डोंबिवलीतील २० कंपन्या गुजरातला जाणार, 'ही' आहेत कारणं

January 28, 2021 0 Comments

म. टा. वृत्तसेवा कल्याण : कच्च्या मालाची घटलेली मागणी, कंपन्यांना खेटून उभारल्या जाणाऱ्या इमारतींमुळे गायब झालेला हरित पट्टा, परिणामी वाढलेल्या प्रदुषणाच्या तक्रारी, एमआयडीसीकडून कंपन्याच्या विस्तारासाठी न मिळणारी जागा, उत्पादन प्रक्रियेत येणाऱ्या मर्यादा, राजकीय नेत्यांकडून वाढणारा दबाव यामुळे त्रस्त उद्योजक डोंबिवली एमआयडीसीमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाप्रत पोचले आहेत. वाचा: एमआयडीसीतील ३०० चौरस फुटांपासून ७००० चौरस फुटांपर्यत विस्तार असलेल्या सुमारे २० इंजिनीअरिंग आणि केमिकल कंपन्यांनी आपला व्यवसाय राज्याबाहेर नेण्याच्या हालचाली सुरू केल्या असून जवळपास २० उद्योजकांनी कंपन्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला उद्योग करायचा आहे. तो शांततेने करता यावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, डोंबिवली एमआयडीसीत ती शांतता मिळेल असे वाटत नसल्यानेच आपण सोडण्याचा निर्णय घेतल्याच्या प्रतिक्रिया या उद्योजकांनी दिल्या आहेत. उद्योजकाच्या या निर्णयामुळे मोक्याच्या जागेच्या शोधात असलेल्या विकासकांना आनंद झाला असला तरी राज्याच्या तिजोरीला मात्र याचा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. या सर्व व्यावसायिकांसाठी राज्यात पोषक वातावरण निर्माण केले जात असल्याचे सांगितले जात असून या व्यवसायाचे गुजरातमध्ये स्थलांतर होण्याची शक्यता आहे. वाचा: डोंबिवलीमधील ६० वर्षांहून जुन्या असलेल्या उद्योगांना आता घरघर लागू लागली आहे. नामांकित कंपन्यांची एमआयडीसी अशी ओळख असलेल्या शहरात उद्योजकांना कायमच वेठीस धरले जात असल्याचा उद्योजकांचा आरोप आहे. उद्योगासाठी आरक्षित असलेले एमआयडीसी मधील भूखंड रहिवासी क्षेत्रासाठी खुले करताना एमआयडीसीला हरित पट्ट्याचा विसर पडला. उद्योजकांकडून विविध प्रकारचे कर वसूल करणाऱ्या एमआयडीसी कडून उद्योगांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिले जात नसून प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सतत वेठीस धरले जात असल्याने त्रासात भर पडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यातच व्यवसायवाढीसाठी उद्योगांना वाढीव जागा एमआयडीसीकडून मिळत नसून कमीत कमी जागेत रसायनांचा मर्यादेपेक्षा जास्त साठा केल्यास या कंपन्यांवर सतत कारवाई होत असल्याने उद्योजक त्रस्त आहेत. प्रदूषणाच्या मुद्द्यावरून उद्योजकांना वेठीस धरले जात असल्याने त्यांचा संयम सुटला आहे. एमआयडीसीमध्ये तयार होणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून असलेल्या मोठ्या कंपन्या आधीच स्थलांतरीत झाल्याने उद्योग संकटात आले आहेत. यामुळेच अनेक उद्योजकांनी गुजरातमधील नव्याने वसलेल्या एमआयडीसीमधील बाजारपेठ काबीज करण्यासाठी गुजरातमध्ये स्थलांतरीत होण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत २०हून अधिक उद्योगांनी गुजरातमध्ये कंपन्याचे स्थलांतर सुरू केले असून जवळपास २५ उद्योजकांनी कंपन्या विक्रीस काढल्या आहेत. मात्र जवळपास सहा महिन्यांपासून विक्रीस काढलेल्या या कंपन्या खरेदी करण्यासाठी कोणीही उद्योजक पुढे येत नसून राजकीय नेत्यांकडून दिला जाणारा त्रास, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळासारख्या संस्थाकडून न मिळणारे सहकार्य यामुळे डोंबिवली एमआयडीसीत उद्योग करणे अशक्य असल्याची प्रतिक्रिया उद्योजकाकडून देण्यात आली आहे. वाचा: याबाबत कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांना संपर्क साधला असता त्यांनी जवळपास २० कंपन्या गुजरातला स्थलांतर करण्याच्या तयारीत असून २५ कंपन्या उद्योजकांनी विक्रीस काढल्या असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजक कमालीचे त्रस्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: