'हे' कोणताही शेतकरी करु शकत नाही; निलेश राणेंचं ट्विट चर्चेत
मुंबईः दिल्लीत शेतकरी आंदोलक व प्रजासत्ताक दिनाच्या शेतकऱ्यांच्या टॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारावरुन महाराष्ट्रातील नेत्यांमध्येही आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शेतकरी आंदोलक व पोलिसांमध्ये वाद झाल्याचीही माहिती समोर येत आहे. हाच धागा पकडत भाजपचे नेते यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. ट्रॅक्टर रॅली दरम्यान शेतकरी आंदोलनातील एका गटानं लाल किल्याच्या इथं सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करत निलेश राणे यांनी आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. वाचाः पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं? पोलिसांना पाहिजे तेव्हा त्यांनी जागा रिकामी केली असती पण आज पर्यंत माणूसकी दाखवली. पोलिसांच्या अंगावर टॅक्टर घालणं, हे कोणताही शेतकरी करु शकत नाही, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. शिवाय, या जमावाला कायदा बदलून हवा की कायदा बिघडवायचा आहे?, असा सवालही त्यांनी केला आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला काल हिंसक वळण लागले. आंदोलक व पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. त्यात मोठ्या संख्येने पोलीस व आंदोलक जखमी झाले. या हिंसाचाराचे देशभर पडसाद उमटत आहेत. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: