... तर शरजीलला आमच्याकडे सोपवा; 'या' नेत्याचं ट्विट चर्चेत
मुंबईः पुण्यातील एल्गार परिषदेत यानं हिंदू समाजाबद्दल केलेल्या अक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी यांनी केली आहे. फडणवीस यांनी केलेल्या या मागणीनंतर भाजपतील इतर नेत्यांनीही ही मागणी लावून धरली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनीही ट्विट करून ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. तसंच, शरजीलची चौकशी होणार नसेल तर आमच्याकडे सोपवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शरजील नावाच्या कारट्याला अटक किंवा चौकशी होणार नसेल तर त्याला आमच्याकडे सोपवा. परत कधी हिंदूना सडका म्हणणार नाही याची जबाबदारी आमची, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शरजीलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ३० जानेवारी रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारी, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली आहेत. 'आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो', अशाप्रकारची ही गंभीर विधाने आहेत, असे या पत्रात नमूद करत शरजील याच्या हिंदी भाषणातील निवडक मजकूरच फडणवीस यांनी पत्रात दिला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: