्य केलं आहे. '२०१४ च्या आधी अक्षय कुमारपासून ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत अनेक नायक-महानायकांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका त्यांच्या मतांतून व्यक्त केला होता. लोकांनी आता कसं जगायचं, काय करायचं? असे प्रश्न त्यांनी समाजमाध्यमांवर एका तळमळीनं विचारलं होतं, पण आता पेट्रोलनं ‘शंभरी’ पार करूनही हे सर्व सेलिब्रिटी गप्प आहेत. यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. पण ते गप्प आहेत याचं कारण त्यांना गप्प बसवलं आहे. २०१४ च्या आधी देशात मत व्यक्त करण्याचं, टीका करण्याचं स्वातंत्र्य होतं. सरकारी धोरणांवर टीका केली म्हणून एखाद्यास देशद्रोहाच्या कलमाखाली तुरुंगात ढकलले जात नव्हते. त्यामुळे अक्षय, अमिताभला दोष देण्यात अर्थ नाही, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. अग्रलेखातील ठळक मुद्दे: >> आधीच्या सरकारांनी देशाचे तेल आयातीवरील अवलंबित्व कमी केले असते तर मध्यमवर्गीयांवर महागाईचा भार पडला नसता, हे मोदी यांचं वक्तव्य म्हणजे त्यांच्या बोलघेवडेपणास साष्टांग दंडवत घालावं असंच आहे. आधीच्या सरकारांनी इंडियन ऑइल, ओएनजीसी, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, मुंबई हायसारखे सार्वजनिक उपक्रम सुरू केले. समुद्रातून तेलाचे साठे शोधले. मोदी यांनी हे सर्व सार्वजनिक उपक्रम विकायला काढले व आता इंधन दरवाढीचे खापर आधीच्या सरकारांवर फोडून वैचारिक शिमगा साजरा करीत आहेत. वाचा: >> एप्रिल २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव १०८ डॉलर्स प्रतिबॅरल होते. तेव्हा पेट्रोल होते ७१ रुपयांना आणि डिझेल ५८ रुपयांना. आज फेब्रुवारी २०२१ मध्ये क्रूड ऑइलचा दर ६२ डॉलर्स प्रतिबॅरल आहे. पण आज पेट्रोलने ‘शंभरी’ गाठली तर डिझेल नव्वदीच्या घरात पोहोचले. क्रूड ऑइलचे भाव पडल्याचा फायदा भारतीय जनतेला का मिळू नये? याचे समाधानकारक उत्तर जनतेला मिळेल काय? पण या प्रश्नी जो बोलेल तो देशद्रोही. >> भारतात बनविलेल्या करोनाच्या लसी आपण ब्राझिलला दिल्या. ब्राझिलने त्याबद्दल मोदींचे आभार मानले. या सगळ्याचा देशातील मध्यमवर्गीयांना काय फायदा? कुवैतच्या राजपुत्राने भारतीय शिष्टमंडळाकडे पंतप्रधान मोदींची वाहवा करून करोनाकाळात पुरवलेल्या मदतीबद्दल आभार मानल्याचा डांगोरा पिटला जात आहे. त्याऐवजी मोदींना परतफेड म्हणून दोन-चार तेलविहिरी येथील जनतेसाठी दिल्या असत्या तर येथील जनता खूश झाली असती. >> काँग्रेस राजवटीत पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांनी काँग्रेसला लुटारू म्हणून फटकारलं होतं. काँग्रेसला पेट्रोल-डिझेलचे भाव नियंत्रणात आणता येत नसतील तर सत्ता सोडावी, असं मोदींचं म्हणणं होतं. आज मोदी किंवा त्यांच्या सरकारच्या बाबतीत हे असंच कोणी म्हणालं तर त्यास देशद्रोही ठरवून तुरुंगात सडवलं जाईल. वाचा: >> पेट्रोल-डिझेलची भाववाढ जो मुकाटपणे सहन करील तो देशभक्त व जो या भाववाढीविरोधात बोलेल तो हरामखोर, देशाचा गद्दार असे ठरवून टाकलं गेलं आहे. पेट्रोलचे भाव वाचून ज्याच्या छातीत कळ येणार नाही तो शूरवीर व ज्यास घाम फुटेल तो कमकुवत मनाचा, असा जो प्रकार सध्या आपल्या देशात सुरू आहे तो खतरनाक मनोवृत्तीचा आहे. >> जीवनावश्यक गोष्टींचे भाव नियंत्रित ठेवणे हे सरकारचं कर्तव्य आहे. त्याचा विसर सरकारला पडला असेल तर जनतेनं हा स्मृतिभ्रंश दूर करायला हवा. राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील. लोकांनी वाहने खरेदी केली ती कामधंद्याच्या सोयीसाठी. ही सर्व वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल. मग बसा बोंबलत!


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: