'त्या' घटनेवर मोदी, शहा गप्प का?; राऊतांचा सवाल

January 31, 2021 0 Comments

मुंबईः पंतप्रधान मोदी व अमित शहा इतर वेळी राहुल गांधींपासून ममता बॅनर्जींपर्यंत राजकीय विरोधकांवर बरसत असतात, पण दिल्लीत २६ जानेवारी रोजी इतका मोठा हिंसाचार झाला, त्यावर ना पंतप्रधान बोलले ना आपले गृहमंत्री, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मोदी, शहांवर हल्ला चढवला आहे. दिल्लीत २६ जानेवारी रोजी घडलेल्या हिंसाचाराचे देशभरात पडसाद उमटले आहेत. शेतकरी आंदोलनात पंतप्रधानांनी घेतलेल्या भूमिकेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या रोखठोक सदरातून मोदी- शहांवर हल्ला चढवला आहे. शेतकऱ्यांचा एक गट दिल्लीत घुसला व त्याने दंगल केली. राज्यकर्त्या पक्षाच्या प्रेरणेनेच जेव्हा दंगली होतात, तेव्हा अंहिसेवरील प्रवचने उपयोगी पडत नाहीत. शेतकऱ्यांचे आंदोलन कसे राष्ट्रदोही आहे यावर भाजपचा आयटी विभाग आता समाज माध्यमांवर प्रवचने झोडत आहे. मग शेवटी पंतप्रधान, गृहमंत्री यांची काही जबाबदारी आहे की नाही? मोदी व शहा हे आज प्रमुख घटनात्मक पदांवर बसून देशाचे नेतृत्व करीत आहेत. पंजाबच्या शेतकऱ्यांशी असे वागणे म्हणजे देशात अशांततेची नवी ठिणगी टाकणे आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. रोखठोक सदरातील महत्त्वाचे मुद्दा >> दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडली जात आहे. दोन संघटना आंदोलनातून बाहेर पडल्या. लाल किल्ल्यावरील हिंसाचार हे कारण त्यासाठी दिले, लाल किल्ल्यावरील हल्ला हा त्याच राजकीय कारस्थानाचा भाग होता काय, अशी शंका त्यामुळं बळावली. शेतकऱ्यांचेआंदोलन आता पंजाब समस्येशी जोडले जात आहे. पंजाबला अशांत करु नका हे सगळ्यांचेच म्हणणे आहे. >> २६ जानेवारी रोजी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले शेतकरी सरळ दिल्लीत घुसले व त्यांनी काही काळासाठी लाल किल्ल्याचा ताबा घेतला. दिल्लीच्या रस्त्यांवर आणि लाल किल्ल्यावर काही काळासाठी युद्ध परिस्थितीच निर्माण झाली. हे धर्मयुद्ध आहे अशा शेरा यावर कुणीतरी मारला. >> शेतकऱ्यांना लाल किल्ल्यात घेऊन जाणारे नेते शेवटी भाजप परिवारातील निघावेत यासारखा विनोद तो कसला? दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न पंजाबमधील गाडलेल्या समस्येशी जोडला जात आहे. पंजाब अशांत करु नका, असे शरद पवारांसारखे नेते वारंवार सांगत आहेत. त्यामागचे सत्य समजून घेण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता नाही. >> महाराष्ट्रातील शेतकरी पंजाबच्या शेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत आला. हजारो शेतकरी राजभवनाला धडक देण्यासाठी निघाले. त्यांना अडवून ठेवले. शेतकऱ्यांचे नेते राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन देण्यास निघाले तेव्हा आपले महामहिम राज्यपाल हे गोव्याच्या दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. >> एरवी आपले राज्यपाल राज्याचे व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच पुढाकार घेत असतात, पण हजारो शेतकरी स्वतःच आपले प्रश्न घेऊन राजभवनाकडे निघाले तेव्हा शेतकऱयांचे प्रश्न सोडविण्याची आयतीच संधी नाकारून राज्यपाल गोव्यास गेले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: