Bacchu Kadu: अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी दिला 'हा' निर्वाणीचा इशारा

January 30, 2021 0 Comments

नगर: ‘उच्चाधिकार समिती नियुक्त करून सहा महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक यांनी आपले नियोजित आंदोलन स्थगित केले. मात्र, सहा महिन्यांत या मागण्यांवर सरकारने ठोस कार्यवाही केली नाही तर आम्हीच शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारू,’ असा इशारा जलसंपदा व शालेय शिक्षण राज्यमंत्री यांनी दिला. बच्चू कडू यांनी आज येथे हजारे यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. ( Latest News Update ) वाचा: अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांशी संबंधित मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, कालच यावर तोडगा निघाल्याने त्यांनी हे आंदोलन स्थगित केले. त्यानंतर आज सकाळी बच्चू कडू यांनी त्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी त्यांनी हजारे यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्रातील विभागनिहाय पिकांना व मिळाले पाहिजे असे सांगून शेतकऱ्यांसाठी केलेल्या मागण्या आणि आंदोलने यावर दोघांत चर्चा झाली. वाचा: कडू यांनी नंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘स्वामीनाथन आयोगासह शेतकऱ्यांसंबंधी अन्य पंधरा मुद्द्यांवर सहा महिन्यांच्या आत उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून निर्णय व्हावेत. अन्यथा सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जनआंदोलन उभे केले जाईल. बाजरी, भात, कापूस या पिकांना हमीभाव व बाजार मूल्य मिळणे गरजेचे आहे. यासाठी आमचा आणि हजारे यांचाही पाठपुरावा सुरू आहे. आता केंद्र सरकारने आश्वासन दिले असल्याने हजारे यांनी आंदोलन स्थगित केले. सरकारने त्यांना सहा महिन्यांची मुदत दिली आहे. तोपर्यंत काय निर्णय होतो, ते पाहू. जर हे प्रश्न समाधानकारक पद्धतीने मार्गी लागले नाहीत तर आम्हीच पुढाकार घेऊन आंदोलन उभारणार आहोत.’ वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: